शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

परीक्षा पध्दती बदलणार

By admin | Updated: May 26, 2016 02:19 IST

नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट) च्या गोंधळानंतर राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम व परीक्षा पद्धतीतही बदलाचे वारे वाहू लागले आहेत. अभ्यासक्रमात बदल

पुणे : नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट) च्या गोंधळानंतर राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम व परीक्षा पद्धतीतही बदलाचे वारे वाहू लागले आहेत. अभ्यासक्रमात बदल करणे यंदा शक्य नसल्याने परीक्षा पद्धतीत काही तातडीचे बदल करण्यासंदर्भात निर्णय होऊ शकतो. याबाबत दहावीच्या निकालानंतर तज्ज्ञांची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी दिली.दहावीच्या निकालानंतर मंडळामध्ये तज्ज्ञांची बैठक घेतली जाणार आहे. अकरावी व बारावीच्या सीबीएसई व मंडळाच्या अभ्यासक्रमात फारसा फरक नाही. जवळपास सारखाच अभ्यासक्रम असला तरी सीबीएसईमध्ये अनेक संकल्पना विस्तृतपणे देण्यात आल्या आहेत. एका वर्षात अभ्यासक्रम बदलता येत नाही. सीबीएसईचा अभ्यासक्रम तसेच परीक्षा पद्धतीची माहिती घेऊन त्यानुसार निर्णय घेतला जाईल, असेही म्हमाणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)दीड हजार निकाल राखीव विविध कारणास्तव १ हजार ५६२ विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत. त्यात औरंगाबाद विभागात परीक्षेदरम्यान गैरप्रकार झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणी पोलिसांनी काहींना अटक केली होती. त्यामुळे राज्य मंडळातर्फे औरंगाबाद विभागातील सर्वाधिक ९७३ विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले आहेत. तसेच पुणे विभागातील ९८, नागपूरमधील ३६२, मुंबईतील ८२,कोल्हापूरमधील १३ आणि लातूर मधील २४ विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले आहेत. त्याच प्रमाणे कॉपी व अन्य कारणास्तव ७१४ विद्यार्थ्यांचे निकाल रद्द करण्यात आले. खेळाडूंना गुणाची सवलतखेळाडूंना उत्तेजन देण्यासाठी विशेष गुण देण्यात आले. राज्यातील दोन हजार ५३७ बारावीच्या विद्यार्थ्यांना विविध स्तरावर कौशल्य दाखविल्याबद्दल गुणांचा लाभ मिळाला. त्यात पुणे विभागात सर्वाधिक ४५० नागपूर ३०३, औरंगाबाद २१२, मुंबई २९४, कोल्हापूर व अमरावती ३०० नाशिक ३३८ लातूर २९९ तर कोकण विभागातील ३२ विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांचा फायदा मिळाला.दिव्यांग विद्यार्थ्यांचे लक्षणीय यशबारावीच्या परीक्षेत दिव्यांग विद्यार्थ्यांनी लक्षणीय यश मिळविले आहे. विविध व्यंग असणाऱ्या या विद्यार्थ्यांचा राज्यभरातील निकाल ८९.६१ टक्के इतका लागला आहे.अंध, बहिरे, मुके, शारीरिक व्यंग असणारे, डायलेक्झिया, मेंदूचा पक्षाघात, आॅटीझमग्रस्त, सेलेब्रल पाल्सी हा आजार असलेले आणि मतिमंद मुलांचा दिव्यांगामध्ये समावेश होतो. राज्यभरातून असे पाच हजार ६११ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यातील पाच हजार २८ जणांनी यशस्वीपणे हा टप्पा पार केला आहे.विभागपरीक्षेस बसलेलेपास झालेलेटक्केवारीअंध११७५१०९६९३.२८कर्णबधीर८२४६३०७६.४६मुके१०९८४७७.०६शारीरिक व्यंग२१६४१९५२९०.२०मेंदूचा पक्षाघात८२७५९१.४६डायलेक्झिया१०७३१०२३९५. २६आॅटीझम१३१३१००सेलेब्रल पाल्सी७८७०८९.७४मतिमंद९३८५९१.४०एकूण५६११५०२८८९.६१बारावीची गेल्या पाच वर्षांची निकालाची टक्केवारीवर्षनिकालाची टक्केवारी २०१२७४.४६ २०१३७९.९५२०१४९०.०३२०१५९१.२६२०१६८६.६०