शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
3
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
4
अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले सिवानचे जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
5
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
6
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
7
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
8
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
9
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
10
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
11
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
12
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
13
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
14
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
15
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
16
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
17
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?
18
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
19
CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
20
Video: निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...

जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांची ससेहोलपट

By admin | Updated: September 18, 2016 02:44 IST

जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळांमध्ये सुमारे ३५४ शिक्षक अतिरिक्त आहेत.

सुरेश लोखंडे,

ठाणे- जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळांमध्ये सुमारे ३५४ शिक्षक अतिरिक्त आहेत. यातील १८४ शिक्षकांना नियमानुसार जिल्ह्यातील शाळांमधील रिक्त जागी सामावून घेण्यात आले. तसे आदेशही शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांना देऊन संबंधित शाळांवर पाठवले. मात्र, बहुतांशी शाळा या शिक्षकांना हजर करून घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. आदेश असूनही हजर करून घेतले जात नसल्यामुळे अतिरिक्त शिक्षकांची ससेहोलपट सुरू झाली आहे. यावरून, येथील शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयात शिक्षकांनी धाव घेतल्याने तेथील गोंधळ वाढला आहे.आदेशात दिलेल्या शाळेवर हजर न झाल्यास संबंधित शिक्षकाचे वेतन काढले जाणार नाही, असे शिक्षण विभागाचे आदेश असून शाळा मात्र त्यांना हजर करून घेत नाही. यामुळे या अतिरिक्त शिक्षकांचा मन:स्ताप वाढला आहे. जात प्रवर्गनिहाय व विषय या निकषांवर शाळांमध्ये रिक्त असलेल्या जागी या शिक्षकांना घेण्यात आले आहे. सुमारे दोन दिवस आॅनलाइन पद्धतीने हे काम ठाण्यात पार पडले. अतिरिक्त ३५४ शिक्षकांपैकी प्राथमिकचे १५४, तर २०० माध्यमिक शिक्षक आहेत. यातील केवळ २६ प्राथमिक, तर माध्यमिकच्या १५८ शिक्षकांना जिल्ह्यातील शाळांमध्ये हजर होण्याचे आदेश मिळाले आहेत. परंतु, बहुतांशी शिक्षकांना हजर करून घेण्यास जिल्ह्यातील शाळांनी विरोध केला आहे. उर्वरित १७० अतिरिक्त शिक्षकांना उपसंचालकांच्या आदेशाने पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबई आदी जिल्ह्यांतील कोणत्याही शाळेवर हजर व्हावे लागणार आहे. पण, त्यास काही दिवस लागणार आहेत. यात १२८ प्राथमिक, तर माध्यमिकच्या ४२ शिक्षकांचा समावेश आहे. या शिक्षकांना ठाण्यांप्रमाणेच अन्य जिल्ह्यांतही हजर करून घेण्याची शक्यता नाही. आदेशाला न जुमानणाऱ्या शाळांवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष असले तरी तोपर्यंत या अतिरिक्त शिक्षकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. >शैक्षणिक संस्थांची न्यायालयात धाव!शाळेच्या रिक्त जागा भरण्याच्या अधिकाराचा वापर शिक्षण विभाग करीत आहे. यामुळे शैक्षणिक संस्थांच्या अधिकारावर गदा आली, असा आरोप शिक्षणसम्राटांकडून होत आहे. यामुळे अधिकार शाबूत ठेवण्यासाठी ही संचमान्यताच रद्द करा, या मागणीसाठी राज्यातील शिक्षणसम्राट एकत्र आले आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. १५ सप्टेंबरला होणारी सुनावणी आता २२ सप्टेंबरला आहे. तोपर्यंत शिक्षकांना कोणत्याही शाळेत हजर करून घेण्याच्या मानसिकतेत शैक्षणिक संस्था नसल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.