शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
2
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
3
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
4
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
5
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
6
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
7
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
9
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
10
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
11
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
12
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
13
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
14
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
15
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
16
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
17
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
18
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
19
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
20
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले

24 ऑगस्टला कल्याण तालुक्‍यात सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार

By admin | Updated: July 31, 2016 14:38 IST

राज्य निवडणूक आयोगाने मुंबई ग्रामपंचायत (निवडणूक) नियम 1959 मधील नियम 7 मधील पोट नियम 1 अन्वये कल्याण तालुक्‍यातील सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम 24 ऑगस्ट रोजी

उमेश जाधवटिटवाळा - राज्य निवडणूक आयोगाने मुंबई ग्रामपंचायत (निवडणूक) नियम 1959 मधील नियम 7 मधील पोट नियम 1 अन्वये कल्याण तालुक्‍यातील सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम 24 ऑगस्ट रोजी जाहिर करण्यात आला आहे. फळेगांव, रुंदे, उशिद, मामनोली, दहिवली आवडली, केळणी कोलिंब या ग्रामपंचायतींचा त्यात समावेश आहे. या कामी कल्याण तहसिलदार कार्यालयीन यंत्रणा कामाला लागली आहे. तसेच गाव पातळीवर निवडणूकीसाठी मोर्चे बांधणी तर काही ठिकाणी निवडणूक बिनविरोध कशी होईल यासाठी बैठका सुरू झाल्या आहेत.

तालुक्‍यातील फळेगाव, उशिद या पंचायतींच्या निवडणुका गेली 15 वर्षे ग्रामस्थांच्या सहकार्याने बिनविरोध पार पाडल्या आहेत. त्याच धर्तीवर या वेळीही पंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी बैठका घेणे सुरू केले आहे. यात फळेगांव ग्रामस्थांनी बैठक घेतली असून ही ग्रामपंचायत बिनविरोध होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अशा प्रकारच्या बैठका इतर ग्रामपंचायतींच्या ग्रामस्थांनी घेऊन सर्वच ग्रामपंचायतींच्या निवडणूका शांततेत पार पाडाव्यात अशा प्रकारचे मत तहसिलदार किरण सुरवसे यांनी "लोकमतशी" बोलताना व्यक्त केली.

त्या परिने आम्ही राजकिय पक्ष कार्यकर्ते यांना देखील आवाहन आहे. तसेच ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होण्यासाठी स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी ग्रामस्थांना आवाहन करणारे पत्र या सहा ग्रामपंचायतींच्या गावातील घरोघरी वाटप केले आहे. पंचायत निवडणुका बिनविरोध करून गावातील सामाजिक सलोखा आणि ऐक्‍य कायम ठेवा, ग्रामपंचायत निवडणुका याच गावातील संघर्ष आणि तणावाचे कारण आहे. गावांच्या सर्वांगीण विकासाला त्यामुळे खीळ बसते, असे या पत्रकात म्हटले आहे. बुधवार दिनांक 3 ते 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागविणे व सादर करणे.

7 ऑगस्ट सार्वजनिक सुट्टीचा रवीवार वगळण्यात आला आहे. 10 ऑगस्ट रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी, तर 12 ऑगस्ट रोजी दुपारी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. तसेच याच दिवशी चिन्हे वाटप करण्यात येणार असून निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. बुधवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान होणार असून मतमोजणी 29 ऑगस्ट रोजी होणार आहे.

यावेळी देखील मतदार यादीतील घोळ या वेळीही कायम आहे. त्यामुळे प्रभाग वगळून अन्यत्र नावे गेल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. सध्या काही ठिकाणी ग्रामपंचायतीच्या या निवडणुकांकडे जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत समिती निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून देखील पाहिले जात आहे.