शहरं
Join us  
Trending Stories
1
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
2
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
3
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
4
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
5
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
6
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
7
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
8
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
9
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
10
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
11
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
12
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली
13
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
14
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
15
Navratri 2025: देवीचे वाहन सिंह आणि लक्ष्मीचे घुबड का? त्यामागे आहे महत्त्वपूर्ण कारण!
16
सोने-चांदीच्या दरात आज मोठी उलथापालथ; Gold झालं स्वस्त, पण चांदी अवाक्याच्या बाहेर
17
"पाकिस्तानचा संघ एवढा भारी आहे की..."; IND vs PAK FINAL आधी कर्णधार सलमानने भारताला डिवचले
18
VIRAL :'सोनार बनवणार नाही, चोर चोरणार नाही'! ट्रेनमध्ये विक्रेत्याचा शायराना अंदाज; तरुणाची स्टाईल पाहून पब्लिक झाली फॅन!
19
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
20
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?

दोन वर्षात राज्यातील एक हजारांवर पोलीसांवर हल्ले

By admin | Updated: September 9, 2016 19:05 IST

ज्यातील तब्बल एक हजार २९ पोलीस दादांवर राजकीय पदाधिकारी व गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी प्राणघातक हल्ले केल्याचे समोर आले.

सचिन राऊत, ऑनलाइन लोकमत
 
अकोला, दि. ९ - जनतेच्या संरक्षणासाठी स्वत:च्या जिवाचीही पर्वा न करता रात्रंदिवस कर्तव्यावर असलेल्या राज्यातील तब्बल एक हजार २९ पोलीस दादांवर राजकीय पदाधिकारी व गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी प्राणघातक हल्ले केल्याचे समोर आले. २०१४ ते जुलै २०१६ या कालावधीत राज्य पोलीस दलातील एक हजार २९ पोलीस कर्मचा-यांवर हल्ले केल्यानंतर पोलिसांनी एक हजार ६५५ आरोपींना अटक केली आहे.
 
राज्याची सुरक्षा व्यवस्था असलेल्या पोलीस खात्याला कायमस्वरूपी गृह मंत्री नाही, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृह विभागाचा कारभार मोठ्या मेहनतीने हाकत असले तरी गुन्हेगारी मात्र प्रचंड वाढत आहेत. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात दिवसाआड एक खून होत असल्याचे समोर येत आहे. आधीच राज्याच्या पोलीस खात्यात रिक्त पदांचा अनुशेष प्रचंड असल्याने पोलिसांवर कामाचा ताणही भरमसाठ आहे. 
 
यातच नागरिकांच्या सुक्षेसाठी दिवस-रात्र झटणाºया पोलीस दादाच्या खाकी वर्दीवरच आता गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हात घातल्याने खाकीची अस्मिता पणाला लागली आहे. राज्यातील नऊ पोलीस आयुक्तालयामधील गत अडीच वर्षांत ५३६ पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांवर हल्ले करण्यात आले असून, याचे सर्वाधिक प्रमाण मुंबईत, तर सर्वात कमी हल्ले सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या ठिकाणी झालेले आहेत. 
 
राज्यातील नऊ परिक्षेत्रात ४९३ पोलीस अधिकारी कर्मचा-यांवर हल्ले करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रमाण कोल्हापूर परिक्षेत्रातील असून, सर्वात कमी प्रमाण गडचिरोली जिल्ह्यात आहे. राज्यात एक हजार २९ पोलिसांवर हल्ले झाल्यानंतर पोलीस खात्याने यामधील ९८० गुन्ह्यांचा तपास करून ते उघड केले आहेत. या प्रकरणांमधील तब्बल एक हजार ६५५ आरोपींना अटक करण्यात आली असून, यामध्ये राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते अधिक प्रमाणात असल्याची माहिती आहे.
 
राजकीय पदाधिकारी आरोपी
पोलिसांवर हल्ले करण्यामध्ये जास्त प्रमाण राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते असल्याची खात्रीलायक माहिती आहे. यासोबतच ट्रकचालक, ऑटोचालक आणि विविध संघटनांच्या पदाधिकाºयांनी पोलिसांना मारहाण केल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. राज्यातील पोलिसांवर आता लागोपाठ हल्ले होत असल्याने खाकीचीच सुरक्षा वाºयावर असल्याचे दिसून येत आहे.
 
मुंबई-कोल्हापुरात सर्वाधिक हल्ले
राज्यातील पोलिसांवरील हल्ले कोल्हापूर परिक्षेत्रात सर्वाधिक झाले आहेत. कोल्हापूर परिक्षेत्रातील १०२ पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांवर हल्ले करण्यात आले आहेत. या प्रकरणातील २२२ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर आयुक्तालयाच्या ठिकाणावर मुंबई शहरातील पोलिसांवर सर्वाधिक हल्ले करण्यात आले असून, ही आकडेवारी २१७ अशी आहे. २१७ पोलिसांवर हल्ले झाल्यानंतर यामधील २९७ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.