शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

मिरची बियाणे वेगळे करणे झाले सोपे !

By admin | Updated: January 5, 2015 23:14 IST

पीडीकेव्हीने केले मिरची निष्कासन तंत्रज्ञान विकसीत.

राजरत्न सिरसाट /अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने राज्यात पहिले मिरची निष्कासन यंत्र विकसीत केले आहे. या तंत्रज्ञानामुळे मिरची आणि बिया वेगळे करणे सोपे झाल्याने या तंत्रज्ञानाचा प्रसार झपाट्याने देशात होत आहे.पारंपरिक पध्दतीमध्ये वाळलेल्या मिरच्या पोत्यात भरू न काठीने बियाणे आणि मिरचीची सालं वेगळे करण्याची पध्दत होती. काठीच्या सहाय्याने पोत्यात बारीक केलेली मिरची हवेच्या झोतात किंवा पंख्याच्या सहाय्याने वेगळी केली जात असत. पारंपरिक पध्दतीने किंवा मजुरांकडून मिरची बियाणे वेगळे करणे त्रासदायक असल्याने दिवसाकाठी केवळ सात ते आठ किलो मळणी केली जायची. मिरची बियाणे कंपन्यांची मागणी बघता, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांच्या मार्गदर्शनात कापणी पश्‍चात तंत्रज्ञान विभागाने नवे मिरची निष्कासन यंत्र विकसीत केले आहे. या यंत्रामुळे एका तासाला १00 किलो मिरची आणि बियाणे वेगळे केले जात असून, प्रतिदिवस १0 ते १५ पोते बियाणे काढण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या यंत्रातून काढल्या जात असलेल्या बियाण्यांची उगवणशक्ती ९0 ते ९५ टक्के असल्याने, या यंत्राची मागणी वाढली आहे. एका खासगी कंपनीने कृषी विद्यापीठाचे हे यंत्र घेतले असून, राज्यात या यंत्राची मागणी तर वाढली आहेच, शिवाय दक्षिण भारतातील राज्यात या यंत्राचा प्रसार सुरू झाला आहे.या यंत्रामध्ये मिरची धूर बाहेर न पडणारे तंत्रज्ञान असल्याने दिवसभर या यंत्रावर मजूर काम करू शकतात. विजेवर चालणारे हे यंत्र मिरची पावडरही तयार करू शकते. या यंत्राची किमंत ७२ हजार रू पये असल्याने शेतकर्‍यांना जोड धंदा म्हणून त्याचा वापर करता येणार आहे.राज्यात पहिले मिरची निष्कासण यंत्र विकसीत केले आहे. याच फायदा शेतकर्‍यांनी घेण्याची गरज आहे. सद्या एका मोठय़ा खासगी कंपनीने हे यंत्र घेतली असून, महाराष्ट्रासह परप्रातांत या यंत्राचा प्रसार सुरू असल्याचे कापणी पश्‍चात तंत्रज्ञान विभागाचे डॉ. प्रदिप बोरकर यांनी सांगीतले. 

*मिरची पावडरसाठी उपयुक्तबिया वेगळे करणारे मिरची निष्काषण यंत्रातून मिरची पावडर तयार केली जात असून, छोट्या पिशव्यात पॅक करू न मिरची पॅकेट शेतकर्‍यांना विकता येतात हे विशेष.