शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

24 ऑगस्टला कल्याण तालुक्‍यात सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार

By admin | Updated: July 31, 2016 14:38 IST

राज्य निवडणूक आयोगाने मुंबई ग्रामपंचायत (निवडणूक) नियम 1959 मधील नियम 7 मधील पोट नियम 1 अन्वये कल्याण तालुक्‍यातील सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम 24 ऑगस्ट रोजी

उमेश जाधवटिटवाळा - राज्य निवडणूक आयोगाने मुंबई ग्रामपंचायत (निवडणूक) नियम 1959 मधील नियम 7 मधील पोट नियम 1 अन्वये कल्याण तालुक्‍यातील सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम 24 ऑगस्ट रोजी जाहिर करण्यात आला आहे. फळेगांव, रुंदे, उशिद, मामनोली, दहिवली आवडली, केळणी कोलिंब या ग्रामपंचायतींचा त्यात समावेश आहे. या कामी कल्याण तहसिलदार कार्यालयीन यंत्रणा कामाला लागली आहे. तसेच गाव पातळीवर निवडणूकीसाठी मोर्चे बांधणी तर काही ठिकाणी निवडणूक बिनविरोध कशी होईल यासाठी बैठका सुरू झाल्या आहेत.

तालुक्‍यातील फळेगाव, उशिद या पंचायतींच्या निवडणुका गेली 15 वर्षे ग्रामस्थांच्या सहकार्याने बिनविरोध पार पाडल्या आहेत. त्याच धर्तीवर या वेळीही पंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी बैठका घेणे सुरू केले आहे. यात फळेगांव ग्रामस्थांनी बैठक घेतली असून ही ग्रामपंचायत बिनविरोध होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अशा प्रकारच्या बैठका इतर ग्रामपंचायतींच्या ग्रामस्थांनी घेऊन सर्वच ग्रामपंचायतींच्या निवडणूका शांततेत पार पाडाव्यात अशा प्रकारचे मत तहसिलदार किरण सुरवसे यांनी "लोकमतशी" बोलताना व्यक्त केली.

त्या परिने आम्ही राजकिय पक्ष कार्यकर्ते यांना देखील आवाहन आहे. तसेच ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होण्यासाठी स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी ग्रामस्थांना आवाहन करणारे पत्र या सहा ग्रामपंचायतींच्या गावातील घरोघरी वाटप केले आहे. पंचायत निवडणुका बिनविरोध करून गावातील सामाजिक सलोखा आणि ऐक्‍य कायम ठेवा, ग्रामपंचायत निवडणुका याच गावातील संघर्ष आणि तणावाचे कारण आहे. गावांच्या सर्वांगीण विकासाला त्यामुळे खीळ बसते, असे या पत्रकात म्हटले आहे. बुधवार दिनांक 3 ते 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागविणे व सादर करणे.

7 ऑगस्ट सार्वजनिक सुट्टीचा रवीवार वगळण्यात आला आहे. 10 ऑगस्ट रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी, तर 12 ऑगस्ट रोजी दुपारी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. तसेच याच दिवशी चिन्हे वाटप करण्यात येणार असून निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. बुधवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान होणार असून मतमोजणी 29 ऑगस्ट रोजी होणार आहे.

यावेळी देखील मतदार यादीतील घोळ या वेळीही कायम आहे. त्यामुळे प्रभाग वगळून अन्यत्र नावे गेल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. सध्या काही ठिकाणी ग्रामपंचायतीच्या या निवडणुकांकडे जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत समिती निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून देखील पाहिले जात आहे.