शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
4
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
5
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
6
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
7
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
8
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
9
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
10
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
11
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
12
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
13
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
14
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
15
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
16
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
17
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
18
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
19
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
20
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार

तब्बल आठ तासांनी महापुरात अडकलेल्याला काढले बाहेर

By admin | Updated: July 13, 2016 20:19 IST

शिरोली (ता.हातकणंगले,जिल्हा कोल्हापूर)येथील शेतकरी मारूती मोंगले, भाऊसाहेब मोंगले यांना तब्बल आठ तासांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने सुरक्षित बाहेर काढले.

सतीश पाटील/ऑनलाइन लोकमतशिरोळी, दि.13 - महापुराच्या पाण्यात तीन किलोमिटर आत अडकलेल्या शिरोली (ता.हातकणंगले,जिल्हा कोल्हापूर)येथील शेतकरी मारूती मोंगले, भाऊसाहेब मोंगले यांना तब्बल आठ तासांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने सुरक्षित बाहेर काढले. शिरोली माळवाडी भागातील शेतकरी नवनाथ संकपाळ ,मारूती मोंगले ,भाऊसाहेब मोंगले हे तिघेजण सकाळी आठ वाजता जणावरांना चारा आणण्यासाठी पंचगंगा नदी किनारी डांगे मळ्यात गेले होते ,सकाळी आत जाताना एक दीड फूटच पाणी होते, पण हळूहळू पाणी वाढत वाढत सहा सात फूटावर गेले पाणी वाढत असल्याचे लक्ष्यात आल्यावर तिघांनी शेजारच्या आंब्याच्या झाडाचा आधार घेतला, आणि झाडावर जाऊन बसले ,पण यातील मारूती मोंगले ,भाऊसाहेब मोंगले यांना पोहता येत नव्हते  आणि पाणी ही कमी होईना ,नवनाथ संकपाळ याला पोहता येत होते, दुपारी एकच्या सुमारास नवनाथने धाडस करून पोहत काटावर आला ,आणि घरी जाऊन तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील यांना ही घटना सांगीतली ,सतीश पाटील आणि शिवसेना जिल्हा ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष दीपक यादव यांनी तहसीलदार दीपक शिंदे यांना फोन करून महापूरात दोन शेतकरी अडकले आहेत ,असे सांगीतले,आणि दुपारी दोन नंतर या शेतकर्याना वाचवण्यासाठी गतीने चक्रे फिरली ,स्थानिक पट्टीचे पोहणारे ज्योतीराम पोर्लेकर , अतुल सोडगे , अवदुत पवार ,रणजीत मोंगले, नागनाथ संकपाळ, अनिल मोरे ,तानाजी गायकवाड ,गुंडा सोडगे  यांनी निकम पाणंदीने आत जाण्यासाठी दोनदा प्रयत्न केला पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने आत जाताच येईना अखेर साडेतीन वाजता स्थानीक पोहणारे वरील तेरा जण पंचगंगा नदी शेजारच्या दर्गा समोरून पाण्यात उतरले ,ते आत पाण्यात गेले तोच राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक आले हे पथ चार वाजता आडकलेल्या लोकांना आणण्यासाठी गेले घटनास्थळी चार वाजून विस मिनीटानी पोहचले चार चाळीसला त्यांना सुखरूप बाहेर काढले यावेळी आमदार अमल महाडीक,प्रांताधिकारी अश्विनी जिरगे,सलिम महात ,महेश चव्हाण,सुरेश यादव ,सतीश पाटील ,दीपक यादव यांच्यासह नागरीक मोठ्या संखेने घटनास्थळी होते.

सुखरूप पोहचलो-महापुरात आडकलेल्या शेतकर्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने सुखरूप बाहेर आणले त्यांना पहाण्यासाठी गावकरी आणि महामार्गावरील लोकांनी मोठी गर्दी केली होती ,यावेळी पाण्यातून बाहेर आल्यावर भाऊसाहेब मोंगले ,मारूती मोंगले यांना घेरा घातला ,घरच्या मुलांनी अंगातील भिजलेले कपडे काढून नविन कपडे घालण्यासाठी दिले हे दोघे ही भांबावलेले होते ,पाण्यातून बाहेर आल्यावर जिवातजीव आला बाहेर आल्यावर सुखरूप पोहचलो एकदाचे असे दोघे म्हणत त्यांच्या चेहर्यावर आंनंद दिसत होता.

भूक लागली आहे :-सकाळी घरातून सात वाजता जनावरांना चारा आणण्यासाठी नवनाथ संकपाळ, भाऊसाहेब मोंगले ,मारूती मोंगले हे तिघेजण गेले होते, पुराचे पाणी वाढल्याने तिघेही पाण्यात आडकून बसले होते ,त्यातील नवनाथ दोन वाजता बाहेर आला,आणि दुपारी चार वाजता  राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने उर्वरीत दोघांना आठ तासानी बाहेर काढले, पुरात आडकलेले दोघेजण साठ वर्षा पेक्षा जास्त असल्याने दोघांनाही भूक लागून पोटात कावळे ओरडत होते,त्यांना पहाण्यासाठी  बघ्यांनी गर्दी केली होती,यावेळी मारूती मोंगले भूका लागल्यात घराकडे जातो असे म्हणून तेथून बाहेर पडले.

 राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे अभिनंदन:-राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने गेल्या तिन दिवसांत अतिशय चांगले काम केले आहे,वाहुन गेलेल्या मुलग्याला शोधन्याचा युद्ध पातळीवर प्रयत्न केला, शिरोली येथील या दोन शेतकर्याचे जिव वाचवले त्याबद्दल शिरोलीत पंचगंगा नदी पुलावर घटनास्थळी येऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे खास अभिनंदन केले.

नवनाथचे धाडस :-गेल्या तीन दिवसापासून धुंवाधार पाऊस पडत आहे ,नवनाथ आणि मोंगले बंधू जनावरांना चारा आणण्यासाठी गेले आणि पुराच्या पाण्यात आडकले ,पाणी वाढत असलेले नवनाथच्या लक्षात आले आणि तिघांनी शेजारच्या आंब्याच्या झाडाचा आधार घेतला, पण मारूती मोंगले,भाऊसाहेब मोंगले यांना पोहता येत नव्हते, दुपारी एक वाजता नवनाथने धाडस करून पुराच्या पाण्यातून तिन किलोमिटर पोहत येऊन घरी व इतर लोकांना ही घटना सांगीतली त्यामुळे नवनाथच्या धाडसामुळे दोघांचे प्राण वाचले आहेत.