शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

त्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक

By admin | Updated: August 1, 2016 02:15 IST

पावसाळ्यात पाणी साचू देऊ नका. साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू, मलेरियाचा धोका वाढतो.

मुंबई : पावसाळ्यात पाणी साचू देऊ नका. साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू, मलेरियाचा धोका वाढतो. पावसाळ्यात दूषित पदार्थ, पाणी प्यायल्यामुळे विषाणूंमुळे ताप, डोकेदुखी, गॅस्ट्रो, हॅपिटायटिस यांसारख्या आजारांची लागण होते. याविषयी महापालिका विविध माध्यमातून जनजागृती करीत आहे. तरीही पावसाळ्यात साथीचे आजार डोके वर काढतात. साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी लोकांनी महापालिकेला सहकार्य करणे आवश्यक असल्याचे मत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होणारी स्थाने ही ६० टक्क्यांहून अधिकवेळा घरातील असतात. घरातील एसी, फ्रीज, मनी प्लॉण्ट, झाडांखाली ठेवलेल्या ताटल्या, भंगाराचे सामान, करवंट्या यात पाणी साचते. अन्यथा गच्चीवर पाणी साचते. या ठिकाणी स्वच्छता ठेवल्यास डासांची पैदास होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. पण, या ठिकाणी साचलेले पाणी नागरिक साफ करीत नाहीत. त्यामुळे डेंग्यू, मलेरियासारखे आजार वाढतात. त्याचबरोबर रस्त्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत, दूषित पाणी पिऊ नये असे आवाहन करण्यात येते. तरीही याकडे दुर्लक्ष केले जाते. नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे मत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. अजूनही उच्चभ्रू सोसायटीमध्ये पालिकेच्या अधिकाऱ्यांना यायला मज्जाव केला जातो. महापालिकेला नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)