शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

मूल्यमापन तंत्रात बदल होणार!

By admin | Updated: November 10, 2014 00:51 IST

शिक्षण विभाग : उत्तीर्ण होण्यासाठी आता २० टक्के

सागर पाटील - टेंभ्ये -इयत्ता नववी ते बारावीच्या मूल्यमापन तंत्रात महत्त्वपूर्ण बदल करणार असल्याचे शिक्षण विभागाने निश्चित केले असल्याचे समजते. हा बदल आगामी शैक्षणिक वर्षापासून लागू केला जाणार आहे. या बदलानुसार प्रत्येक विषयाच्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान २० टक्के गुण मिळविणे बंधनकारक असेल.सध्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा या दोन्ही महत्त्वाच्या परीक्षांसाठी १० गुण लेखी परीक्षेसाठी, तर २० गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी निश्चित करण्यात आले आहेत. या मूल्यमापन पध्दतीत लेखी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापनच्या १०० गुणांपैकी उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान ३५ गुण मिळवावे लागतात. परंतु बऱ्याच वेळा लेखी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांमध्ये प्रचंड तफावत पाहायला मिळते. या योजनेमुळे लेखी परीक्षेचे महत्त्व कमी होत असल्याचे मत अनेक शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केले जात होते. प्रसार माध्यमांच्या माध्यमातूनदेखील याबाबत वास्तव दाखवण्यात आले होते. यामुळे शासन स्तरावरुन इयत्ता नववी ते बारावीच्या मूल्यमापनात बदल करण्याचे निश्चित करण्यात आल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. या पध्दतीनुसार प्रत्येक विषयामध्ये लेखी परीक्षेत किमान २० टक्के गुण मिळविणे विद्यार्थ्यांना बंधनकारक आहे. लेखी परीक्षेला किमान १६ गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला अंतर्गत मूल्यमापनातील गुणांचा फायदा मिळणार आहे. यामुळे अंतर्गत मूल्यमापन व ग्रेस गुणांच्या आधारे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी होणार असल्याचे बोलले जात आहे. इंग्रजी व गणितसारख्या विषयांना अंतर्गत मूल्यमापन व ग्रेस गुणांच्या आधारे उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय असते. अन्य सर्व विषयात उत्तीर्ण असेल व एकाच विषयात अनुत्तीर्ण असेल तर त्या विषयासाठी मंडळाकडून १० गुण ग्रेस म्हणून दिले जातात. परंतु सध्या येऊ घातलेल्या नवीन मूल्यमापनामुळे विद्यार्थ्याला लेखी परीक्षेत किमान १६ गुण मिळविणे आवश्यक आहे.नवीन मूल्यमापन तंत्राच्या अंमलबजावणीबाबत शासन स्तरावरुन व राज्य मंडळाकडून आदेश प्राप्त होणे आवश्यक आहे. त्यासंदर्भातील आदेश प्राप्त होताच विभागीय मंडळाकडून सर्व शाळांना सूचना दिल्या जातील. - किरण लोहार,सहसचिव, विभागीय शिक्षण मंडळनिकालावर परिणाम?नवीन मूल्यमापन पध्दतीची अंमलबजावणी झाल्यास शाळांच्या निकालावर विपरीत परिणाम होईल, असे मत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. यामुळे शासनाने या मूल्यमापन तंत्राचा पुन्हा विचार करावा, असे मत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.