शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

माजी मंत्री पाचपुते, गावितांची चौकशी

By admin | Updated: April 23, 2015 05:04 IST

आदिवासी खात्यात सन २००४ ते २००९ या काळात झालेल्या विविध योजनांतील भ्रष्टाचार व गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या न्या. एम. जी. गायकवाड

नाशिक : आदिवासी खात्यात सन २००४ ते २००९ या काळात झालेल्या विविध योजनांतील भ्रष्टाचार व गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या न्या. एम. जी. गायकवाड आयोगाने तत्कालीन आदिवासीमंत्री बबनराव पाचपुते, डॉ. विजयकुमार गावित, त्यांचे बंधू शरद गावित यांच्यासह आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या असून, त्यावर गुरुवार, दि. २३ रोजी सुनावणी होणार आहे. गुलाबराव तानाजी पगार व मोतीराम बहिरम या दोघांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून आदिवासी विकास विभागाने सन २००४ ते ०९ या काळात राबविलेल्या विविध योजनांमध्ये भ्रष्टाचार व गैरव्यवहार झाल्याचे पुरावे सादर केले होते. प्राथमिक चौकशीत तक्रारीत तथ्य आढळून आल्याने मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चौकशी आयोग गठित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने सेवानिवृत्त न्यायाधीश एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय आयोग स्थापन केला. मध्यंतरीच्या काळात तक्रारदार पगार व बहिरम या दोघांव्यतिरिक्त आणखी काहीजणांनी तक्रारी दाखल केल्या. त्यात तत्कालीन आदिवासीमंत्री बबनराव पाचपुते, डॉ. विजयकुमार गावित, तत्कालीन आदिवासी विकास महामंडळाचे पदाधिकारी शरद गावित यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले. तक्रारींची शहानिशा करण्याचे काम आयोगाने सुरू केले असून, त्यात गावित बंधू, पाचपुते, त्याचबरोबर तत्कालीन आदिवासी विकास आयुक्त, सचिवांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी आयोगाने नोटिसा बजावल्या. त्यानुसार गावित बंधू यांच्या वतीने औरंगाबादचे अ‍ॅड. प्रवीण पाटील हजर झाले असून, पाचपुते यांच्या बाजूनेही आयोगासमोर बाजू मांडण्यात येऊन ‘आपला काही संबंध नसल्याचा’ पवित्रा घेण्यात आल्याचे समजते. गुरुवारी आयोगाकडून पुढील सुनावणी केली जाणार असून, तक्रारदार पगार व बहिरम यांच्या वतीने अ‍ॅड. विजयेंद्र लोणारी हे बाजू मांडत आहेत. पाचपुते आणि गावित या माजीमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीत पाचपुते यांचा पराभव झाला, तर गावित निवडून आले. (प्रतिनिधी)