शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

सांबरेंच्या उपोषणाला व्यापक पाठिंबा

By admin | Updated: August 23, 2016 03:15 IST

निलेश सांबरेंनी सोमवारपासून सुरु केलेल्या उपोषणाला सर्वस्तरामधून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.

पालघर : सुप्रीमो कंपनीच्या निकृष्ट कामामुळे निष्पापांचे गेलेले बळी आणि त्या कंपनीच्या बेकायदेशीर कामाबाबत पुरावे देऊनही अधिकाऱ्यांच्या असलेल्या भक्कम पाठिंब्यामुळे त्या कंपनी वर कुठलीही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ निलेश सांबरेंनी सोमवारपासून सुरु केलेल्या उपोषणाला सर्वस्तरामधून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. या उपोषणाचा धसका घेत सुप्रीमो कंपनी कडून वाडा-मनोर रस्त्याच्या कामालाही आज सुरु वात ही करण्यात आली.या महामार्गाचे २ वर्षामध्ये म्हणजे २०११ मध्ये या भिवंडी-वाडा-मनोर महामार्गाचे काम पूर्ण करणे अपेक्षित असताना ते पूर्ण झाले नाही. त्यामुळे कंपनीला शासनाने सहा महिन्यांची वाढ दिली. तरीही कंपनीने शासनाच्या आदेशाला जुमानले नाही.आजही या रस्त्यांची कामे अपूर्णावस्थेत असताना भिवंडी-वाडा-मनोर महामार्गावरील भिवंडी-वाडा या ४२ किमी अंतरावर कवाड येथे एक तर वाडा-मनोर या २२ किमी अंतरावर वाघोटे येथे एक असे २ टोल सुरु करून वसुली सुरु केली.या निकृष्ट कामाचा फटका बसून ३ वर्षामध्ये १४१ अपघाती मृत्यू तर १३५ जणांना कायमचे अपंगत्व आले असून १५०० हून अधिक जखमी झाले आहेत.भिवंडी-वाडा-मनोर महामार्गावरील नित्कृष्ट दर्जाचे, अपूर्ण काम व या मार्गावर सतत होणारे अपघात याबाबत स्थानिक संस्था, संघटना यांनी शासन व प्रशासन यांच्याकडे सुप्रीम कंपनीची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यासाठीची आंदोलने अपयशी ठरली सोमवारी सकाळी १० वाजल्या पासूनच हजारोंच्या संख्येने लोक,अपघातग्रस्तांचे नातेवाईक,अंध-अपंग विद्यार्थी,लोकप्रतिनिधी ई. नी या उपोषणाला पाठिंबा दर्शविला. पालघर जिल्ह्यात प्रथमच असे दृश्य पहायला मिळाले. एवढ्या मोठ्या संख्येने लोक पाठिंब्या साठी आल्याने वाहतुकीवर त्याचा थोडा परिणाम झाला.त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. (वार्ताहर)