शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

डेंग्यूला साथ म्हणून घोषीत करता येणार नाही - राज्य सरकार

By admin | Updated: November 21, 2014 10:32 IST

राज्यभरात डेंग्यूचा फैलाव होत असला तरी तो संसर्गजन्य नसल्याने साथीचा रोग म्हणून जाहीर करता येणार नाही असे अजब स्पष्टीकरण राज्य सरकारने दिले आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २१ - राज्यभरात डेंग्यूचा फैलाव होत असला तरी याला रोखण्यासाठी जनतेकडूनच अपेक्षीत साथ मिळत नसल्याचे राज्य सरकारने हायकोर्टात सांगितले आहे. डेंग्यू हा संसर्गजन्य नसल्याने राज्यात तो साथीचा रोग म्हणून जाहीर करता येणार नाही असे अजब स्पष्टीकरणही राज्य सरकारने दिले आहे. 
राज्यभरात डेंग्यूमुळे मृत्यू पावणा-या रुग्णांची संख्या दिवसेगणिक वाढत असून यासंदर्भात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे. यामध्ये राज्य सरकार आणि अन्य सरकारी यंत्रणांना डेंग्यू व मलेरियासारखे आजार रोखण्यासाठी  निर्देश द्यावेत अशी मागणी याचिकाकर्ते विष्णू गवळी यांनी केली होती. या याचिकेवर गुरुवारी हायकोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीत राज्य सरकारने डेंग्यू रोखण्यासाठी जनतेकडूनच साथ मिळत नसल्याचे हायकोर्टासमोर सांगितले. 'लोकं औषधोपचारांचा कोर्स पूर्ण करत नाही,  ३ - ४ दिवस ताप राहिल्यास डॉक्टर रक्त तपासणी करायला सांगतात. अनेकजण साधारणतः १ ते २ दिवसातच औषध घेण बंद करतात व मग प्रकृती खालावल्यावरच पुन्हा डॉक्टरांकडे फिरकतात, त्यामुळे आजाराचे निदान होण्यास विलंब होतो असे सरकारी वकिलांनी हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. 
राज्य सरकारची बाजू ऐकून घेतल्यावर मुख्य न्यायाधीश मोहीत शहा आणि न्या. बी.पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठाने जनतेनेही परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे मत मांडले. हायकोर्टाने राज्य सरकारला आजार रोखण्यासाठी काय केले व जनजागृतीसाठी काय प्रयत्न केले जात आहेत याची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.