शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

मातृत्वाला बालमृत्यूचे ग्रहण

By admin | Updated: May 14, 2017 07:35 IST

अत्याधुनिक उपचार पद्धतीने देशात असाध्य रोग नियंत्रणात येऊन आयुर्मान वाढले असले तरी अद्यापही आपण बालमृत्यू रोखण्यात पूर्णत: यशस्वी ठरलो नसल्याचे समोर आले आहे.

विशाल शिर्के / ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 14 - अत्याधुनिक उपचार पद्धतीने देशात असाध्य रोग नियंत्रणात येऊन आयुर्मान वाढले असले तरी अद्यापही आपण बालमृत्यू रोखण्यात पूर्णत: यशस्वी ठरलो नसल्याचे समोर आले आहे. देशात अजूनही दर हजारामारे सरासरी ३७ बालकांचा मृत्यू होत असून, महाराष्ट्रात हेच प्रमाण २१ इतके आहे. मूल जन्माला आल्यानंतर एक वर्षांच्या आत जर विवध वैद्यकीय कारणांनी बालकाचा मृत्यू झाल्यास त्याला बालमृत्यू मानला जातो. त्यात अर्भकाला झालेला संसर्ग, विविध आजारांना बळी पडणे आणि इतर वैद्यकीय कारणांचा यात समावेश होतो. प्रसूती दरम्यान अथवा नंतरही योग्य काळजी न घेतल्यास बालके जंतुसंसर्गाला बळी पडण्याची शक्यता असते. पोषण आहारांच्या कमतरतेमुळे विविध रोगांना बालक बळी पडू शकते. लोकमतकडे २००१ ते २०१५ दरम्यानची बालमृत्यूची आकडेवारी हाती आली आहे. त्या नुसार बालमृत्यूच्या प्रमाणात निम्म्याने घट झाली असली तरी अद्यापही दरहजारी बालकांममागे मृत्यू पडणाऱ्या बालकांची संख्या ही वैद्यकीय सेवा आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी याबाबत गंभीर विचार करायला लावणारी आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील बालमृत्यूचे प्रमाण जवळपास दुप्पटी जवळ जाणारे असल्याचे वास्तव आहे. देशात २००१ साली देशात ग्रामीण भागात दर हजारी बालकांमागे ७२ आणि श्हरी भागात ४२ बालकांचा मृत्यू होत असल्याची नोंद आहे. त्या वेळी राज्यात दर हजारी जन्मामागे ग्रामीण भागात ५५, तर शहरी भागात २७ बालकांचा मृत्यू होत होता. या संख्येत २०१५ पर्यंत ग्रामीण भागात ४१ आणि श्हरी भागात २५ पर्यंत घट झालीी आहे. महाराष्ट्रात हेच प्रमाण ग्रामीण भागात २६ आणि शहरी भागात १४ इतके आहे. संख्येत निम्मी घट दिसत असली तरी ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवा अजूनही बरीच मागे असल्याचे स्पष्ट होत आहे. जन्मावेळी मुलाचे वजन खूप कमी असणे, प्रसूतीनंतर जंतूसंसर्ग होणे अशा विविध कारणांमुळे बालमृत्यू होत आहे. गेल्या दहा वर्षांची आकडेवारी पाहिल्यास बालमृत्यूच्या प्रमाणात घट होत आहे. राज्यात आदिवासी भागात हे प्रमाण अधिक आहे. बालमृत्यूचे प्रमाण अधिक असलेल्या २५ तालुक्यांत विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त संचालिका अर्चना पाटील यांनी सांगितले. वैद्यकीय सेवेतही केरळ अव्वल - शिक्षणाबरोबरच दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्यात केरळा आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. येथील ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही ठिकाणचा बालमृत्यूचा दर देशात कमी आहे. गेल्या पंधरा वर्षांत येथील शहरी आणि ग्रामीण भागातील दरहजारी मृत्यूचे प्रमाण १२ ते १५ दरम्यान राखण्यात येथील वैद्यकीय व्यवस्थेला यश आले आहे.दाम्पत्याने मूल हवय असा विचार केल्यानंतर, आईची ववैद्यकीय तपासणी प्रथम केली पाहीजे. जर संबंधित महिलेला थायरॉईड, रक्तदाब असे काही आजार असल्यास त्यावर उपचार करुन मग आई होण्याचा निर्णय घेणे बाळ आणि आईसाठी चांगले असते. अन्यथा बाळाला धोका होण्याचा संभव असतो. गर्भधारणेनंतर आहार आणि औषधोपचार योग्य होतो की नाही यावरही बरेचकाही अवलंबून असते. तसेच, बाळाच्या जन्मानंतर त्याला वेळच्या वेळेवर डॉक्टरांच्या निगरानीखाली औषधोपचार झाला पाहीजे. अनेकदा सरकारी रुग्णालयात बाळाला औषधांचा डोस दिल्यास पुरेसे असे अनेक पालक मानतात. मात्र, डॉक्टरांचा सल्ला घेणे उपयोगी असते. कारण या दरम्यान डॉक्टर बाळाची प्रकृती देखील तपासत असतो. डॉ. मीनाक्षी देशपांडे, स्त्री रोग तज्ञ तथा सह सचिव इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे