शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

पेरण्या लांबल्याने पीक विम्याला मुदतवाढ

By admin | Updated: August 2, 2015 02:55 IST

पावसाअभावी राज्यात अनेक भागात पेरण्याच झालेल्या नाहीत. त्यामुळे १ ते ७ आॅगस्ट या काळात पेरण्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विमा योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला

पुणे : पावसाअभावी राज्यात अनेक भागात पेरण्याच झालेल्या नाहीत. त्यामुळे १ ते ७ आॅगस्ट या काळात पेरण्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विमा योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी दिली. राष्ट्रीय कृषी विमा योजनेत यापूर्वी विम्यासाठी ३१ जुलैची मुदत होती; परंतु राज्याच्या अनेक भागात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या मुदतीत पेरण्याच करता आलेल्या नाहीत. पेरण्या केल्याशिवाय पीक विमा उतरविता येत नाही. शेतकऱ्यांची ही अडचण विचारात घेऊन कृषी विभागाने विमा योजनेला मुदतवाढ मिळण्याचा प्रस्ताव सरकारला सादर केला होता. त्यानुसार ही सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.३१ जुलैपूर्वी पेरण्या झालेल्या शेतकऱ्यांना या मुदतवाढीचा लाभ मिळणार नाही. जे शेतकरी १ ते ७ आॅगस्ट या काळात पेरण्या करतील, त्यांनाच या योजनेत सहभागी होता येईल. हे विमा संरक्षणही उंबरठा उत्पन्न पातळीपर्यंतच देय राहणार आहे. शेतकऱ्यांनी विम्याचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी तातडीने कृषी कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी संचालक कृष्णराव देशमुख यांनी केले आहे. विम्याबाबत जनजागृती मागील वर्षी राज्यात ४४ लाख ७९ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला होता. त्यापैकी ३४ लाख २६ हजार शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला. पीक विम्याच्या भरपाईपोटी शेतकऱ्यांना १ हजार ५९४ कोटी रुपये मिळाले. आजपर्यंतचा हा विक्रमी लाभ आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी करण्यासाठी कृषी विभागाने कृषी दिनाच्या जनजागृती सप्ताहात मोठ्या प्रमाणावर प्रबोधन केले असल्याचे मुख्य सांख्यिकी अधिकारी अनिल बनसोडे यांनी सांगितले.पेरणीसंबंधीचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यकराष्ट्रीय कृषी विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाच्या हप्त्याच्या मुदतीला (कट आॅफ डेट) केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी ७ आॅगस्ट २०१५ पर्यंत मुदत वाढ दिल्याची माहिती कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.खडसे म्हणाले, राज्य शासनाने केंद्राला लेखी पत्र पाठवून विम्याचे हप्ते भरण्यासाठी किमान १५ दिवस मुदत वाढवून मिळावी, अशी विनंती केली होती. मात्र, केंद्राने काल ३१ जुलै राजी पत्र पाठवून ही मुदत अर्थात कटआॅफ डेट ७ आॅगस्ट पर्यंत वाढवल्याचे पत्र पाठवले आहे. या पत्रात स्पष्टकेले आहे की, विशेष बाब म्हणून काही अटींच्या अधिन राहून ही मुदत वाढ देण्यात आली आहे.लाभार्थी शेतकऱ्यांनी वाढीव मुदतीच्या काळात पीक विम्यासंबंधीचे प्रस्ताव संबंधित बँकेकडे आणि संबंधित यंत्रणेकडे नेहमी प्रमाणे पाठवावेत. तसेच, त्या सोबत संबंधित प्राधिकाऱ्याने दिलेले पेरणीसंबंधीचे प्रमाणपत्रही जोडावे असेही खडसे यांनी स्पष्ट केले.