शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

कुपोषण निर्मूलनासाठी टास्क फोर्सची स्थापना

By admin | Updated: October 25, 2016 03:02 IST

बालविकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध विभागांच्या योजनांचे एकत्रीकरण करून, कुपोषणावर मात करण्यासाठी राज्य सरकारने पाच मंत्री आणि पाच सचिवांचा

मुंबई : बालविकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध विभागांच्या योजनांचे एकत्रीकरण करून, कुपोषणावर मात करण्यासाठी राज्य सरकारने पाच मंत्री आणि पाच सचिवांचा समावेश असलेला टास्क फोर्स स्थापन केला आहे, अशी माहिती मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी सोमवारी येथे दिली.युनिसेफतर्फे हॉटेल ट्रायडंट येथे आयोजित करण्यात आलेल्या हवामानातील बदल, वाढते नागरीकरण या विषयावरील तीन दिवसीय चर्चासत्राचे उद्घाटन मुख्य सचिवांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. पालघर जिल्ह्यात कुपोषणामुळे बालकांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यानंतर, सरकारने हे पाऊल उचलले आहे. कुपोषण निर्मूलनासाठी विविध विभागांच्या अनेक योजना आहेत, पण समन्वयाअभावी त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर, या सर्व योजना एकाच छताखाली आणण्यासाठी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स नेमण्यात आला आहे. महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा आणि कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचा यात समावेश आहे, शिवाय या विभागांचे सचिवही टास्क फोर्सचे सदस्य असतील. राज्याची न्युट्रिशन पॉलिसी तयार करण्यात येत आहे. एकीकडे पालघर जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण आढळून येत असतानाच, दुसरीकडे मातामृत्यू आणि बालमृत्यू रोखण्यात महाराष्ट्र देशामध्ये अग्रेसर असल्याचे क्षत्रिय यांनी सांगितले. (प्रतिनिधी)