शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

सवरांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा

By admin | Updated: September 21, 2016 05:53 IST

राज्यात कुपोषणाने बालकांचे बळी जात असताना आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा बेजबाबदार वक्तव्ये करत आहेत.

मुंबई : राज्यात कुपोषणाने बालकांचे बळी जात असताना आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा बेजबाबदार वक्तव्ये करत आहेत. त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी आदिवासी विकास मंत्र्यांना स्वत:च्या मतदारसंघात जाण्यास १५ दिवसांचा वेळ का लागावा, अशी विचारणाही केली. आपले मूल गमावलेल्या त्या संतप्त मातेने सवरा यांना दारातून हाकलले तशाच पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रिमंडळातूनही हाकलून लावले पाहिजे, अशी मागणी चव्हाण यांनी केली. बुधवारी महिला आणि बालकल्याण मंत्री कुपोषणग्रस्त मोखाड्याच्या दौऱ्यावर जात आहेत, त्यांच्या दौऱ्याआधी तेथे जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत, हा दुर्दैवी प्रकार असल्याची टीका चव्हाण यांनी केली आहे. जमावबंदी लावल्यास जनता आपल्या अडचणी, समस्या मंत्र्यांना कशा सांगणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)