शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

दोन वर्षात राज्यातील एक हजारांवर पोलीसांवर हल्ले

By admin | Updated: September 9, 2016 19:05 IST

ज्यातील तब्बल एक हजार २९ पोलीस दादांवर राजकीय पदाधिकारी व गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी प्राणघातक हल्ले केल्याचे समोर आले.

सचिन राऊत, ऑनलाइन लोकमत
 
अकोला, दि. ९ - जनतेच्या संरक्षणासाठी स्वत:च्या जिवाचीही पर्वा न करता रात्रंदिवस कर्तव्यावर असलेल्या राज्यातील तब्बल एक हजार २९ पोलीस दादांवर राजकीय पदाधिकारी व गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी प्राणघातक हल्ले केल्याचे समोर आले. २०१४ ते जुलै २०१६ या कालावधीत राज्य पोलीस दलातील एक हजार २९ पोलीस कर्मचा-यांवर हल्ले केल्यानंतर पोलिसांनी एक हजार ६५५ आरोपींना अटक केली आहे.
 
राज्याची सुरक्षा व्यवस्था असलेल्या पोलीस खात्याला कायमस्वरूपी गृह मंत्री नाही, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृह विभागाचा कारभार मोठ्या मेहनतीने हाकत असले तरी गुन्हेगारी मात्र प्रचंड वाढत आहेत. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात दिवसाआड एक खून होत असल्याचे समोर येत आहे. आधीच राज्याच्या पोलीस खात्यात रिक्त पदांचा अनुशेष प्रचंड असल्याने पोलिसांवर कामाचा ताणही भरमसाठ आहे. 
 
यातच नागरिकांच्या सुक्षेसाठी दिवस-रात्र झटणाºया पोलीस दादाच्या खाकी वर्दीवरच आता गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हात घातल्याने खाकीची अस्मिता पणाला लागली आहे. राज्यातील नऊ पोलीस आयुक्तालयामधील गत अडीच वर्षांत ५३६ पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांवर हल्ले करण्यात आले असून, याचे सर्वाधिक प्रमाण मुंबईत, तर सर्वात कमी हल्ले सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या ठिकाणी झालेले आहेत. 
 
राज्यातील नऊ परिक्षेत्रात ४९३ पोलीस अधिकारी कर्मचा-यांवर हल्ले करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रमाण कोल्हापूर परिक्षेत्रातील असून, सर्वात कमी प्रमाण गडचिरोली जिल्ह्यात आहे. राज्यात एक हजार २९ पोलिसांवर हल्ले झाल्यानंतर पोलीस खात्याने यामधील ९८० गुन्ह्यांचा तपास करून ते उघड केले आहेत. या प्रकरणांमधील तब्बल एक हजार ६५५ आरोपींना अटक करण्यात आली असून, यामध्ये राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते अधिक प्रमाणात असल्याची माहिती आहे.
 
राजकीय पदाधिकारी आरोपी
पोलिसांवर हल्ले करण्यामध्ये जास्त प्रमाण राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते असल्याची खात्रीलायक माहिती आहे. यासोबतच ट्रकचालक, ऑटोचालक आणि विविध संघटनांच्या पदाधिकाºयांनी पोलिसांना मारहाण केल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. राज्यातील पोलिसांवर आता लागोपाठ हल्ले होत असल्याने खाकीचीच सुरक्षा वाºयावर असल्याचे दिसून येत आहे.
 
मुंबई-कोल्हापुरात सर्वाधिक हल्ले
राज्यातील पोलिसांवरील हल्ले कोल्हापूर परिक्षेत्रात सर्वाधिक झाले आहेत. कोल्हापूर परिक्षेत्रातील १०२ पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांवर हल्ले करण्यात आले आहेत. या प्रकरणातील २२२ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर आयुक्तालयाच्या ठिकाणावर मुंबई शहरातील पोलिसांवर सर्वाधिक हल्ले करण्यात आले असून, ही आकडेवारी २१७ अशी आहे. २१७ पोलिसांवर हल्ले झाल्यानंतर यामधील २९७ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.