शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

निवडणुकांचा बिगुल वाजला आता युतीचा बँड वाजेल!

By admin | Updated: January 15, 2017 04:13 IST

महापालिका व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजला, आता लवकरच सत्ताधारी युतीचा बँड वाजणार, असे सूचक वक्तव्य माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार

सोलापूर : महापालिका व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजला, आता लवकरच सत्ताधारी युतीचा बँड वाजणार, असे सूचक वक्तव्य माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात ‘लोकमत’शी बोलताना केले. राज्यातील ९ महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, पुढील महिन्यात निवडणुका पार पडणार आहेत. मात्र, असे असले, तरीही अद्याप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच भाजपा, शिवसेना या पक्षांमध्ये आघाडी वा युती करण्याचा निर्णय झालेला नाही. सर्वच पक्ष शड्डू ठोकून फडात उतरण्यास तयार असल्याचे निदान वरवर तरी दाखवत आहेत. हादेखील त्यांच्यातील जागावाटपाच्या राजकारणाचाच भाग आहे. याच पार्श्वभूमीवर सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करायची का, करायची असल्यास कशी, याबाबत प्रदेश काँग्रेस समिती निर्णय घेणार आहे. तरीही मतांची विभागणी होऊ नये, म्हणून आघाडी होणे महत्त्वाचे आहे, असे मत अनेक नेतेमंडळी आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मांडले आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.भाजपा-शिवसेना हे पारंपरिक विरोधी पक्ष आहेत. मात्र, आता नव्याने काही पक्ष आणि विरोधक तयार झाले आहेत. त्यांच्यात मताचे विभाजन होऊ नये, या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असेही शिंदे यांनी सांगितले. रुसून अन्य पक्षात गेलेले काही जण आता पुन्हा पक्षात येण्याबद्दल विचारणा करतात. मात्र, मी हा निर्णय स्थानिक नेत्यांवर सोपवला आहे, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. महापालिका निवडणुकीबाबत वेगवेगळी चर्चा असली, तरी पुन्हा काँग्रेस आघाडीचीच सत्ता येईल, असा ठाम विश्वासही शिंदे यांनी बोलून दाखविला. - राष्ट्रवादी सोबत आघाडी करण्याबाबतचा निर्णय प्रदेश काँग्रेस समिती घेणार आहे. भाजपा-शिवसेना हे काँगे्रसचे पारंपरिक विरोधी पक्ष आहेत. मात्र, आता नव्याने काही पक्ष आणि विरोधक तयार झाले आहेत. त्यांच्यात मताचे विभाजन होऊ नये, या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत़- सुशीलकुमार शिंदे