शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मातृत्वाला बालमृत्यूचे ग्रहण

By admin | Updated: May 14, 2017 07:35 IST

अत्याधुनिक उपचार पद्धतीने देशात असाध्य रोग नियंत्रणात येऊन आयुर्मान वाढले असले तरी अद्यापही आपण बालमृत्यू रोखण्यात पूर्णत: यशस्वी ठरलो नसल्याचे समोर आले आहे.

विशाल शिर्के / ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 14 - अत्याधुनिक उपचार पद्धतीने देशात असाध्य रोग नियंत्रणात येऊन आयुर्मान वाढले असले तरी अद्यापही आपण बालमृत्यू रोखण्यात पूर्णत: यशस्वी ठरलो नसल्याचे समोर आले आहे. देशात अजूनही दर हजारामारे सरासरी ३७ बालकांचा मृत्यू होत असून, महाराष्ट्रात हेच प्रमाण २१ इतके आहे. मूल जन्माला आल्यानंतर एक वर्षांच्या आत जर विवध वैद्यकीय कारणांनी बालकाचा मृत्यू झाल्यास त्याला बालमृत्यू मानला जातो. त्यात अर्भकाला झालेला संसर्ग, विविध आजारांना बळी पडणे आणि इतर वैद्यकीय कारणांचा यात समावेश होतो. प्रसूती दरम्यान अथवा नंतरही योग्य काळजी न घेतल्यास बालके जंतुसंसर्गाला बळी पडण्याची शक्यता असते. पोषण आहारांच्या कमतरतेमुळे विविध रोगांना बालक बळी पडू शकते. लोकमतकडे २००१ ते २०१५ दरम्यानची बालमृत्यूची आकडेवारी हाती आली आहे. त्या नुसार बालमृत्यूच्या प्रमाणात निम्म्याने घट झाली असली तरी अद्यापही दरहजारी बालकांममागे मृत्यू पडणाऱ्या बालकांची संख्या ही वैद्यकीय सेवा आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी याबाबत गंभीर विचार करायला लावणारी आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील बालमृत्यूचे प्रमाण जवळपास दुप्पटी जवळ जाणारे असल्याचे वास्तव आहे. देशात २००१ साली देशात ग्रामीण भागात दर हजारी बालकांमागे ७२ आणि श्हरी भागात ४२ बालकांचा मृत्यू होत असल्याची नोंद आहे. त्या वेळी राज्यात दर हजारी जन्मामागे ग्रामीण भागात ५५, तर शहरी भागात २७ बालकांचा मृत्यू होत होता. या संख्येत २०१५ पर्यंत ग्रामीण भागात ४१ आणि श्हरी भागात २५ पर्यंत घट झालीी आहे. महाराष्ट्रात हेच प्रमाण ग्रामीण भागात २६ आणि शहरी भागात १४ इतके आहे. संख्येत निम्मी घट दिसत असली तरी ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवा अजूनही बरीच मागे असल्याचे स्पष्ट होत आहे. जन्मावेळी मुलाचे वजन खूप कमी असणे, प्रसूतीनंतर जंतूसंसर्ग होणे अशा विविध कारणांमुळे बालमृत्यू होत आहे. गेल्या दहा वर्षांची आकडेवारी पाहिल्यास बालमृत्यूच्या प्रमाणात घट होत आहे. राज्यात आदिवासी भागात हे प्रमाण अधिक आहे. बालमृत्यूचे प्रमाण अधिक असलेल्या २५ तालुक्यांत विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त संचालिका अर्चना पाटील यांनी सांगितले. वैद्यकीय सेवेतही केरळ अव्वल - शिक्षणाबरोबरच दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्यात केरळा आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. येथील ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही ठिकाणचा बालमृत्यूचा दर देशात कमी आहे. गेल्या पंधरा वर्षांत येथील शहरी आणि ग्रामीण भागातील दरहजारी मृत्यूचे प्रमाण १२ ते १५ दरम्यान राखण्यात येथील वैद्यकीय व्यवस्थेला यश आले आहे.दाम्पत्याने मूल हवय असा विचार केल्यानंतर, आईची ववैद्यकीय तपासणी प्रथम केली पाहीजे. जर संबंधित महिलेला थायरॉईड, रक्तदाब असे काही आजार असल्यास त्यावर उपचार करुन मग आई होण्याचा निर्णय घेणे बाळ आणि आईसाठी चांगले असते. अन्यथा बाळाला धोका होण्याचा संभव असतो. गर्भधारणेनंतर आहार आणि औषधोपचार योग्य होतो की नाही यावरही बरेचकाही अवलंबून असते. तसेच, बाळाच्या जन्मानंतर त्याला वेळच्या वेळेवर डॉक्टरांच्या निगरानीखाली औषधोपचार झाला पाहीजे. अनेकदा सरकारी रुग्णालयात बाळाला औषधांचा डोस दिल्यास पुरेसे असे अनेक पालक मानतात. मात्र, डॉक्टरांचा सल्ला घेणे उपयोगी असते. कारण या दरम्यान डॉक्टर बाळाची प्रकृती देखील तपासत असतो. डॉ. मीनाक्षी देशपांडे, स्त्री रोग तज्ञ तथा सह सचिव इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे