शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

मिरची बियाणे वेगळे करणे झाले सोपे !

By admin | Updated: January 5, 2015 23:14 IST

पीडीकेव्हीने केले मिरची निष्कासन तंत्रज्ञान विकसीत.

राजरत्न सिरसाट /अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने राज्यात पहिले मिरची निष्कासन यंत्र विकसीत केले आहे. या तंत्रज्ञानामुळे मिरची आणि बिया वेगळे करणे सोपे झाल्याने या तंत्रज्ञानाचा प्रसार झपाट्याने देशात होत आहे.पारंपरिक पध्दतीमध्ये वाळलेल्या मिरच्या पोत्यात भरू न काठीने बियाणे आणि मिरचीची सालं वेगळे करण्याची पध्दत होती. काठीच्या सहाय्याने पोत्यात बारीक केलेली मिरची हवेच्या झोतात किंवा पंख्याच्या सहाय्याने वेगळी केली जात असत. पारंपरिक पध्दतीने किंवा मजुरांकडून मिरची बियाणे वेगळे करणे त्रासदायक असल्याने दिवसाकाठी केवळ सात ते आठ किलो मळणी केली जायची. मिरची बियाणे कंपन्यांची मागणी बघता, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांच्या मार्गदर्शनात कापणी पश्‍चात तंत्रज्ञान विभागाने नवे मिरची निष्कासन यंत्र विकसीत केले आहे. या यंत्रामुळे एका तासाला १00 किलो मिरची आणि बियाणे वेगळे केले जात असून, प्रतिदिवस १0 ते १५ पोते बियाणे काढण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या यंत्रातून काढल्या जात असलेल्या बियाण्यांची उगवणशक्ती ९0 ते ९५ टक्के असल्याने, या यंत्राची मागणी वाढली आहे. एका खासगी कंपनीने कृषी विद्यापीठाचे हे यंत्र घेतले असून, राज्यात या यंत्राची मागणी तर वाढली आहेच, शिवाय दक्षिण भारतातील राज्यात या यंत्राचा प्रसार सुरू झाला आहे.या यंत्रामध्ये मिरची धूर बाहेर न पडणारे तंत्रज्ञान असल्याने दिवसभर या यंत्रावर मजूर काम करू शकतात. विजेवर चालणारे हे यंत्र मिरची पावडरही तयार करू शकते. या यंत्राची किमंत ७२ हजार रू पये असल्याने शेतकर्‍यांना जोड धंदा म्हणून त्याचा वापर करता येणार आहे.राज्यात पहिले मिरची निष्कासण यंत्र विकसीत केले आहे. याच फायदा शेतकर्‍यांनी घेण्याची गरज आहे. सद्या एका मोठय़ा खासगी कंपनीने हे यंत्र घेतली असून, महाराष्ट्रासह परप्रातांत या यंत्राचा प्रसार सुरू असल्याचे कापणी पश्‍चात तंत्रज्ञान विभागाचे डॉ. प्रदिप बोरकर यांनी सांगीतले. 

*मिरची पावडरसाठी उपयुक्तबिया वेगळे करणारे मिरची निष्काषण यंत्रातून मिरची पावडर तयार केली जात असून, छोट्या पिशव्यात पॅक करू न मिरची पॅकेट शेतकर्‍यांना विकता येतात हे विशेष.