शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

पेरण्या लांबल्याने पीक विम्याला मुदतवाढ

By admin | Updated: August 2, 2015 02:55 IST

पावसाअभावी राज्यात अनेक भागात पेरण्याच झालेल्या नाहीत. त्यामुळे १ ते ७ आॅगस्ट या काळात पेरण्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विमा योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला

पुणे : पावसाअभावी राज्यात अनेक भागात पेरण्याच झालेल्या नाहीत. त्यामुळे १ ते ७ आॅगस्ट या काळात पेरण्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विमा योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी दिली. राष्ट्रीय कृषी विमा योजनेत यापूर्वी विम्यासाठी ३१ जुलैची मुदत होती; परंतु राज्याच्या अनेक भागात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या मुदतीत पेरण्याच करता आलेल्या नाहीत. पेरण्या केल्याशिवाय पीक विमा उतरविता येत नाही. शेतकऱ्यांची ही अडचण विचारात घेऊन कृषी विभागाने विमा योजनेला मुदतवाढ मिळण्याचा प्रस्ताव सरकारला सादर केला होता. त्यानुसार ही सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.३१ जुलैपूर्वी पेरण्या झालेल्या शेतकऱ्यांना या मुदतवाढीचा लाभ मिळणार नाही. जे शेतकरी १ ते ७ आॅगस्ट या काळात पेरण्या करतील, त्यांनाच या योजनेत सहभागी होता येईल. हे विमा संरक्षणही उंबरठा उत्पन्न पातळीपर्यंतच देय राहणार आहे. शेतकऱ्यांनी विम्याचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी तातडीने कृषी कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी संचालक कृष्णराव देशमुख यांनी केले आहे. विम्याबाबत जनजागृती मागील वर्षी राज्यात ४४ लाख ७९ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला होता. त्यापैकी ३४ लाख २६ हजार शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला. पीक विम्याच्या भरपाईपोटी शेतकऱ्यांना १ हजार ५९४ कोटी रुपये मिळाले. आजपर्यंतचा हा विक्रमी लाभ आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी करण्यासाठी कृषी विभागाने कृषी दिनाच्या जनजागृती सप्ताहात मोठ्या प्रमाणावर प्रबोधन केले असल्याचे मुख्य सांख्यिकी अधिकारी अनिल बनसोडे यांनी सांगितले.पेरणीसंबंधीचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यकराष्ट्रीय कृषी विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाच्या हप्त्याच्या मुदतीला (कट आॅफ डेट) केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी ७ आॅगस्ट २०१५ पर्यंत मुदत वाढ दिल्याची माहिती कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.खडसे म्हणाले, राज्य शासनाने केंद्राला लेखी पत्र पाठवून विम्याचे हप्ते भरण्यासाठी किमान १५ दिवस मुदत वाढवून मिळावी, अशी विनंती केली होती. मात्र, केंद्राने काल ३१ जुलै राजी पत्र पाठवून ही मुदत अर्थात कटआॅफ डेट ७ आॅगस्ट पर्यंत वाढवल्याचे पत्र पाठवले आहे. या पत्रात स्पष्टकेले आहे की, विशेष बाब म्हणून काही अटींच्या अधिन राहून ही मुदत वाढ देण्यात आली आहे.लाभार्थी शेतकऱ्यांनी वाढीव मुदतीच्या काळात पीक विम्यासंबंधीचे प्रस्ताव संबंधित बँकेकडे आणि संबंधित यंत्रणेकडे नेहमी प्रमाणे पाठवावेत. तसेच, त्या सोबत संबंधित प्राधिकाऱ्याने दिलेले पेरणीसंबंधीचे प्रमाणपत्रही जोडावे असेही खडसे यांनी स्पष्ट केले.