शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

तब्बल आठ तासांनी महापुरात अडकलेल्याला काढले बाहेर

By admin | Updated: July 13, 2016 20:19 IST

शिरोली (ता.हातकणंगले,जिल्हा कोल्हापूर)येथील शेतकरी मारूती मोंगले, भाऊसाहेब मोंगले यांना तब्बल आठ तासांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने सुरक्षित बाहेर काढले.

सतीश पाटील/ऑनलाइन लोकमतशिरोळी, दि.13 - महापुराच्या पाण्यात तीन किलोमिटर आत अडकलेल्या शिरोली (ता.हातकणंगले,जिल्हा कोल्हापूर)येथील शेतकरी मारूती मोंगले, भाऊसाहेब मोंगले यांना तब्बल आठ तासांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने सुरक्षित बाहेर काढले. शिरोली माळवाडी भागातील शेतकरी नवनाथ संकपाळ ,मारूती मोंगले ,भाऊसाहेब मोंगले हे तिघेजण सकाळी आठ वाजता जणावरांना चारा आणण्यासाठी पंचगंगा नदी किनारी डांगे मळ्यात गेले होते ,सकाळी आत जाताना एक दीड फूटच पाणी होते, पण हळूहळू पाणी वाढत वाढत सहा सात फूटावर गेले पाणी वाढत असल्याचे लक्ष्यात आल्यावर तिघांनी शेजारच्या आंब्याच्या झाडाचा आधार घेतला, आणि झाडावर जाऊन बसले ,पण यातील मारूती मोंगले ,भाऊसाहेब मोंगले यांना पोहता येत नव्हते  आणि पाणी ही कमी होईना ,नवनाथ संकपाळ याला पोहता येत होते, दुपारी एकच्या सुमारास नवनाथने धाडस करून पोहत काटावर आला ,आणि घरी जाऊन तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील यांना ही घटना सांगीतली ,सतीश पाटील आणि शिवसेना जिल्हा ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष दीपक यादव यांनी तहसीलदार दीपक शिंदे यांना फोन करून महापूरात दोन शेतकरी अडकले आहेत ,असे सांगीतले,आणि दुपारी दोन नंतर या शेतकर्याना वाचवण्यासाठी गतीने चक्रे फिरली ,स्थानिक पट्टीचे पोहणारे ज्योतीराम पोर्लेकर , अतुल सोडगे , अवदुत पवार ,रणजीत मोंगले, नागनाथ संकपाळ, अनिल मोरे ,तानाजी गायकवाड ,गुंडा सोडगे  यांनी निकम पाणंदीने आत जाण्यासाठी दोनदा प्रयत्न केला पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने आत जाताच येईना अखेर साडेतीन वाजता स्थानीक पोहणारे वरील तेरा जण पंचगंगा नदी शेजारच्या दर्गा समोरून पाण्यात उतरले ,ते आत पाण्यात गेले तोच राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक आले हे पथ चार वाजता आडकलेल्या लोकांना आणण्यासाठी गेले घटनास्थळी चार वाजून विस मिनीटानी पोहचले चार चाळीसला त्यांना सुखरूप बाहेर काढले यावेळी आमदार अमल महाडीक,प्रांताधिकारी अश्विनी जिरगे,सलिम महात ,महेश चव्हाण,सुरेश यादव ,सतीश पाटील ,दीपक यादव यांच्यासह नागरीक मोठ्या संखेने घटनास्थळी होते.

सुखरूप पोहचलो-महापुरात आडकलेल्या शेतकर्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने सुखरूप बाहेर आणले त्यांना पहाण्यासाठी गावकरी आणि महामार्गावरील लोकांनी मोठी गर्दी केली होती ,यावेळी पाण्यातून बाहेर आल्यावर भाऊसाहेब मोंगले ,मारूती मोंगले यांना घेरा घातला ,घरच्या मुलांनी अंगातील भिजलेले कपडे काढून नविन कपडे घालण्यासाठी दिले हे दोघे ही भांबावलेले होते ,पाण्यातून बाहेर आल्यावर जिवातजीव आला बाहेर आल्यावर सुखरूप पोहचलो एकदाचे असे दोघे म्हणत त्यांच्या चेहर्यावर आंनंद दिसत होता.

भूक लागली आहे :-सकाळी घरातून सात वाजता जनावरांना चारा आणण्यासाठी नवनाथ संकपाळ, भाऊसाहेब मोंगले ,मारूती मोंगले हे तिघेजण गेले होते, पुराचे पाणी वाढल्याने तिघेही पाण्यात आडकून बसले होते ,त्यातील नवनाथ दोन वाजता बाहेर आला,आणि दुपारी चार वाजता  राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने उर्वरीत दोघांना आठ तासानी बाहेर काढले, पुरात आडकलेले दोघेजण साठ वर्षा पेक्षा जास्त असल्याने दोघांनाही भूक लागून पोटात कावळे ओरडत होते,त्यांना पहाण्यासाठी  बघ्यांनी गर्दी केली होती,यावेळी मारूती मोंगले भूका लागल्यात घराकडे जातो असे म्हणून तेथून बाहेर पडले.

 राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे अभिनंदन:-राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने गेल्या तिन दिवसांत अतिशय चांगले काम केले आहे,वाहुन गेलेल्या मुलग्याला शोधन्याचा युद्ध पातळीवर प्रयत्न केला, शिरोली येथील या दोन शेतकर्याचे जिव वाचवले त्याबद्दल शिरोलीत पंचगंगा नदी पुलावर घटनास्थळी येऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे खास अभिनंदन केले.

नवनाथचे धाडस :-गेल्या तीन दिवसापासून धुंवाधार पाऊस पडत आहे ,नवनाथ आणि मोंगले बंधू जनावरांना चारा आणण्यासाठी गेले आणि पुराच्या पाण्यात आडकले ,पाणी वाढत असलेले नवनाथच्या लक्षात आले आणि तिघांनी शेजारच्या आंब्याच्या झाडाचा आधार घेतला, पण मारूती मोंगले,भाऊसाहेब मोंगले यांना पोहता येत नव्हते, दुपारी एक वाजता नवनाथने धाडस करून पुराच्या पाण्यातून तिन किलोमिटर पोहत येऊन घरी व इतर लोकांना ही घटना सांगीतली त्यामुळे नवनाथच्या धाडसामुळे दोघांचे प्राण वाचले आहेत.