शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

आणीबाणीचे समर्थन करणाऱ्यांनी बोलू नये

By admin | Updated: February 20, 2017 01:37 IST

देशावर लादलेल्या आणीबाणीचे ज्या शिवसेनेने समर्थन केले, त्या पक्षाच्या नेत्यांना आणीबाणीवर बोलण्याचा अधिकारच नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

ठाणे : देशावर लादलेल्या आणीबाणीचे ज्या शिवसेनेने समर्थन केले, त्या पक्षाच्या नेत्यांना आणीबाणीवर बोलण्याचा अधिकारच नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी ठाण्यात लगावला आणि आणीबाणीच्या समर्थनाबद्दल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली.महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची सांगता करताना ते बोलत होते. ‘सामना’वर बंदी घालण्याची आमची इच्छा नव्हती. पण, त्या मागणीचा आधार घेत ‘आमच्यावर आणीबाणीची परिस्थिती लादण्यासाठी दबाव आणला जात आहे,’ असा आव शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आणला असला, तरी ज्या वेळी आणीबाणी लादली, तेव्हा याच शिवसेनेने आणीबाणीचे समर्थन केले होते, असा दाखला देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे थेट शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.ठाण्यात सरस्वती इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या पटांगणावर आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. ठाण्यात शिवसेनारूपी रावणाचे दहन करा, असे आवाहनही त्यांनी केले. ज्या वेळी देशात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा माझे आजोबा आणि वडील तुरुंगात गेले होते. कारण, आम्हाला लोकशाही हवी होती, परंतु शिवसेनेने आणीबाणीला समर्थन दिले होते. यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बंदिस्त करण्याचा प्रयत्न झाला, त्याला विरोध करत आमचे स्वयंसेवक दोनदोन वर्षे तुरुंगात गेले. त्यामुळे आज लोकशाही जिवंत ठेवण्यात आमचा मोलाचा वाटा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आमच्या सिंहाची-भाजपाची ताकद आम्हाला माहीत होती, परंतु काही काळ हा सिंह हरवला होता आणि तो बकरीच्या कळपात गेला होता. आता तो स्वतंत्र झाला आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)