शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
3
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
4
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
5
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
6
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
7
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
8
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
9
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
10
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
11
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
12
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
13
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
14
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
15
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
16
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
17
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
18
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
19
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
20
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना

मंत्रिमंडळ विस्तार महिन्याअखेर

By admin | Updated: November 10, 2015 02:44 IST

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी कोणत्याही परिस्थितीत केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे सांगितले व या विस्तारात मित्रपक्षांना संधी दिली जाईल

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी कोणत्याही परिस्थितीत केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे सांगितले व या विस्तारात मित्रपक्षांना संधी दिली जाईल, असे संकेतही त्यांनी दिले.दिवाळीनिमित्त ‘वर्षा’ निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मंत्रिमंडळ विस्तारासाठी भाजपाच्या श्रेष्ठींनी आपल्याला परवानगी दिली आहे. मात्र, बिहार विधानसभा व कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर, शिवसेनेसोबत सरकारमध्ये काही अडचणी येतील, याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली.विधिमंडळाचे नागपूर अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होत असून, त्यापूर्वी विस्तार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील घराचे लोकार्पण १४ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री १७ नोव्हेंबरला भारतात परतणार आहेत. याचा अर्थ चालू महिन्याअखेर विस्तार होईल, असे मानले जात आहे.फडणवीस मंत्रिमंडळात नियमानुसार ४३ सदस्य असू शकतात. सध्या मुख्यमंत्र्यांसह ३० मंत्री असून, १३ मंत्रिपदे रिक्त आहेत. ‘कल्याण-डोंबिवलीत आम्ही शिवसेनेची मदत न घेता सत्ता स्थापन करू शकलो असतो, तशी आमची तयारीही होती. मात्र, शिवसेनेकडून मला संपर्क करण्यात आला आणि युतीचा प्रस्ताव आल्यानंतर युतीबाबतचा निर्णय झाला,’ असे मुख्यमंत्री म्हणाले. नागपूर अधिवेशन केवळ दोन आठवड्यांत गुंडाळले जात आहे, याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, ‘ते तिसऱ्या आठवड्यापर्यंतही वाढविले जाऊ शकते.’ सरकारी अधिकारी राज्य सरकारला सहकार्य करीत नसल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच व्यक्त केली होती. या बाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, मंत्रालय ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतचे ७० टक्के अधिकारी सहकार्य करतात, पण जिल्हाधिकाऱ्यांच्या खालचे ५० टक्के अधिकारी नीट सहकार्य करीत नाहीत, असे निदर्शनास येते. (विशेष प्रतिनिधी)छोटा राजन प्रकरणी पोलिसांच्या नाराजीचा इन्कारछोटा राजन प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करण्यामागे मुंबई पोलिसांवरील अविश्वास हे कारण होते, या आरोपाचा मुख्यमंत्र्यांनी इन्कार केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी तासभर चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला आणि पुढील तपासामध्ये मुंबई पोलिसांची भूमिका राहणार आहेच. त्यामुळे पोलिसांची कुठलीही नाराजी नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई पोलिसातील काही अधिकाऱ्यांचा दाऊदशी संबंध असल्याचा आरोप छोटा राजनने केल्याने प्रकरण सीबीआयला दिले का, या प्रश्नात मुख्यमंत्री म्हणाले की, ‘तसे काहीही नाही. एखादा आरोपी आरोप करतो, म्हणून यंत्रणेवर अविश्वास ठेवण्याची भूमिका आम्हाला घेता येणार नाही.’बेजबाबदारपणा करणारा शासकीय अधिकारी कितीही मोठा असला, तरी त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. नोकरशाहीबाबतची नाराजी आपण जाहीरपणे व्यक्त करीत आहोत. कारण राज्यकर्त्यांना अंधारात ठेवून ते मूर्ख बनवू शकत नाहीत, याची जाणीव त्यांना असणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.