शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

निवडणूकीत आघाडीला बंडखोरांचे आव्हान

By admin | Updated: December 10, 2015 02:45 IST

विधानपरिषदेच्या आठ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारांव्यतिरिक्त इतरांनीही अर्ज दाखल करून

मुंबई : विधानपरिषदेच्या आठ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारांव्यतिरिक्त इतरांनीही अर्ज दाखल करून बंडखोरीचे निशाण फडकावले आहे. मात्र, १२ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असल्याने त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. विधान परिषदेच्या ८ जागांसाठी २७ डिसेंबरला मतदान होणार असून बुधवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मुंबई, सोलापूर, कोल्हापूर आणि अहमदनगर येथे आघाडीच्या उमेदवारांपुढे बंडखोरांनी आव्हान उभे केले आहे. मुंबईची जागा कॉंग्रेसकडे असून भाई जगताप यांनी दोन दिवसांपूर्वीच आपला अर्ज दाखल केला आहे. मात्र आज राष्ट्रवादीचे प्रसाद लाड यांनीही अर्ज दाखल केल्याने आघाडीत चलबिचल सुरू झाली आहे. ‘माझी उमेदवारी म्हणजे बंडखोरी नाही. मी पक्षाचा राजीनामा देऊन अर्ज भरला आहे. एकूण १० अपक्ष नगरसेवकांनी मला पाठिंबा दिला आहे आणि अजून काही नगरसेवक संपर्कात आहेत, असा दावा लाड यांनी केला. तर कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार महादेव महाडिक यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार सतेज पाटील यांच्या विरोधात बंडाचा झेंडा उभारला आहे. अहमदनगरची जागा राष्ट्रवादी लढणार असून पक्षाने अरुण जगताप यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे. असे असताना तेथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. ससाणे काँग्रेसचे माजी आमदार आणि साई संस्थानचे माजी अध्यक्ष आहेत. सोलापूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिपक साळुंखे यांच्याविरोधात काँग्रेसचे दिलीप माने यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. तर भाजपा-शिवसेना-स्वाभिमानी पुरस्कृत उमेदवार म्हणून प्रशांत परिचारक यांनी अर्ज दाखल केला.