शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

सुरक्षा दलाच्या आधुनिकीकरणावर भर

By admin | Updated: March 2, 2015 02:32 IST

पालिका सुरक्षा खात्यात दोन वर्षांच्या काळात अनेक बदल झाले असून, मागील वर्षी पार पडलेल्या भरतीत १ हजार जणांना काम

मुंबई : पालिका सुरक्षा खात्यात दोन वर्षांच्या काळात अनेक बदल झाले असून, मागील वर्षी पार पडलेल्या भरतीत १ हजार जणांना काम करण्याची संधी मिळाली आहे. खात्यातील साहाय्यक सुरक्षा अधिकाऱ्यांची, ४०० सुरक्षारक्षकांची पदे रिक्त असून, ती लवकरच भरली जातील. अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमरे, स्कॅनर मशिन, वाहनांना अडथळा ठरणारी यंत्रे विकत घेऊन सुरक्षा दलाचे आधुनिकीकरण करण्यात येईल, असे आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त शांताराम शिंदे यांनी सांगितले.महापालिका सुरक्षा दलाचा ४९वा वर्धापन दिन भांडुप संकुल येथील सुरक्षा दल प्रशिक्षण केंद्राच्या प्रांगणात रविवारी पार पडला; त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात शांताराम शिंदे बोलत होते. प्रमुख सुरक्षा अधिकारी अरुण वीर म्हणाले, की १९६६ साली स्थापन झालेल्या पालिका सुरक्षा दलाची कार्यकक्षा वाढत चालली असून, या खात्यात १०० अधिकारी, ४ हजार जवान कार्यरत आहेत. मुंबई आणि नगरबाह्य विभागातील महापालिका मालमत्तांचे संरक्षण करण्यासोबतच आपत्कालीन परिस्थितीत हे दल २४ तास कार्यरत राहत आहे. विभागात रिक्त असलेले सुरक्षा अधिकारी व सुरक्षारक्षकांची पदे भरण्यासाठी भरतीचा प्रस्ताव सादर करणार येणार आहे.प्रारंभी पालिका सुरक्षा दलाने शिस्तबद्धरीत्या संचलन सादर करून मानवंदना दिली. त्यानंतर पंजाबी नृत्य, सामूहिक वंदे मातरम् तसेच कराटेची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. शिवाय विविध क्रीडा प्रकारांत अंतिम विजेत्या ठरलेल्या संघांचा प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये कबड्डी स्पर्धेत मोहन पाडावे, व्हॉलीबॉल स्पर्धेत कर्णधार नितीन कांबळे, क्रिकेट स्पर्धेत मनोज काटुले यांचा उपायुक्त शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.या वर्षी उत्कृष्ट संचलनासाठीचा चषक शहर विभागाच्या पथक क्रमांक ९ने पटकावला असून, त्याचे नेतृत्व साहाय्यक सुरक्षा अधिकारी शेखर उदराज यांनी केले. याप्रसंगी या वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांचा या वेळी पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये प्रमुख सुरक्षा अधिकारी अरुण वीर, उप प्रमुख सुरक्षा अधिकारी विजय डाळींबकर, उप प्रमुख सुरक्षा अधिकारी श्रीनिवास कुळकर्णी, विभागीय सुरक्षा अधिकारी शिरीष काळे, विजय पराशर, साहाय्यक सुरक्षा अधिकारी तानाजी बांगर, रामचंद्र हराळे यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)