शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

बाहेरगावी जाताय, सावधान!

By admin | Updated: September 18, 2016 00:50 IST

शहरात व शहराच्या आसपासच्या गावांतील बंद घरांचे कुलूप तोडून चोऱ्यांच्या प्रमाणात अलीकडेच मोठ्या प्रमाणात वाढ झाली

भोर : शहरात व शहराच्या आसपासच्या गावांतील बंद घरांचे कुलूप तोडून चोऱ्यांच्या प्रमाणात अलीकडेच मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील आठ महिन्यांत ८ ते १० घरे फोडून चोऱ्या झाल्या आहेत, तर ५ दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत, स्टँडवर व इतरत्र अशा १० चोऱ्या असे एकूण १८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.अनेक जण गुन्हे दाखल करीतच नाहीत. यामुळे आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाहेरगावी जाताय, सावधान! घराला कुलूप हमखास चोरी होणार. चोऱ्यांमुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून रात्री-अपरात्री घराबाहेर पडता येत नाही. भोर पोलिसांच्या कामकाजाबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.मागील महिनाभरात शहरातील शेवटची गल्ली भेलकेवाडीत गणपती सणाला गावाला गेलेल्या बंद घरांच्या दरवाजाची कडी तोडून घरातील किमती वस्तू, रोख रक्कम, दागिने चोरट्यांनी चोरून नेले. तर, उत्रौली येथील चार बंद घरांची कुलपे तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून जबरी चोऱ्या केल्या आहेत. एसटी स्टाँडवर व बाजारात गर्दीचा फायदा घेत मोबाईल, पाकीट,मंगळसूत्र व इतर सोन्याच्या वस्तूंच्या चोऱ्या होतात. आठवड्यापूर्वी पिराचामळा, भोरेश्वरनगर येथे रात्री साडेदहा वाजता चोरटे चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते. मात्र, नागरिक जागे असल्याने चोरटे पसार झाले. ग्रामीण भागातही अशाच पद्धतीने चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. महिनाभरात ८ ते १० घरांत चोऱ्या झाल्या आहेत. यामुळे नागरिक रात्री-अपरात्री घराबाहेर पडत नसून लोकांमध्ये घबराट पसरली आहे. भोर पोलिसांत दरवेळी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला जातो आणी तपास सुरू असल्याचा फार्स केला जातो. मात्र, प्रत्यक्षात हातात काहीच लागत नाही. अशा गुन्ह्यातील एकही आरोपी सापडला नसून कशाचाही तपास लागलेला नाही. यामुळे भोर पोलीस निरीक्षकांच्या कामकाजाबद्दल शंका व्यक्त केली जात असून सर्वसामान्य नागरिक नाराजी व्यक्त क रीत आहेत.भोर पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या दुचाकी चोरीच्या ५ गाड्या चोरीपैकी ३ गाड्या परत मिळाल्या आहेत. तर, तीन घरफोड्या करणाऱ्यांना पोलिसांनी अटक करून गुन्हा कबुल केल्याचे भोर पोलिसांकडून सांगण्यात आले.(वार्ताहर)>बंद घरांची टेहाळणी : चोरांचा प्रवेशभोर शहरातील अनेक आळीतील बंद घरांची दिवसा टेहळणी करून, रात्रीच्या वेळी आजूबाजूच्या घरांच्या दरवाजाच्या बाहेरून कड्या लावून कोणीही मदतीला येणार नाही, याची खबरदारी घेऊन कटावणीने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करतात. घरातील सोने-नाणे, किमती वस्तू पैसे चोरटे चोरूक्षन नेत आहेत.