शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

सहवीजमधील वीज खरेदीसाठी तज्ज्ञ समिती

By admin | Updated: July 2, 2017 00:04 IST

शासनाचा निर्णय : दराचाही अभ्यास; धोरण निश्चित करण्यास मदत

विश्वास पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : साखर कारखान्यांनी सहवीज प्रकल्पांतून तयार केलेली वीज खरेदी व त्या विजेचा दर किती असावा, याचा अभ्यास करण्यासाठी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. त्यासंबंधीचा आदेश सहकार विभागाने गुरुवारी काढला. सध्या कारखान्यांतून १३५५ मेगावॅट वीजनिर्मिती होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ९ एप्रिलला साखर उद्योगाच्या प्रश्नासंबंधी बैठक झाली. त्यामध्ये अशी समिती नेमण्याचा निर्णय झाला होता; त्यानुसार ही समिती नियुक्त करण्यात आली. राज्यात मागच्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर भारनियमन होत होते. त्यावेळी राज्यासाठी प्रतिदिन किमान ११०० मेगावॅट विजेचा तुटवडा होता. नव्याने वीजनिर्मितीसाठी प्रचंड भांडवल गुंतवणूक तर करावीच लागते व त्यासाठी काही वर्षे प्रकल्प उभारणीसाठी जातात. त्यावर पर्याय म्हणून काँग्रेस आघाडीच्या सरकारने राज्यात साखर कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पांना प्रोत्साहन दिले. शासन अशा प्रकल्पासाठी ५ टक्के भाग भांडवल देत होते. ५ टक्के भांडवल कारखान्याने घालायचे व उर्वरित ९० टक्के कर्ज काढून प्रकल्प उभारण्यात आले. असे प्रकल्प केलेल्या कारखान्यांचा ऊस खरेदी करही शासनाने माफ केला. कारखान्यांना एक मेगावॅट वीजनिर्मितीसाठी किमान ५ कोटींचा खर्च येतो. त्याशिवाय जुन्या कारखान्यांना आधुनिकीकरण करावे लागते. या सर्वांसाठी किमान ७० ते ८० कोटींची गुंतवणूक होते. राज्यात सरासरी १२ ते २२ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेचे प्रकल्प झाले आहेत; परंतु आता महावितरण नव्याने झालेल्या प्रकल्पांतून वीज खरेदीचे करारच करायला तयार नाही. परवाच्या उन्हाळ््यात राज्याची विजेची सर्वाधिक मागणी २३ हजार मेगावॅटपर्यंत गेली होती; परंतु पॉवरग्रीडमधून केंद्र सरकारकडून वीज घेऊन राज्यात टंचाई जाणवू दिली नाही. आता तर मागणीइतकीच वीज उपलब्ध आहे. त्यामुळे महावितरण कारखान्यांशी करार करण्यास तयार नाही, म्हणजे राज्याला गरज होती तेव्हा तुम्ही प्रोत्साहन दिले आणि आता प्रचंड भांडवली गुंतवणूक केल्यावर आम्हाला वीज नको, अशी भूमिका राज्य सरकार घेत आहे. त्यातून साखर उद्योगाची कोंडी होत आहे. जुन्या प्रकल्पांतून महावितरण आता ४ रुपये २५ पैसे दराने वीज खरेदी करते. हा दर एकेकाळी ६ रुपये ५७ पैसे असा होता तेवढ्यावरच सरकार थांबलेले नाही. जे कारखाने वीजनिर्मिती करतात व त्यातील काही स्वत: वापरतात त्यांनी वापरलेल्या विजेपोटी युनिटला १ रुपये २० पैसे सरकारला दिले पाहिजेत, असा आग्रह आहे. त्यातून प्रत्येक कारखान्यास किमान ३ कोटी रुपयांचा भुर्दंड बसत आहे, असे दोन-तीन महत्त्वाचे प्रश्न या प्रकल्पाच्या निमित्ताने तयार झाले आहेत. त्याचा अभ्यास करून ही समिती शासनाला धोरण निश्चित करण्यास मदत करेल.एका नजरेत..राज्यातील १०३ कारखान्यांमध्ये सहवीज प्रकल्पांची उभारणी झाली असून २०१५-१६ च्या हंगामात त्यांनी १४३० कोटी रुपयांची वीज ‘महावितरण’ला पुरवल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. नव्याने सुमारे दहाहून जास्त प्रकल्पांची उभारणी झाली आहे.अशी आहे समिती..अध्यक्ष : प्रधान सचिव (ऊर्जा) सदस्य : अपर मुख्य सचिव (सहकार), साखर आयुक्त, कार्यकारी संचालक एमएसईबी सूत्रधार कंपनी, कार्यकारी संचालक महावितरण कंपनी, महाव्यवस्थापक महाऊर्जा, मुख्य अभियंता - व्हीएसआय, कार्यकारी संचालक साखर संघ, वेस्ट इंडियन शुगर मिल असोसिएशनचा प्रतिनिधी. या समितीचे ऊर्जा उपसचिव हे सदस्य सचिव असतील; परंतु या समितीने अहवाल किती दिवसांत द्यावा, या संबंधीचा कालावधी मात्र शासनाने निश्चित केलेला नाही.