शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
3
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
4
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
5
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
6
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
7
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
8
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
9
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
10
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
11
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
12
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
13
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
14
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
15
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
16
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
17
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
18
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
19
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
20
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री

पाणी बचतीसाठी उद्योजक सरसावले

By admin | Updated: May 19, 2016 06:06 IST

‘लोकमत’ने सुरू केलेल्या जलमित्र अभियानाला राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून

मुंबई : राज्यातील भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने सुरू केलेल्या जलमित्र अभियानाला राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे पाणी बचतीची मोहीम सुरू झाली आहे. जळगाव येथील उद्योजकांनीदेखील या अभियानात पुढाकार घेऊन पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत साठवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. जळगावमध्ये या मोहिमेत सहभागी होण्यासाठी उद्योजकांनी घेतलेल्या बैठकीत त्यांच्या कंपनीत पाणी बचतीसाठी शक्य तेवढा पाण्याचा कमी वापर केला जाईल. पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी जलपुनर्भरण यंत्रणा उभारू, पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी कामगारांमध्ये प्रबोधन करू, अशी ग्वाही याप्रसंगी दिली.या बैठकीस जिंदा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रजनीकांत कोठारी, जिंदा संघटनेचे अध्यक्ष भुवनेश्वर सिंग, लघु उद्योग भारतीचे अंजनीकुमार मुंदडा, लघु उद्योग भारतीचे जिल्हाध्यक्ष संजयकुमार तापडिया, एम़ सेक्टरचे संचालक अरुण बोरोले, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे माजी अध्यक्ष चंद्रकांत बेंडाळे उपस्थित होते.कोल्हापूर येथील मंगेशकर नगरातील सांगलीकर कुटुंबीयांनी हात धुतलेले तसेच भांडी धुण्यासाठी वापरलेले अनेकांच्या घरातील पाणी थेट गटारीमध्ये जाऊ न देता आपल्या बंगल्याच्या परिसरातील विविध झाडे जगविण्यासाठी वापरले आहे. या पाणी बचतीच्या प्रयत्नांबाबत गौरव सांगलीकर यांनी सांगितले की, मंगेशकरनगरमधील आमच्या बंगल्यात आई-वडिलांसह मी राहतो. बंगल्याच्या आवारात विविध फळे व फुलांची झाडे आम्ही लावली आहेत. सध्याच्या दुष्काळी स्थितीत पाण्याची उपलब्धता कमी आहे. अशा स्थितीत झाडांना पाणी देण्यासाठी अन्य ठिकाणांहून पाणी उपलब्ध करणे अथवा खरेदी करण्याऐवजी आपल्याजवळ असलेल्या पाण्याचा योग्य पद्धतीने कसा वापर करता येईल, याचा विचार आम्ही केला़ त्यानुसार वॉश बेसिनच्या नळाखाली मोठे भांडे ठेवले. त्यात हात आणि भांडी धुतल्यानंतरचे पाणी आम्ही वाचविले. हे पाणी बंगल्याच्या परिसरातील झाडांना दररोज दिले जाते. त्यासह वॉटर प्युरिफायरमधून बाहेर पडणारे अतिरिक्त स्वरूपातील पाणी थेट परसातील झाडांना दिले जात आहे. राज्याच्या बहुसंख्य भागात पाणीटंचाई आहे. नागपुरात अशी परिस्थिती नसली तरी भविष्याचा विचार करता पाण्याचा अपव्यय होणार नाही, यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी म्हणून जनजागृतीचा प्रयत्न आहे. जलसंवर्धनासाठी शासनाने विविध उपक्रम सुरू केले आहेत. नागपूर शहरातील नागरिकांनीही बांधकाम करताना रेन वॉटर हार्वेस्ंिटंग यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. यासाठी जनजागृतीचे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. पाण्याचा अपव्यय टाळून बचत केली तर भविष्यात पाणी संकटावर मात करता येईल. जलपुनर्भरणासाठी शासन व महापालिकेच्या योजना आहेत. याचा नागरिकांनी उपयोग करून घेण्याची गरज आहे. -कृष्णा खोपडे, आमदार, नागपूर पूर्व