शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

वीजबिलाची वसुली कार्यक्षमतेने करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2017 02:48 IST

ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली अत्यावश्यक असून, त्यासाठी संबंधितांनी अधिक कार्यक्षमतेने काम करण्याची गरज आहे.

मुंबई : ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली अत्यावश्यक असून, त्यासाठी संबंधितांनी अधिक कार्यक्षमतेने काम करण्याची गरज आहे. यात हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिला आहे.महावितरणच्या चार प्रादेशिक संचालकांसह सर्व १६ परिमंडलातील मुख्य अभियंता व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत संजीवकुमार यांनी थकबाकी वसुलीसाठी अधिक गांभीर्याने कार्यरत व्हावे, असे निर्देश दिले आहेत. सध्या महावितरणची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून, थकबाकी वसुलीशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. त्यासाठी सातत्याने वीजवसुली मोहिमा राबवाव्यात, विशेषत: कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांच्या थकबाकी वसुलीबरोबरच, चालू वीजबिल पूर्णपणे वसूल व्हावे, यावर लक्ष केंद्रित करावे, तसेच ज्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे, त्यांचे क्रॉस चेकिंग करून, जर काही ग्राहक गैरमार्गाने वीज घेत असतील, तर त्याच्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. युनिटची वसुली गरजेचीमहावितरणचा कारभार सुरळीत चालण्याकरिता, ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक विजेच्या युनिटची वसुली होणे गरजेचे आहे. दर महिन्याला कोणत्या विभागाने किती वसुली करायची, याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात येत असते.वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्याचे निर्देशदर महिन्याची वसुली, ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा बरीच कमी होत असून, याबाबतची कारणेही रास्त नसल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, ही वसुली नेटाने व्हावी, यासाठी सर्व मुख्य अभियंत्यांना वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.ग्राहकांच्या मोबाइल नोंदणीचे प्रमाण वाढवाग्राहकांनी वापरलेल्या विजेचे अचूक बिलिंग होण्यासाठी यंत्रणा सक्षम करावी, ग्राहकांच्या मोबाइल नोंदणीचे प्रमाण वाढवावे, तसेच कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामकाजात मोबाइल अ‍ॅपचा वापर करून, कामात गतिशीलता व पारदर्शकता आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.