शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

युती सरकारकडूनच अपेक्षा

By admin | Updated: September 20, 2016 01:34 IST

निष्क्रिय आघाडी सरकारच्या काळात आपले प्रश्न सुटणार नाहीत, याची जनतेला खात्री होती.

पुणे : निष्क्रिय आघाडी सरकारच्या काळात आपले प्रश्न सुटणार नाहीत, याची जनतेला खात्री होती. त्यामुळेच मराठी समाजाने आघाडी शासनाच्या काळात मोर्चे काढले नाहीत. युती सरकारवर त्यांचा विश्वास असून, आपले प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा असल्यानेच मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत, असा दावा जलसंपदामंत्री प्रा. राम शिंदे यांनी येथे केला.जलयुक्त शिवार योजनेची पुणे विभागाची आढावा बैठक प्रा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी विधान भवन येथे झाली. यावेळी पत्रकारांनी मराठा समाजाच्या मोर्चांबाबत विचारले असता त्यांनी स्पष्टीकरण दिले. ‘आघाडी सरकारने पंधरा वर्षांत काहीच केले नाही. युती सरकार आल्यानंतर दोन वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याला प्रगतिपथावर नेण्याचा काम सध्या सुरूआहे. कोपर्डी येथील घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचेही प्रा. शिंदे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, कोपर्डीतील ग्रामस्थ आणि पीडित कुटुंबीयांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचेही प्रा. शिंदे यांनी सांगितले. खटला द्रुतगती न्यायालयात चालविण्यात येणार असून सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक केली आहे. तसेच या खटल्यावर पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या नियंत्रणाखाली चालविला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)>आघाडी सरकारने भिजत ठेवलेल्या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या स्मारकाच्या प्रश्नाला युती सरकारने गती दिली. इंदू मिलच्या जागेचा प्रश्न सोडवला. सरकारने केलेली ही कामे विरोधकांना पाहावत नाहीत. राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बलांचेही प्रश्न आहेत. मुख्यमंत्री मोठ्या तडफेने सर्व प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेत आहेत. मराठा समाजाच्या प्रश्नाबाबत चर्चेची तयारी मुख्यमंत्र्यांनी दर्शविली आहे.