शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

मातृत्वाला बालमृत्यूचे ग्रहण

By admin | Updated: May 14, 2017 07:35 IST

अत्याधुनिक उपचार पद्धतीने देशात असाध्य रोग नियंत्रणात येऊन आयुर्मान वाढले असले तरी अद्यापही आपण बालमृत्यू रोखण्यात पूर्णत: यशस्वी ठरलो नसल्याचे समोर आले आहे.

विशाल शिर्के / ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 14 - अत्याधुनिक उपचार पद्धतीने देशात असाध्य रोग नियंत्रणात येऊन आयुर्मान वाढले असले तरी अद्यापही आपण बालमृत्यू रोखण्यात पूर्णत: यशस्वी ठरलो नसल्याचे समोर आले आहे. देशात अजूनही दर हजारामारे सरासरी ३७ बालकांचा मृत्यू होत असून, महाराष्ट्रात हेच प्रमाण २१ इतके आहे. मूल जन्माला आल्यानंतर एक वर्षांच्या आत जर विवध वैद्यकीय कारणांनी बालकाचा मृत्यू झाल्यास त्याला बालमृत्यू मानला जातो. त्यात अर्भकाला झालेला संसर्ग, विविध आजारांना बळी पडणे आणि इतर वैद्यकीय कारणांचा यात समावेश होतो. प्रसूती दरम्यान अथवा नंतरही योग्य काळजी न घेतल्यास बालके जंतुसंसर्गाला बळी पडण्याची शक्यता असते. पोषण आहारांच्या कमतरतेमुळे विविध रोगांना बालक बळी पडू शकते. लोकमतकडे २००१ ते २०१५ दरम्यानची बालमृत्यूची आकडेवारी हाती आली आहे. त्या नुसार बालमृत्यूच्या प्रमाणात निम्म्याने घट झाली असली तरी अद्यापही दरहजारी बालकांममागे मृत्यू पडणाऱ्या बालकांची संख्या ही वैद्यकीय सेवा आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी याबाबत गंभीर विचार करायला लावणारी आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील बालमृत्यूचे प्रमाण जवळपास दुप्पटी जवळ जाणारे असल्याचे वास्तव आहे. देशात २००१ साली देशात ग्रामीण भागात दर हजारी बालकांमागे ७२ आणि श्हरी भागात ४२ बालकांचा मृत्यू होत असल्याची नोंद आहे. त्या वेळी राज्यात दर हजारी जन्मामागे ग्रामीण भागात ५५, तर शहरी भागात २७ बालकांचा मृत्यू होत होता. या संख्येत २०१५ पर्यंत ग्रामीण भागात ४१ आणि श्हरी भागात २५ पर्यंत घट झालीी आहे. महाराष्ट्रात हेच प्रमाण ग्रामीण भागात २६ आणि शहरी भागात १४ इतके आहे. संख्येत निम्मी घट दिसत असली तरी ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवा अजूनही बरीच मागे असल्याचे स्पष्ट होत आहे. जन्मावेळी मुलाचे वजन खूप कमी असणे, प्रसूतीनंतर जंतूसंसर्ग होणे अशा विविध कारणांमुळे बालमृत्यू होत आहे. गेल्या दहा वर्षांची आकडेवारी पाहिल्यास बालमृत्यूच्या प्रमाणात घट होत आहे. राज्यात आदिवासी भागात हे प्रमाण अधिक आहे. बालमृत्यूचे प्रमाण अधिक असलेल्या २५ तालुक्यांत विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त संचालिका अर्चना पाटील यांनी सांगितले. वैद्यकीय सेवेतही केरळ अव्वल - शिक्षणाबरोबरच दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्यात केरळा आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. येथील ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही ठिकाणचा बालमृत्यूचा दर देशात कमी आहे. गेल्या पंधरा वर्षांत येथील शहरी आणि ग्रामीण भागातील दरहजारी मृत्यूचे प्रमाण १२ ते १५ दरम्यान राखण्यात येथील वैद्यकीय व्यवस्थेला यश आले आहे.दाम्पत्याने मूल हवय असा विचार केल्यानंतर, आईची ववैद्यकीय तपासणी प्रथम केली पाहीजे. जर संबंधित महिलेला थायरॉईड, रक्तदाब असे काही आजार असल्यास त्यावर उपचार करुन मग आई होण्याचा निर्णय घेणे बाळ आणि आईसाठी चांगले असते. अन्यथा बाळाला धोका होण्याचा संभव असतो. गर्भधारणेनंतर आहार आणि औषधोपचार योग्य होतो की नाही यावरही बरेचकाही अवलंबून असते. तसेच, बाळाच्या जन्मानंतर त्याला वेळच्या वेळेवर डॉक्टरांच्या निगरानीखाली औषधोपचार झाला पाहीजे. अनेकदा सरकारी रुग्णालयात बाळाला औषधांचा डोस दिल्यास पुरेसे असे अनेक पालक मानतात. मात्र, डॉक्टरांचा सल्ला घेणे उपयोगी असते. कारण या दरम्यान डॉक्टर बाळाची प्रकृती देखील तपासत असतो. डॉ. मीनाक्षी देशपांडे, स्त्री रोग तज्ञ तथा सह सचिव इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे