शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

वर्षभरात २ लाख वेळा खणखणला १०८

By admin | Updated: January 5, 2015 05:06 IST

शहर, अपघातग्रस्तांना गोल्डन अवर (एका तासाच्या आत) उपचार मिळणे गरजेचे असते. पण, रुग्णवाहिका बोलवण्यासाठी कुठे कॉल करायचा हे अनेकदा माहीत नसते

पूजा दामले, मुंबईशहर, अपघातग्रस्तांना गोल्डन अवर (एका तासाच्या आत) उपचार मिळणे गरजेचे असते. पण, रुग्णवाहिका बोलवण्यासाठी कुठे कॉल करायचा हे अनेकदा माहीत नसते, रुग्णवाहिका घटनास्थळी वेळेत पोहोचत नाही, अशामुळे अनेकदा अपघातग्रस्तांची प्रकृती गंभीर होते. हे टाळण्यासाठी २६ जानेवारी २०१४ रोजी महाराष्ट्र आणीबाणी वैद्यकीय सेवा (एमईएमएस) अर्थातच १०८ क्रमांक रुग्णवाहिकेसाठी सुरू करण्यात आला. वर्षभरात १०८ क्रमांकावर राज्यभरातून एकूण २ लाख ७ हजार २३ कॉल्स आल्याची माहिती एमईएमएसचे मुख्य संचालक अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी दिली. अपघातग्रस्तांना एका तासाच्या आत योग्य ते उपचार मिळाल्यास त्यांच्या प्रकृतीत चांगल्या प्रकारे सुधारणा होऊ शकते. पण, वर्षभरापूर्वीपर्यंत रुग्णवाहिकेसाठी कोणताही एकच क्रमांक नसल्यामुळे अनेकदा अपघात स्थळी रुग्णवाहिका वेळेवर पोहोचत नसे. पण, १०८ या क्रमांकावर कॉल गेल्यास १० ते ३० मिनिटांच्या कालावधीत रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचते. यामुळे अनेक अपघातग्रस्तांना याचा फायदा झाला आहे. २ लाख ७ हजार २३ कॉल्सपैकी १४ हजार ९७८ कॉल्स हे मुंबईतून आलेले आहेत, अशी माहिती शेळके यांनी दिली.वैद्यकीय गरज असताना सर्वाधिक म्हणजे एकूण १० हजार २६ कॉल्स मुंबईतून आले आहेत. तर त्याच्या खालोखाल १ हजार ८४९ कॉल्स हे गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी रुग्णालयात नेण्यासाठी आले आहेत. ही सेवा फक्त अपघातग्रस्त व्यक्तींना रुग्णालयात नेण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. परंतु, तरीही प्रसूतीसाठी महिलांना रुग्णालयात नेण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर या क्रमांकाचा वापर केला जातो. (प्रतिनिधी)