शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पेरण्या लांबल्याने पीक विम्याला मुदतवाढ

By admin | Updated: August 2, 2015 02:55 IST

पावसाअभावी राज्यात अनेक भागात पेरण्याच झालेल्या नाहीत. त्यामुळे १ ते ७ आॅगस्ट या काळात पेरण्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विमा योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला

पुणे : पावसाअभावी राज्यात अनेक भागात पेरण्याच झालेल्या नाहीत. त्यामुळे १ ते ७ आॅगस्ट या काळात पेरण्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विमा योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी दिली. राष्ट्रीय कृषी विमा योजनेत यापूर्वी विम्यासाठी ३१ जुलैची मुदत होती; परंतु राज्याच्या अनेक भागात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या मुदतीत पेरण्याच करता आलेल्या नाहीत. पेरण्या केल्याशिवाय पीक विमा उतरविता येत नाही. शेतकऱ्यांची ही अडचण विचारात घेऊन कृषी विभागाने विमा योजनेला मुदतवाढ मिळण्याचा प्रस्ताव सरकारला सादर केला होता. त्यानुसार ही सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.३१ जुलैपूर्वी पेरण्या झालेल्या शेतकऱ्यांना या मुदतवाढीचा लाभ मिळणार नाही. जे शेतकरी १ ते ७ आॅगस्ट या काळात पेरण्या करतील, त्यांनाच या योजनेत सहभागी होता येईल. हे विमा संरक्षणही उंबरठा उत्पन्न पातळीपर्यंतच देय राहणार आहे. शेतकऱ्यांनी विम्याचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी तातडीने कृषी कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी संचालक कृष्णराव देशमुख यांनी केले आहे. विम्याबाबत जनजागृती मागील वर्षी राज्यात ४४ लाख ७९ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला होता. त्यापैकी ३४ लाख २६ हजार शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला. पीक विम्याच्या भरपाईपोटी शेतकऱ्यांना १ हजार ५९४ कोटी रुपये मिळाले. आजपर्यंतचा हा विक्रमी लाभ आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी करण्यासाठी कृषी विभागाने कृषी दिनाच्या जनजागृती सप्ताहात मोठ्या प्रमाणावर प्रबोधन केले असल्याचे मुख्य सांख्यिकी अधिकारी अनिल बनसोडे यांनी सांगितले.पेरणीसंबंधीचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यकराष्ट्रीय कृषी विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाच्या हप्त्याच्या मुदतीला (कट आॅफ डेट) केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी ७ आॅगस्ट २०१५ पर्यंत मुदत वाढ दिल्याची माहिती कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.खडसे म्हणाले, राज्य शासनाने केंद्राला लेखी पत्र पाठवून विम्याचे हप्ते भरण्यासाठी किमान १५ दिवस मुदत वाढवून मिळावी, अशी विनंती केली होती. मात्र, केंद्राने काल ३१ जुलै राजी पत्र पाठवून ही मुदत अर्थात कटआॅफ डेट ७ आॅगस्ट पर्यंत वाढवल्याचे पत्र पाठवले आहे. या पत्रात स्पष्टकेले आहे की, विशेष बाब म्हणून काही अटींच्या अधिन राहून ही मुदत वाढ देण्यात आली आहे.लाभार्थी शेतकऱ्यांनी वाढीव मुदतीच्या काळात पीक विम्यासंबंधीचे प्रस्ताव संबंधित बँकेकडे आणि संबंधित यंत्रणेकडे नेहमी प्रमाणे पाठवावेत. तसेच, त्या सोबत संबंधित प्राधिकाऱ्याने दिलेले पेरणीसंबंधीचे प्रमाणपत्रही जोडावे असेही खडसे यांनी स्पष्ट केले.