शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

ई-पंचायतमुळे ग्रामीण भागात बँक सुविधा!

By admin | Updated: June 15, 2014 00:37 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्या कारभारात एकसूत्रता व पारदर्शता यावी, यासाठी ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ई-पंचायत अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागात

जिल्हा परिषद : सीएससी सेंटरच्या माध्यमातून गावात २७ सुविधानागपूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्या कारभारात एकसूत्रता व पारदर्शता यावी, यासाठी ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ई-पंचायत अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागात बँक व अन्य सुविधा उपलब्ध झाली आहे.बँकांच्या शाखा नसल्याने ग्रामीण भागातील लोकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. परंतु आता जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) सुरू करण्यात आले आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून वित्तीय समावेशन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यात शून्य रकमेवर विविध राष्ट्रीयीकृत बँकांचे खाते उघडणे शक्य झाले आहे. आर्थिक व्यवहारासोबतच मनरेगावरील मजुरांच्या खात्यात मजुरीची रक्कम जमा केली जाते. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १४ गावात ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. ई-पंचायतच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायतींना इंटरनेटशी जोडण्यात आले आहे. ग्रामस्तरावर २७ प्रकारचे दाखले व अर्जाचे नमुने उपलब्ध होत आहे. सीएससी केंद्र जिल्हा परिषदेतील संग्रामसोबत जोडण्यात आले आहे. केंद्रात शासनाच्या विविध योजनांसोबतच गावातील नागरिकांची माहिती संग्रहित क ेली आहे. सीएससी केंद्राच्या माध्यमातून आॅनलाईन शॉपिंग, रेल्वे आरक्षण, मोबाईल रिचार्ज, मोबाईल पेमेंट, विविध स्वरूपाचा विमा, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन योजनेचा लाभ, आॅनलाईन प्रशिक्षण, आधार कार्ड अशा स्वरूपांच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. याचा लाभ ग्रामीण भागातील लोकांना मिळणार आहे. केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना लवकरच ई-न्यायालय, बाजारभावाची माहिती, परीक्षांचे निकाल, हवामान, पेन्शन योजना,विमा योजनांची माहिती उपलब्ध के ली जाणार आहे.ग्रामीण भागातील लोकांनी ई-पंचायत अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे व उप मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव भांडारकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)