शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
5
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
6
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
7
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
8
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
9
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
10
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
11
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
12
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
13
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
14
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
15
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
16
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
17
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
18
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
19
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
20
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांची ससेहोलपट

By admin | Updated: September 18, 2016 02:44 IST

जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळांमध्ये सुमारे ३५४ शिक्षक अतिरिक्त आहेत.

सुरेश लोखंडे,

ठाणे- जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळांमध्ये सुमारे ३५४ शिक्षक अतिरिक्त आहेत. यातील १८४ शिक्षकांना नियमानुसार जिल्ह्यातील शाळांमधील रिक्त जागी सामावून घेण्यात आले. तसे आदेशही शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांना देऊन संबंधित शाळांवर पाठवले. मात्र, बहुतांशी शाळा या शिक्षकांना हजर करून घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. आदेश असूनही हजर करून घेतले जात नसल्यामुळे अतिरिक्त शिक्षकांची ससेहोलपट सुरू झाली आहे. यावरून, येथील शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयात शिक्षकांनी धाव घेतल्याने तेथील गोंधळ वाढला आहे.आदेशात दिलेल्या शाळेवर हजर न झाल्यास संबंधित शिक्षकाचे वेतन काढले जाणार नाही, असे शिक्षण विभागाचे आदेश असून शाळा मात्र त्यांना हजर करून घेत नाही. यामुळे या अतिरिक्त शिक्षकांचा मन:स्ताप वाढला आहे. जात प्रवर्गनिहाय व विषय या निकषांवर शाळांमध्ये रिक्त असलेल्या जागी या शिक्षकांना घेण्यात आले आहे. सुमारे दोन दिवस आॅनलाइन पद्धतीने हे काम ठाण्यात पार पडले. अतिरिक्त ३५४ शिक्षकांपैकी प्राथमिकचे १५४, तर २०० माध्यमिक शिक्षक आहेत. यातील केवळ २६ प्राथमिक, तर माध्यमिकच्या १५८ शिक्षकांना जिल्ह्यातील शाळांमध्ये हजर होण्याचे आदेश मिळाले आहेत. परंतु, बहुतांशी शिक्षकांना हजर करून घेण्यास जिल्ह्यातील शाळांनी विरोध केला आहे. उर्वरित १७० अतिरिक्त शिक्षकांना उपसंचालकांच्या आदेशाने पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबई आदी जिल्ह्यांतील कोणत्याही शाळेवर हजर व्हावे लागणार आहे. पण, त्यास काही दिवस लागणार आहेत. यात १२८ प्राथमिक, तर माध्यमिकच्या ४२ शिक्षकांचा समावेश आहे. या शिक्षकांना ठाण्यांप्रमाणेच अन्य जिल्ह्यांतही हजर करून घेण्याची शक्यता नाही. आदेशाला न जुमानणाऱ्या शाळांवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष असले तरी तोपर्यंत या अतिरिक्त शिक्षकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. >शैक्षणिक संस्थांची न्यायालयात धाव!शाळेच्या रिक्त जागा भरण्याच्या अधिकाराचा वापर शिक्षण विभाग करीत आहे. यामुळे शैक्षणिक संस्थांच्या अधिकारावर गदा आली, असा आरोप शिक्षणसम्राटांकडून होत आहे. यामुळे अधिकार शाबूत ठेवण्यासाठी ही संचमान्यताच रद्द करा, या मागणीसाठी राज्यातील शिक्षणसम्राट एकत्र आले आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. १५ सप्टेंबरला होणारी सुनावणी आता २२ सप्टेंबरला आहे. तोपर्यंत शिक्षकांना कोणत्याही शाळेत हजर करून घेण्याच्या मानसिकतेत शैक्षणिक संस्था नसल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.