शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

समन्यायी पाणीवाटप

By admin | Updated: October 20, 2015 01:29 IST

मराठवाड्याला पाणी देण्यास नाशिक-नगर जिल्ह्यांतील स्थानिक नेते, शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असला तरी मराठवाड्यातील गंभीर दुष्काळी परिस्थिती पाहता समन्यायी

मुंबई : मराठवाड्याला पाणी देण्यास नाशिक-नगर जिल्ह्यांतील स्थानिक नेते, शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असला तरी मराठवाड्यातील गंभीर दुष्काळी परिस्थिती पाहता समन्यायी पाणीवाटपाच्या सूत्रानुसार पाणी सोडणे बंधनकारक असून कुठल्याही परिस्थितीत ३१ आॅक्टोबरपर्यंत पाणी सोडण्यात येईल, अशी ग्वाही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी दिली.गेल्या वर्षीही दुष्काळामुळे मराठवाड्यासाठी ७.११ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. त्यापैकी ४.७९ टीएमसी पाणी पोहोचले होते. यंदा गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या बैठकीत पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात आला. पैठण धरणाच्या उर्ध्व भागातील मुळा, प्रवरा, गंगापूर, गोदावरी दारणा आणि पालखेड या धरणसमूहातील १२.८४ टीएमसी पाणी पैठण धरणात सोडण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. पैठण धरणात १५ आॅक्टोबरला पाणीसाठा १२९ द.ल.घ.मी. असून खरीप हंगामातील पाणीवापर १८७ द.ल.घ.मी. एवढा आहे. एकूण उपलब्ध पाणी ३१६ द.ल.घ.मी. आहे. त्याची संकल्पित पाणीसाठ्याशी १४.५५ एवढी टक्केवारी आहे. ही टक्केवारी ३७पेक्षा कमी असल्याने समन्यायी पाणीवाटपासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशानुसार १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ३१ आॅक्टोबरपर्यंत पाणी सोडण्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.१२.८४ टीएमसी पैठण धरणात महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निवाड्यानुसार पैठण धरणाच्या उर्ध्व भागातील मुळा, प्रवरा, गंगापूर, गोदावरी दारणा आणि पालखेड या धरणसमूहातील १२.८४ टीएमसी पाणी पैठण धरणात सोडण्याचे आदेश देण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले.