शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा पध्दती बदलणार

By admin | Updated: May 26, 2016 02:19 IST

नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट) च्या गोंधळानंतर राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम व परीक्षा पद्धतीतही बदलाचे वारे वाहू लागले आहेत. अभ्यासक्रमात बदल

पुणे : नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट) च्या गोंधळानंतर राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम व परीक्षा पद्धतीतही बदलाचे वारे वाहू लागले आहेत. अभ्यासक्रमात बदल करणे यंदा शक्य नसल्याने परीक्षा पद्धतीत काही तातडीचे बदल करण्यासंदर्भात निर्णय होऊ शकतो. याबाबत दहावीच्या निकालानंतर तज्ज्ञांची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी दिली.दहावीच्या निकालानंतर मंडळामध्ये तज्ज्ञांची बैठक घेतली जाणार आहे. अकरावी व बारावीच्या सीबीएसई व मंडळाच्या अभ्यासक्रमात फारसा फरक नाही. जवळपास सारखाच अभ्यासक्रम असला तरी सीबीएसईमध्ये अनेक संकल्पना विस्तृतपणे देण्यात आल्या आहेत. एका वर्षात अभ्यासक्रम बदलता येत नाही. सीबीएसईचा अभ्यासक्रम तसेच परीक्षा पद्धतीची माहिती घेऊन त्यानुसार निर्णय घेतला जाईल, असेही म्हमाणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)दीड हजार निकाल राखीव विविध कारणास्तव १ हजार ५६२ विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत. त्यात औरंगाबाद विभागात परीक्षेदरम्यान गैरप्रकार झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणी पोलिसांनी काहींना अटक केली होती. त्यामुळे राज्य मंडळातर्फे औरंगाबाद विभागातील सर्वाधिक ९७३ विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले आहेत. तसेच पुणे विभागातील ९८, नागपूरमधील ३६२, मुंबईतील ८२,कोल्हापूरमधील १३ आणि लातूर मधील २४ विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले आहेत. त्याच प्रमाणे कॉपी व अन्य कारणास्तव ७१४ विद्यार्थ्यांचे निकाल रद्द करण्यात आले. खेळाडूंना गुणाची सवलतखेळाडूंना उत्तेजन देण्यासाठी विशेष गुण देण्यात आले. राज्यातील दोन हजार ५३७ बारावीच्या विद्यार्थ्यांना विविध स्तरावर कौशल्य दाखविल्याबद्दल गुणांचा लाभ मिळाला. त्यात पुणे विभागात सर्वाधिक ४५० नागपूर ३०३, औरंगाबाद २१२, मुंबई २९४, कोल्हापूर व अमरावती ३०० नाशिक ३३८ लातूर २९९ तर कोकण विभागातील ३२ विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांचा फायदा मिळाला.दिव्यांग विद्यार्थ्यांचे लक्षणीय यशबारावीच्या परीक्षेत दिव्यांग विद्यार्थ्यांनी लक्षणीय यश मिळविले आहे. विविध व्यंग असणाऱ्या या विद्यार्थ्यांचा राज्यभरातील निकाल ८९.६१ टक्के इतका लागला आहे.अंध, बहिरे, मुके, शारीरिक व्यंग असणारे, डायलेक्झिया, मेंदूचा पक्षाघात, आॅटीझमग्रस्त, सेलेब्रल पाल्सी हा आजार असलेले आणि मतिमंद मुलांचा दिव्यांगामध्ये समावेश होतो. राज्यभरातून असे पाच हजार ६११ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यातील पाच हजार २८ जणांनी यशस्वीपणे हा टप्पा पार केला आहे.विभागपरीक्षेस बसलेलेपास झालेलेटक्केवारीअंध११७५१०९६९३.२८कर्णबधीर८२४६३०७६.४६मुके१०९८४७७.०६शारीरिक व्यंग२१६४१९५२९०.२०मेंदूचा पक्षाघात८२७५९१.४६डायलेक्झिया१०७३१०२३९५. २६आॅटीझम१३१३१००सेलेब्रल पाल्सी७८७०८९.७४मतिमंद९३८५९१.४०एकूण५६११५०२८८९.६१बारावीची गेल्या पाच वर्षांची निकालाची टक्केवारीवर्षनिकालाची टक्केवारी २०१२७४.४६ २०१३७९.९५२०१४९०.०३२०१५९१.२६२०१६८६.६०