शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

गृहमंत्री न झाल्याचा शिक्षणमंत्र्यांना राग

By admin | Updated: September 5, 2015 01:13 IST

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची गृहमंत्री होण्याची इच्छा होती. मात्र त्यांची ही इच्छा फलद्रुप न झाल्याने शिक्षक आमदारांना तुरुंगात टाकण्याची धमकी देऊन

मुंबई : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची गृहमंत्री होण्याची इच्छा होती. मात्र त्यांची ही इच्छा फलद्रुप न झाल्याने शिक्षक आमदारांना तुरुंगात टाकण्याची धमकी देऊन तावडे आपली हौस भागवून घेत आहेत, असा टोला शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी तावडे यांना लगावला.मुंबईत २६ जुलै २००५ रोजी मुसळधार वृष्टी झाली. त्यावेळी मिठी नदी परिसरातील लोकांची घरे बुडाली. त्यांचे उपनगरात स्थलांतर करण्यात आले. मात्र मुलांची ‘शिवम विद्यालयह्ण शाळा स्थलांतरित केली नाही. या शाळेत २ हजार विद्यार्थी शिकत होते. पुरामुळे नष्ट झालेल्या तीन शाळा त्यावेळी उपनगरांत हलवण्यात आल्या. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्याकडे आपण मुंबईच्या दक्षिण व मध्य भागातील बंद पडलेल्या तुकड्या उपनगरात स्थलांतरित करण्याची मागणी केली होती, असे पाटील यांनी सांगितले. उपनगरात स्थलांतरित केलेल्या तुकड्यांपैकी एकही तुकडी विनाअनुदानित शाळेत दिलेली नाही तसेच दोन्हीकडे शिक्षकांना पगार दिला जात असल्याचे एकही उदाहरण नाही, असेही पाटील म्हणाले. राज्य शासनाने १२ जून २००७ रोजी तुकड्यांचे समायोजन करण्याचा निर्णय घेतला. १०२४ अतिरिक्त तुकड्यांचे पूर्ण समायोजन करण्याची शाळांची मागणी असूनही मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या विभागात ते झालेले नाही. (विशेष प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ व महामंडळाने ५ सप्टेंबर या शिक्षण दिनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षकदिनी शिक्षक काळ््या फिती लावून काम करणार असल्याचे मुख्याध्यापक संघटनेने सांगितले.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिक्षक राज्य सरकारने २८ आॅगस्ट रोजी काढलेल्या अध्यादेशाची शिक्षकदिनी होळी करणार आहेत. शिवाय संपूर्ण दिवस उपवास करून सरकारचा निषेध व्यक्त केला जाईल, असेही संघटनेने सांगितले. दरम्यान, राज्यभर होणाऱ्या निदर्शने, उपोषण आणि आंदोलनांना मुख्याध्यापक संघटना पाठिंबा देतील, असे प्रशांत रेडीज यांनी सांगितले.२८ आॅगस्टच्या शासन निर्णयाविरोधात शिक्षक आमदार कपिल पाटील शिक्षकदिनी परळच्या कामगार मैदानावर सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत उपोषणास बसणार आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षण हक्क कृती समितीने या उपोषणास पाठिंबा दिला आहे. शासनाच्या निर्णयाने अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना फटका बसणार असल्याच समितीचा आरोप आहे. परिणामी शासनाने निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे.१०६ शिक्षक ‘राज्य शिक्षक पुरस्कार’चे मानकरीठाणे : १०६ शिक्षक व शिक्षिका २०१४-१५ या वर्षाच्या राज्य शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते या शिक्षकांना उद्या (५ सप्टेंबर) सन्मानित केले जाणार आहे. ७४ शिक्षकांसह ३२ शिक्षिकांचा समावेश आहे. यामध्ये सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षिकांचाही समावेश आहे. या वर्षापासून प्रथमच स्काऊट-गाइडच्या शिक्षकांसह अपंग शाळेच्या शिक्षकांचीदेखील या पुरस्कारासाठी निवड केली आहे.