शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
9
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
10
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
11
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
12
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
13
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
14
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
15
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
16
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
17
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
18
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
19
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
20
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?

परीक्षा पध्दती बदलणार

By admin | Updated: May 26, 2016 02:19 IST

नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट) च्या गोंधळानंतर राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम व परीक्षा पद्धतीतही बदलाचे वारे वाहू लागले आहेत. अभ्यासक्रमात बदल

पुणे : नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट) च्या गोंधळानंतर राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम व परीक्षा पद्धतीतही बदलाचे वारे वाहू लागले आहेत. अभ्यासक्रमात बदल करणे यंदा शक्य नसल्याने परीक्षा पद्धतीत काही तातडीचे बदल करण्यासंदर्भात निर्णय होऊ शकतो. याबाबत दहावीच्या निकालानंतर तज्ज्ञांची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी दिली.दहावीच्या निकालानंतर मंडळामध्ये तज्ज्ञांची बैठक घेतली जाणार आहे. अकरावी व बारावीच्या सीबीएसई व मंडळाच्या अभ्यासक्रमात फारसा फरक नाही. जवळपास सारखाच अभ्यासक्रम असला तरी सीबीएसईमध्ये अनेक संकल्पना विस्तृतपणे देण्यात आल्या आहेत. एका वर्षात अभ्यासक्रम बदलता येत नाही. सीबीएसईचा अभ्यासक्रम तसेच परीक्षा पद्धतीची माहिती घेऊन त्यानुसार निर्णय घेतला जाईल, असेही म्हमाणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)दीड हजार निकाल राखीव विविध कारणास्तव १ हजार ५६२ विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत. त्यात औरंगाबाद विभागात परीक्षेदरम्यान गैरप्रकार झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणी पोलिसांनी काहींना अटक केली होती. त्यामुळे राज्य मंडळातर्फे औरंगाबाद विभागातील सर्वाधिक ९७३ विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले आहेत. तसेच पुणे विभागातील ९८, नागपूरमधील ३६२, मुंबईतील ८२,कोल्हापूरमधील १३ आणि लातूर मधील २४ विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले आहेत. त्याच प्रमाणे कॉपी व अन्य कारणास्तव ७१४ विद्यार्थ्यांचे निकाल रद्द करण्यात आले. खेळाडूंना गुणाची सवलतखेळाडूंना उत्तेजन देण्यासाठी विशेष गुण देण्यात आले. राज्यातील दोन हजार ५३७ बारावीच्या विद्यार्थ्यांना विविध स्तरावर कौशल्य दाखविल्याबद्दल गुणांचा लाभ मिळाला. त्यात पुणे विभागात सर्वाधिक ४५० नागपूर ३०३, औरंगाबाद २१२, मुंबई २९४, कोल्हापूर व अमरावती ३०० नाशिक ३३८ लातूर २९९ तर कोकण विभागातील ३२ विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांचा फायदा मिळाला.दिव्यांग विद्यार्थ्यांचे लक्षणीय यशबारावीच्या परीक्षेत दिव्यांग विद्यार्थ्यांनी लक्षणीय यश मिळविले आहे. विविध व्यंग असणाऱ्या या विद्यार्थ्यांचा राज्यभरातील निकाल ८९.६१ टक्के इतका लागला आहे.अंध, बहिरे, मुके, शारीरिक व्यंग असणारे, डायलेक्झिया, मेंदूचा पक्षाघात, आॅटीझमग्रस्त, सेलेब्रल पाल्सी हा आजार असलेले आणि मतिमंद मुलांचा दिव्यांगामध्ये समावेश होतो. राज्यभरातून असे पाच हजार ६११ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यातील पाच हजार २८ जणांनी यशस्वीपणे हा टप्पा पार केला आहे.विभागपरीक्षेस बसलेलेपास झालेलेटक्केवारीअंध११७५१०९६९३.२८कर्णबधीर८२४६३०७६.४६मुके१०९८४७७.०६शारीरिक व्यंग२१६४१९५२९०.२०मेंदूचा पक्षाघात८२७५९१.४६डायलेक्झिया१०७३१०२३९५. २६आॅटीझम१३१३१००सेलेब्रल पाल्सी७८७०८९.७४मतिमंद९३८५९१.४०एकूण५६११५०२८८९.६१बारावीची गेल्या पाच वर्षांची निकालाची टक्केवारीवर्षनिकालाची टक्केवारी २०१२७४.४६ २०१३७९.९५२०१४९०.०३२०१५९१.२६२०१६८६.६०