शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
4
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
6
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
8
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
9
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
10
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
11
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
12
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
13
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
14
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
15
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
16
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
17
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
18
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
19
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

बँकासह एटीएमच्या रांगेचा मनस्ताप संपेना

By admin | Updated: November 13, 2016 02:37 IST

पाचशे आणि हजारच्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकेबाहेर लागलेल्या रांगांनी मुंबईकरांच्या नाकी नऊ आणले आहेत. तर एटीएमबाहेरही पैसे काढण्यासाठी ग्राहकांना तासनतास

मुंबई : पाचशे आणि हजारच्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकेबाहेर लागलेल्या रांगांनी मुंबईकरांच्या नाकी नऊ आणले आहेत. तर एटीएमबाहेरही पैसे काढण्यासाठी ग्राहकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. वीकेण्डमुळे यात आणखी भर पडली असून, मंगळवारच्या रात्रीपासून सुरु झालेला हा मनस्ताप पुढील आठवडाभर तरी मिटण्याची चिन्हे नाहीत. शिवाय सुट्टयांपैशाभावी सुरु झालेला गोंधळ वाढला असून, चलनातून बाद झालेल्या पाचशे, हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठीचा मनस्ताप दिवसेंदिवस वाढतच आहे.मंगळवारच्या निर्णयानंतर बुधवारी बँक आणि एटीएम बंद होते. गुरुवारी बँकाचे व्यवहार सुरु झाले. तर शुक्रवारी एटीएम सेवा कार्यान्वित झाली. मात्र बँकातून नोटा बदलून घेण्यासाठी ग्राहकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागले. हीच परिस्थिती एटीएमची होती. गुरुवार, शुक्रवारनंतर शनिवारी काही प्रमाणात का होईना दिलासा मिळेल, अशी आशा मुंबईकरांना होती.प्रत्यक्षात मात्र शनिवारचा दिवसही मनस्तापानेच उजाडला. शनिवारी सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरातील बँक आॅफ महाराष्ट्र, इंडियन बँक, कॉर्पोरेशन बँक, बँक आॅफ इंडिया, स्टेट बँक, सारस्वत बँक, अभ्युदय बँकांसमोर भल्यामोठया रांगा लागल्या होत्या. शिवाय टपाल कार्यालयात नोटा बदलून घेण्यासाठी ग्राहकांनी रांग लावली होती. बँकासमोरील रांगांमुळे पैसे बदलून मिळण्यास चार ते सहा तासांहून अधिक काळ लागत होता. शिवाय एटीएममधूनही दोन हजारांच्या नोटा येत असल्याने त्या प्रत्यक्ष व्यवहारात आणताना मुंबईकरांच्या नाकी नऊ आले होते. (प्रतिनिधी)