शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
2
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
3
Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात
4
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
5
आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का
6
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
7
"ऑपरेशन झाल्यावर २९ गाठी आढळल्या.."; अभिनेते विजय पटवर्धन यांच्या पत्नीला झालेला कॅन्सर, सांगितला अनुभव
8
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
9
मुंबई बॉम्बस्फोट: ९ वर्षे जगण्यासाठी झुंजला पराग सावंत, कुटुंबियांना आजही दु:ख
10
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
11
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
12
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
13
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
14
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
15
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
16
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
17
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
18
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
19
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
20
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 

गृहमंत्री न झाल्याचा शिक्षणमंत्र्यांना राग

By admin | Updated: September 5, 2015 01:13 IST

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची गृहमंत्री होण्याची इच्छा होती. मात्र त्यांची ही इच्छा फलद्रुप न झाल्याने शिक्षक आमदारांना तुरुंगात टाकण्याची धमकी देऊन

मुंबई : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची गृहमंत्री होण्याची इच्छा होती. मात्र त्यांची ही इच्छा फलद्रुप न झाल्याने शिक्षक आमदारांना तुरुंगात टाकण्याची धमकी देऊन तावडे आपली हौस भागवून घेत आहेत, असा टोला शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी तावडे यांना लगावला.मुंबईत २६ जुलै २००५ रोजी मुसळधार वृष्टी झाली. त्यावेळी मिठी नदी परिसरातील लोकांची घरे बुडाली. त्यांचे उपनगरात स्थलांतर करण्यात आले. मात्र मुलांची ‘शिवम विद्यालयह्ण शाळा स्थलांतरित केली नाही. या शाळेत २ हजार विद्यार्थी शिकत होते. पुरामुळे नष्ट झालेल्या तीन शाळा त्यावेळी उपनगरांत हलवण्यात आल्या. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्याकडे आपण मुंबईच्या दक्षिण व मध्य भागातील बंद पडलेल्या तुकड्या उपनगरात स्थलांतरित करण्याची मागणी केली होती, असे पाटील यांनी सांगितले. उपनगरात स्थलांतरित केलेल्या तुकड्यांपैकी एकही तुकडी विनाअनुदानित शाळेत दिलेली नाही तसेच दोन्हीकडे शिक्षकांना पगार दिला जात असल्याचे एकही उदाहरण नाही, असेही पाटील म्हणाले. राज्य शासनाने १२ जून २००७ रोजी तुकड्यांचे समायोजन करण्याचा निर्णय घेतला. १०२४ अतिरिक्त तुकड्यांचे पूर्ण समायोजन करण्याची शाळांची मागणी असूनही मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या विभागात ते झालेले नाही. (विशेष प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ व महामंडळाने ५ सप्टेंबर या शिक्षण दिनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षकदिनी शिक्षक काळ््या फिती लावून काम करणार असल्याचे मुख्याध्यापक संघटनेने सांगितले.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिक्षक राज्य सरकारने २८ आॅगस्ट रोजी काढलेल्या अध्यादेशाची शिक्षकदिनी होळी करणार आहेत. शिवाय संपूर्ण दिवस उपवास करून सरकारचा निषेध व्यक्त केला जाईल, असेही संघटनेने सांगितले. दरम्यान, राज्यभर होणाऱ्या निदर्शने, उपोषण आणि आंदोलनांना मुख्याध्यापक संघटना पाठिंबा देतील, असे प्रशांत रेडीज यांनी सांगितले.२८ आॅगस्टच्या शासन निर्णयाविरोधात शिक्षक आमदार कपिल पाटील शिक्षकदिनी परळच्या कामगार मैदानावर सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत उपोषणास बसणार आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षण हक्क कृती समितीने या उपोषणास पाठिंबा दिला आहे. शासनाच्या निर्णयाने अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना फटका बसणार असल्याच समितीचा आरोप आहे. परिणामी शासनाने निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे.१०६ शिक्षक ‘राज्य शिक्षक पुरस्कार’चे मानकरीठाणे : १०६ शिक्षक व शिक्षिका २०१४-१५ या वर्षाच्या राज्य शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते या शिक्षकांना उद्या (५ सप्टेंबर) सन्मानित केले जाणार आहे. ७४ शिक्षकांसह ३२ शिक्षिकांचा समावेश आहे. यामध्ये सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षिकांचाही समावेश आहे. या वर्षापासून प्रथमच स्काऊट-गाइडच्या शिक्षकांसह अपंग शाळेच्या शिक्षकांचीदेखील या पुरस्कारासाठी निवड केली आहे.