शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

साथीच्या आजारांनी शहरात धारण केले रौद्र रूप

By admin | Updated: April 4, 2017 01:47 IST

शहरातील विविध भागात शीतपेये आणि उघड्यावरील अन्नपदार्थ विक्रीचा धंदा तेजीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे

पिंपरी : शहरात सध्या साथीच्या आजारांनी रौद्र रूप धारण केले असतानादेखील शहरातील विविध भागात शीतपेये आणि उघड्यावरील अन्नपदार्थ विक्रीचा धंदा तेजीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही उघड्यावरील अन्नपदार्थांची विक्री बिनदिक्कतपणे होत असताना, अन्न आणि औषध प्रशासन मात्र ढिम्म असल्याचे पाहायला मिळत आहे.सध्या उष्णतेची लाट सुरू असल्याने पारा चाळीस अंशापर्यंत चडला आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा असाह्य होत आहेत. उन्हाचा चटका सहन न झाल्याने दैैनंदिन व्यवहारासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची पावले आपोआप शीतपेयांच्या दुकानाकडे वळत आहेत. शहराच्या विविध भागांत अशी शीतपेयांची शेकडो दुकाने उभी करण्यात आली आहेत. मात्र, ही शीतपेये अनेक वेळा उघड्यावरच ठेवलेली असतात. या दुकानांमधील शीतपेये नागरिकांच्या आरोग्यास हितकारक आहेत की अपायकारक, याची पडताळणी अन्न आणि औषध प्रशासनाकडून करणे आवश्यक असते. त्यानंतरच परवाना दिला जातो. मात्र, शहरात सध्या सुरूअसणाऱ्या शीतपेयांच्या बहुतांश दुकानांची एफडीएकडून पाहणी करण्यात आलेली नाही. उन्हाळ्यात शरीराचे तापमान योग्य राखण्यासाठी लोकांकडून शीतपेयांनाचा प्रधान्य दिले जाते. वापरण्यात येणाऱ्या बर्फाची प्रतवारी एफडीएकडून तपासली जात नाही. त्यामुळे हा बर्फ खाण्यायोग्य आहे की नाही, याबाबत शंका निर्माण होत आहे. तसेच, शहरात एफडीएने परवाना दिलेले किती बर्फ कारखाने आहेत, याबद्दल खुद्द अन्न प्रशासनालाच माहिती नाही. महापालिकेच्या वतीने पुरविण्यात येणाऱ्या पाण्यापासून अधिकृत बर्फ कारखान्यात बर्फ तयार केला जातो. हाच बर्फ खरेदी करणे आवश्यक असताना अनेक शीतपेये विक्रेते औद्योगिक कारणांसाठी वापरला जाणारा बर्फ खरेदी करून त्याची विक्री करीत आहेत. नागरिक मात्र याबाबत अनभिज्ञ असतात. अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नुसार अन्नपदार्थ आणि शीतपेयांची विक्री करणाऱ्या सर्वच फिरत्या विक्रेत्यांना एफडीएकडे नोंदणी बंधनकारक आहे. मात्र, अनेक विक्रे ते या परवानगीशिवाय खाद्यपदार्थांचा सर्रास धंदा करीत आहेत. रसवंती, बर्फगोळा, कुल्फी, उसाचा रस, मठ्ठा, थंड पाणी, कोल्ड्रिंक्स, ताक, लस्सी, सरबत, ज्यूस, आइस्क्रीम, फळे, फळांच्या फोडी, सॅलड, भेळपुरी, पाणीपुरी, शेंगदाणे, चाट विक्रेते, फास्ट फूड विक्रे ते यांची संख्या शहरात हजारोंच्या आसपास आहे. मात्र, एफडीएकडून यांची कधी तपासणी केली जाते की नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातो. (प्रतिनिधी)सध्या चायनीज फास्ट फूडचे फॅड शहरात सर्वत्रच पहायला मिळत आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत या चायनीज पदार्थांना पसंती दिली जाते. चौकात अथवा रस्त्याच्या कडेला हातगाडी लावून चायनीज पदार्थ विक्रीचा धंदा सुरू केला जातो. मात्र या हातगाड्यांची नोंदणी अन्न आणि औैषध प्रशासनाकडे केलेली नसते. या ठिकाणी बनविलेल्या पदार्थांचा दर्जाही एफडीएकडून तपासला जात नाही. अनेक चायनीज विक्रेते तेल, चिकन व इतर पदार्थ हे निकृष्ट दर्जाचे वापरत असतात. हे पदार्थ मानवी शरीरास अपायकारक असतात.