शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अभियंत्यांना घ्यावीच लागणार खड्ड्यांची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2016 20:47 IST

मुंबईचे रस्ते खड्ड्यात घालण्यासाठी ठेकेदारांएवढेच अभियंत्याही जबाबदार धरत प्रशासनाने कठोर पावलं उचलली़ खड्डे भरण्याची जबाबदारी असलेल्या अभियंत्यांचे मोबाईल क्रमांकच जाहीर करण्यात आले़

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २८ - मुंबईचे रस्ते खड्ड्यात घालण्यासाठी ठेकेदारांएवढेच अभियंत्याही जबाबदार धरत प्रशासनाने कठोर पावलं उचलली़ खड्डे भरण्याची जबाबदारी असलेल्या अभियंत्यांचे मोबाईल क्रमांकच जाहीर करण्यात आले़ मात्र अभियंत्यांनी असहकार पुकारुन पालिकेची नाकाबंदी करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना कार्यालयीन मोबाईल देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे़ त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींचा खणखणारा फोन उचलणे अभियंता भाग पडणार आहे़

३५२ कोटी रुपयांच्या रस्ते घोटाळ्यात रस्ते विभागाचे तत्कालिन प्रमुख अभियंता अशोक पवार आणि दक्षता खात्याचे प्रमुख अभियंता उदय मुरुडकर यांचे निलंबन व अटक झाल्यानंतर अभियंतावर्गातून नाराजीचा सूर उमटत होता़ त्यानंतर ठेकेदारांकडून दंड वसूल करुन त्यांच्या सुटकेचा मार्ग खुला करणाऱ्या सहापैकी दोन कार्यकारी अभियंत्यांना पालिकेने निलंबित केले़ या अभियंत्यांना निलंबित करण्यापूर्वी त्यांची खातेनिहाय चौकशी करावी़ त्यात दोषी आढळल्यानंतरच कारवाई करणे उचित होते, असा युक्तिवाद अभियंत्यांनी मांडला आहे़

मात्र पालिका प्रशासनाने खड्डे भरण्याची जबाबदारी असलेल्या सर्व अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक परस्पर जाहीर केल्याने त्यांच्या संतापाचा भडका उडाला आहे़ आपला मोबाईल क्रमांक व्यक्तिगत असल्याने कार्यालयीन कामासाठी त्याचा वापर करण्यास अभियंत्यांनी नकार दिला आहे़ नागरिकांच्या तक्रारींचा फोन उचलणे अभियंत्यांनी बंद केले आहे़ त्यामुळे प्रशासनाने नगरसेवक व खातेप्रमुखांनंतर आता खड्डयांची जबाबदारी असलेल्या अभियंत्यांनाही मोबाईल देण्याचा निर्णय घेतला आहे़ प्रतिनिधी चौकट अभियंत्यांच्या तक्रारींची पहिली खबर व्यक्तिगत मोबाईल क्रमांक पालिकेने परस्पर जाहीर केल्यामुळे अभियंता नाराज आहेत़

यापैकी काही अभियंत्यांनी संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना पत्र पाठवून आपला व्यक्तिग मोबाईल क्रमांक कार्यालयीन कामकाजासाठी वापरण्यास नकार कळविला होता, याची पहिली खबर लोकमतने दिली होती़ अभियंत्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅप नसल्याचेही निदर्शनास आणले होते़ यासाठी देणार स्मार्ट फोन व्यक्तिगत मोबाईल क्रमांक पालिकेने जाहीर केल्यानंतर सतत फोन खणखणत असल्याने अभियंत्यांनी असहकार पुकारला आहे़ काही अभियंता फोन उचलत नसून काहींनी आपला मोबाईल बंद ठेवला आहे़ त्यामुळे या अभियंत्यांना कार्यालयीन मोबाईल क्रमांक देण्याचा निर्णय पालिकेने घेतला़ त्यानुसार ५४ नवीन स्मार्ट फोन खरेदी करण्यात येणार आहेत़

हे मोबाईल केवळ पावसाळ्यात खड्डेसंदर्भात येणाऱ्या तक्रारींची दखल घेण्यासाठी असणार आहेत़ त्यानंतर हे फोन संबंधित वॉर्डातील तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे ठेवण्यात येतील़ अ‍ॅपचा ताप खड्डयांच्या तक्रारी करण्यासाठी २०११ पासून विशेष संकेतस्थळ सुरु करण्यात आले होते़ खड्ड्यांचे छायाचित्र काढून या संकेतस्थळावर टाकणे सोपे होते़ तसेच अभियंत्यांनाही त्याची दखल घेणे भाग असल्याने हे संकेतस्थळ खड्ड्यांच्या तक्रारींसाठी प्रभावी माध्यम ठरले होते़

मात्र या संकेतस्थळाबरोबर असलेले कंत्राट संपुष्टात आल्यामुळे पालिकेने यावर्षी अ‍ॅप सुरु केला आहे़ मात्र तांत्रिक अडचणींमुळे या अ‍ॅपवर खड्ड्यांची तक्रार करणे नागरिकांसाठी डोकेदुखीचे ठरत आहे़ हे विभाग खड्डेमुक्त भेंडी बाजार, भायखळा, शिवाजी पार्क, वरळी, वांद्रे, चेंबूर, दहिसर हे विभाग खड्डेमुक्त असल्याचा दावा केला जात आहे़