शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

युती सरकारकडूनच अपेक्षा

By admin | Updated: September 20, 2016 01:34 IST

निष्क्रिय आघाडी सरकारच्या काळात आपले प्रश्न सुटणार नाहीत, याची जनतेला खात्री होती.

पुणे : निष्क्रिय आघाडी सरकारच्या काळात आपले प्रश्न सुटणार नाहीत, याची जनतेला खात्री होती. त्यामुळेच मराठी समाजाने आघाडी शासनाच्या काळात मोर्चे काढले नाहीत. युती सरकारवर त्यांचा विश्वास असून, आपले प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा असल्यानेच मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत, असा दावा जलसंपदामंत्री प्रा. राम शिंदे यांनी येथे केला.जलयुक्त शिवार योजनेची पुणे विभागाची आढावा बैठक प्रा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी विधान भवन येथे झाली. यावेळी पत्रकारांनी मराठा समाजाच्या मोर्चांबाबत विचारले असता त्यांनी स्पष्टीकरण दिले. ‘आघाडी सरकारने पंधरा वर्षांत काहीच केले नाही. युती सरकार आल्यानंतर दोन वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याला प्रगतिपथावर नेण्याचा काम सध्या सुरूआहे. कोपर्डी येथील घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचेही प्रा. शिंदे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, कोपर्डीतील ग्रामस्थ आणि पीडित कुटुंबीयांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचेही प्रा. शिंदे यांनी सांगितले. खटला द्रुतगती न्यायालयात चालविण्यात येणार असून सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक केली आहे. तसेच या खटल्यावर पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या नियंत्रणाखाली चालविला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)>आघाडी सरकारने भिजत ठेवलेल्या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या स्मारकाच्या प्रश्नाला युती सरकारने गती दिली. इंदू मिलच्या जागेचा प्रश्न सोडवला. सरकारने केलेली ही कामे विरोधकांना पाहावत नाहीत. राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बलांचेही प्रश्न आहेत. मुख्यमंत्री मोठ्या तडफेने सर्व प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेत आहेत. मराठा समाजाच्या प्रश्नाबाबत चर्चेची तयारी मुख्यमंत्र्यांनी दर्शविली आहे.