शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
2
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
3
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
4
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
5
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
6
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
7
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
8
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
9
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
10
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
11
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
12
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
13
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
14
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
15
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
16
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
17
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
18
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण

सांबरेंच्या उपोषणाला व्यापक पाठिंबा

By admin | Updated: August 23, 2016 03:15 IST

निलेश सांबरेंनी सोमवारपासून सुरु केलेल्या उपोषणाला सर्वस्तरामधून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.

पालघर : सुप्रीमो कंपनीच्या निकृष्ट कामामुळे निष्पापांचे गेलेले बळी आणि त्या कंपनीच्या बेकायदेशीर कामाबाबत पुरावे देऊनही अधिकाऱ्यांच्या असलेल्या भक्कम पाठिंब्यामुळे त्या कंपनी वर कुठलीही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ निलेश सांबरेंनी सोमवारपासून सुरु केलेल्या उपोषणाला सर्वस्तरामधून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. या उपोषणाचा धसका घेत सुप्रीमो कंपनी कडून वाडा-मनोर रस्त्याच्या कामालाही आज सुरु वात ही करण्यात आली.या महामार्गाचे २ वर्षामध्ये म्हणजे २०११ मध्ये या भिवंडी-वाडा-मनोर महामार्गाचे काम पूर्ण करणे अपेक्षित असताना ते पूर्ण झाले नाही. त्यामुळे कंपनीला शासनाने सहा महिन्यांची वाढ दिली. तरीही कंपनीने शासनाच्या आदेशाला जुमानले नाही.आजही या रस्त्यांची कामे अपूर्णावस्थेत असताना भिवंडी-वाडा-मनोर महामार्गावरील भिवंडी-वाडा या ४२ किमी अंतरावर कवाड येथे एक तर वाडा-मनोर या २२ किमी अंतरावर वाघोटे येथे एक असे २ टोल सुरु करून वसुली सुरु केली.या निकृष्ट कामाचा फटका बसून ३ वर्षामध्ये १४१ अपघाती मृत्यू तर १३५ जणांना कायमचे अपंगत्व आले असून १५०० हून अधिक जखमी झाले आहेत.भिवंडी-वाडा-मनोर महामार्गावरील नित्कृष्ट दर्जाचे, अपूर्ण काम व या मार्गावर सतत होणारे अपघात याबाबत स्थानिक संस्था, संघटना यांनी शासन व प्रशासन यांच्याकडे सुप्रीम कंपनीची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यासाठीची आंदोलने अपयशी ठरली सोमवारी सकाळी १० वाजल्या पासूनच हजारोंच्या संख्येने लोक,अपघातग्रस्तांचे नातेवाईक,अंध-अपंग विद्यार्थी,लोकप्रतिनिधी ई. नी या उपोषणाला पाठिंबा दर्शविला. पालघर जिल्ह्यात प्रथमच असे दृश्य पहायला मिळाले. एवढ्या मोठ्या संख्येने लोक पाठिंब्या साठी आल्याने वाहतुकीवर त्याचा थोडा परिणाम झाला.त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. (वार्ताहर)