शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

ओल्या कोळशामुळे वीज निर्मिती अडचणीत

By admin | Updated: September 2, 2014 01:08 IST

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला गेल्या अनेक वर्षांपासून लागलेली घरघर अद्याप कायम आहे. पावसाळा सुरू होताच कोळसा खाणीतून ओला व चिकट कोळशाचा पुरवठा होत असल्याने वीज केंद्रातील वीज

विजेची समस्या तीव्र : २३४० पैकी १३०८ मेगावॅट विजेची निर्मितीरवी जवळे - चंद्रपूरचंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला गेल्या अनेक वर्षांपासून लागलेली घरघर अद्याप कायम आहे. पावसाळा सुरू होताच कोळसा खाणीतून ओला व चिकट कोळशाचा पुरवठा होत असल्याने वीज केंद्रातील वीज निर्मिती प्रभावित होत असते. ती यंदाही झाली आहे. एकाही संचातून त्याच्या क्षमतेएवढी वीज निर्मिती होत नसून २३४० मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता असलेल्या या महाऔष्णिक वीज केंद्रातून केवळ १३०८ मेगावॅट वीज निर्मिती होत आहे. परिणामी राज्यातील विजेची समस्या आणखी गडद झाली आहे.चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा वीज निर्मिती करणारा प्रकल्प आहे. मात्र या केंद्रातून वर्षभरात बोटावर मोजण्याइतक्या दिवसातच क्षमतेएवढी वीज निर्मिती होत असल्याचा अनुभव अनेकवेळा आला आहे. इतर दिवसात नेहमी वीजनिर्मितीत तुटच होत असते. कधी कन्व्हेअर बेल्ट तुटून एखादा संच बंद असतो तर कधी संच देखभाल दुरुस्तीसाठी मुद्दाम बंद केलेला असतो. अनेकवेळा तर या केंद्राला जिल्ह्यात कोळसा खाणी असतानाही मुबलक कोळसा मिळत नाही. याचाही परिणाम वीज निर्मितीवर होत आहे. घुग्घुस, पदमापूर, दुर्गापूर आदी कोळसा खाणीतून सध्या या केंद्राला ओला व चिकट कोळशाचा पुरवठा केला जात आहे. परिणामी त्याची ज्वलन क्षमता कमी होत आणि त्याचा परिणाम वीज निर्मितीवर होतो. याबाबत वीज केंद्र प्रशासनाने अनेकदा कोळसा खाणीला अवगत केले. मात्र पावसाळ्यामुळे त्यांचाही नाईलाज होत असल्याचे दिसून येते. याशिवाय वीज केंद्र व्यवस्थापनाकडून ज्या ठिकाणी कोळशाची साठवणूक केली जाते, तिथेही टिनेचे छत नाही. केवळ ताडपत्री झाकून कोळसा ठेवला जातो. कोळसा घेताना ताडपत्री काढली जाते. यावेळी पावसामुळे साठवलेला कोळसाही ओला होतो. या प्रकारामुळे २३४० मेगावॅट क्षमता असलेल्या या केंद्रातून केवळ १३०८ मेगावॅट वीज निर्मिती होत आहे.