शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

विद्यावेतनाच्या प्रश्नावर प्रकल्पग्रस्त युवकांचा एल्गार

By admin | Updated: September 20, 2016 03:13 IST

विद्यावेतन बंद करण्याच्या सिडकोच्या निर्णयाचे तीव्र पडसाद प्रकल्पग्रस्त तरुणांत उमटले आहेत.

कमलाकर कांबळे,

नवी मुंबई- प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना शिक्षणासाठी दिले जाणारे विद्यावेतन बंद करण्याच्या सिडकोच्या निर्णयाचे तीव्र पडसाद प्रकल्पग्रस्त तरुणांत उमटले आहेत. सिडकोच्या या निर्णयाला कडाडून विरोध करण्याचा निर्धार तरुणांनी केला आहे. त्यामुळे विद्यावेतनाच्या प्रश्नावरून येत्या काळात संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शासनाच्या माध्यमातून सिडकोने येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या. त्याबदल्यात त्यांचे सर्वतोपरी पुनर्वसन करण्याचे आश्वासन सिडकोने दिले होते. परंतु त्याची अंमलबजावणी करण्यात सिडको सपशेल अपयशी ठरली आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांत सिडकोच्या प्रति रोष आहे. यातच आता वारसांच्या शिक्षणासाठी दिले जाणारे विद्यावेतनही बंद करण्याच्या हालचाली सिडकोच्या संबंधित विभागाकडून सुरू असल्याने प्रकल्पग्रस्तांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. विशेष म्हणजे १९७५ पासून प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना इयत्ता अकरावी ते पदवी, पदव्युत्तर व आयटीआय प्रशिक्षणासाठी विद्यावेतन दिले जाते. एकूणच प्रकल्पग्रस्तांची दुसरी पिढी सुशिक्षित करण्यात या विद्यावेतन योजनाचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. परंतु सिडकोने अचानक ही योजना गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील दीड दशकात प्रकल्पग्रस्तांचे जीवनमान सुधारले आहे. त्यांचा आर्थिक स्तर उंचावला असला तरी त्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने दैनंदिन गरजांसाठी झगडत असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांसाठी तुटपुंज्या विद्यावेतनाची मदत सुध्दा मोलाची ठरत आहे. दरम्यान, सिडकोच्या या निर्णयाला कडाडून विरोध करण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. विशेषत: युवकांनी यासंदर्भात आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे. >शासनाने सिडकोच्या माध्यमातून ठाणे, उरण आणि पनवेल तालुक्यातील ९५ गावांतील जमिनी संपादित केल्या. भूसंपादनाला सर्वाधिक विरोध उरण आणि पनवेल परिसरातून झाला. पूर्वी बेलापूर पट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई परिसरातून या प्रक्रियेला फारसा विरोध केला नाही. या पार्श्वभूमीवर उरण व पनवेल परिसरातील प्रकल्पग्रस्तांचा रोष कमी करण्यासाठी सिडकोने विद्यावेतनाची घोषणा केली. सुरुवातीच्या काळात ही योजना फक्त उरण व पनवेल तालुक्यासाठीच लागू होती. त्यामुळे माजी मंत्री गणेश नाईक यांनी सिडकोच्या या भूमिकेला त्यावेळी कडाडून विरोध केला. १९७७ मध्ये रस्त्यावर उतरून सिडकोच्या विरोधात अगदी अहिंसक पध्दतीने आंदोलन केले. सिडकोच्या बीएमटीसी बसेसच्या चाकातील हवा काढण्यात आली. त्यामुळे सिडकोने नमते घेत नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या वारसांनाही विद्यावेतन योजना सुरू केली. >पुनर्वसन योजना गुंडाळण्याचा घाट?प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सिडकोच्या माध्यमातून विविध घोषणा करण्यात आल्या होत्या. परंतु त्यापैकी बहुतांशी आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. विशेष म्हणजे यासंदर्भात सिडकोच्या पुनर्वसन विभागाकडूनही समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत. आरटीआय कार्यकर्ते विकास परशुराम पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वेळोवेळी सिडकोने घेतलेले निर्णय आणि त्यावर झालेली अंमलबजावणी याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागविली होती. परंतु संबंधित विभागाने सदर माहिती गोपनीय स्वरूपाची असल्याने ती देता येत नसल्याचे पाटील यांना कळविले आहे. त्यामुळे पुनर्वसन योजनाच गुंडाळण्याचा सिडकोचा डाव असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.>सिडकोकडून प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना दिले जाणारे विद्यावेतन अत्यल्प स्वरूपाचे आहे. त्यात वाढ करण्याऐवजी ते बंद करण्याची कार्यवाही सिडकोने सुरू केली आहे. सिडकोचा हा निर्णय अन्यायकारक असून त्याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.- वैभव नाईक, युवा नेते