शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

अभियंत्यांना घ्यावीच लागणार खड्ड्यांची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2016 20:47 IST

मुंबईचे रस्ते खड्ड्यात घालण्यासाठी ठेकेदारांएवढेच अभियंत्याही जबाबदार धरत प्रशासनाने कठोर पावलं उचलली़ खड्डे भरण्याची जबाबदारी असलेल्या अभियंत्यांचे मोबाईल क्रमांकच जाहीर करण्यात आले़

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २८ - मुंबईचे रस्ते खड्ड्यात घालण्यासाठी ठेकेदारांएवढेच अभियंत्याही जबाबदार धरत प्रशासनाने कठोर पावलं उचलली़ खड्डे भरण्याची जबाबदारी असलेल्या अभियंत्यांचे मोबाईल क्रमांकच जाहीर करण्यात आले़ मात्र अभियंत्यांनी असहकार पुकारुन पालिकेची नाकाबंदी करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना कार्यालयीन मोबाईल देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे़ त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींचा खणखणारा फोन उचलणे अभियंता भाग पडणार आहे़

३५२ कोटी रुपयांच्या रस्ते घोटाळ्यात रस्ते विभागाचे तत्कालिन प्रमुख अभियंता अशोक पवार आणि दक्षता खात्याचे प्रमुख अभियंता उदय मुरुडकर यांचे निलंबन व अटक झाल्यानंतर अभियंतावर्गातून नाराजीचा सूर उमटत होता़ त्यानंतर ठेकेदारांकडून दंड वसूल करुन त्यांच्या सुटकेचा मार्ग खुला करणाऱ्या सहापैकी दोन कार्यकारी अभियंत्यांना पालिकेने निलंबित केले़ या अभियंत्यांना निलंबित करण्यापूर्वी त्यांची खातेनिहाय चौकशी करावी़ त्यात दोषी आढळल्यानंतरच कारवाई करणे उचित होते, असा युक्तिवाद अभियंत्यांनी मांडला आहे़

मात्र पालिका प्रशासनाने खड्डे भरण्याची जबाबदारी असलेल्या सर्व अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक परस्पर जाहीर केल्याने त्यांच्या संतापाचा भडका उडाला आहे़ आपला मोबाईल क्रमांक व्यक्तिगत असल्याने कार्यालयीन कामासाठी त्याचा वापर करण्यास अभियंत्यांनी नकार दिला आहे़ नागरिकांच्या तक्रारींचा फोन उचलणे अभियंत्यांनी बंद केले आहे़ त्यामुळे प्रशासनाने नगरसेवक व खातेप्रमुखांनंतर आता खड्डयांची जबाबदारी असलेल्या अभियंत्यांनाही मोबाईल देण्याचा निर्णय घेतला आहे़ प्रतिनिधी चौकट अभियंत्यांच्या तक्रारींची पहिली खबर व्यक्तिगत मोबाईल क्रमांक पालिकेने परस्पर जाहीर केल्यामुळे अभियंता नाराज आहेत़

यापैकी काही अभियंत्यांनी संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना पत्र पाठवून आपला व्यक्तिग मोबाईल क्रमांक कार्यालयीन कामकाजासाठी वापरण्यास नकार कळविला होता, याची पहिली खबर लोकमतने दिली होती़ अभियंत्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅप नसल्याचेही निदर्शनास आणले होते़ यासाठी देणार स्मार्ट फोन व्यक्तिगत मोबाईल क्रमांक पालिकेने जाहीर केल्यानंतर सतत फोन खणखणत असल्याने अभियंत्यांनी असहकार पुकारला आहे़ काही अभियंता फोन उचलत नसून काहींनी आपला मोबाईल बंद ठेवला आहे़ त्यामुळे या अभियंत्यांना कार्यालयीन मोबाईल क्रमांक देण्याचा निर्णय पालिकेने घेतला़ त्यानुसार ५४ नवीन स्मार्ट फोन खरेदी करण्यात येणार आहेत़

हे मोबाईल केवळ पावसाळ्यात खड्डेसंदर्भात येणाऱ्या तक्रारींची दखल घेण्यासाठी असणार आहेत़ त्यानंतर हे फोन संबंधित वॉर्डातील तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे ठेवण्यात येतील़ अ‍ॅपचा ताप खड्डयांच्या तक्रारी करण्यासाठी २०११ पासून विशेष संकेतस्थळ सुरु करण्यात आले होते़ खड्ड्यांचे छायाचित्र काढून या संकेतस्थळावर टाकणे सोपे होते़ तसेच अभियंत्यांनाही त्याची दखल घेणे भाग असल्याने हे संकेतस्थळ खड्ड्यांच्या तक्रारींसाठी प्रभावी माध्यम ठरले होते़

मात्र या संकेतस्थळाबरोबर असलेले कंत्राट संपुष्टात आल्यामुळे पालिकेने यावर्षी अ‍ॅप सुरु केला आहे़ मात्र तांत्रिक अडचणींमुळे या अ‍ॅपवर खड्ड्यांची तक्रार करणे नागरिकांसाठी डोकेदुखीचे ठरत आहे़ हे विभाग खड्डेमुक्त भेंडी बाजार, भायखळा, शिवाजी पार्क, वरळी, वांद्रे, चेंबूर, दहिसर हे विभाग खड्डेमुक्त असल्याचा दावा केला जात आहे़