शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
3
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
7
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
8
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
9
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
10
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
11
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
12
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
13
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
14
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
15
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
16
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
18
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
19
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
20
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री

डेंग्यूला साथ म्हणून घोषीत करता येणार नाही - राज्य सरकार

By admin | Updated: November 21, 2014 10:32 IST

राज्यभरात डेंग्यूचा फैलाव होत असला तरी तो संसर्गजन्य नसल्याने साथीचा रोग म्हणून जाहीर करता येणार नाही असे अजब स्पष्टीकरण राज्य सरकारने दिले आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २१ - राज्यभरात डेंग्यूचा फैलाव होत असला तरी याला रोखण्यासाठी जनतेकडूनच अपेक्षीत साथ मिळत नसल्याचे राज्य सरकारने हायकोर्टात सांगितले आहे. डेंग्यू हा संसर्गजन्य नसल्याने राज्यात तो साथीचा रोग म्हणून जाहीर करता येणार नाही असे अजब स्पष्टीकरणही राज्य सरकारने दिले आहे. 
राज्यभरात डेंग्यूमुळे मृत्यू पावणा-या रुग्णांची संख्या दिवसेगणिक वाढत असून यासंदर्भात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे. यामध्ये राज्य सरकार आणि अन्य सरकारी यंत्रणांना डेंग्यू व मलेरियासारखे आजार रोखण्यासाठी  निर्देश द्यावेत अशी मागणी याचिकाकर्ते विष्णू गवळी यांनी केली होती. या याचिकेवर गुरुवारी हायकोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीत राज्य सरकारने डेंग्यू रोखण्यासाठी जनतेकडूनच साथ मिळत नसल्याचे हायकोर्टासमोर सांगितले. 'लोकं औषधोपचारांचा कोर्स पूर्ण करत नाही,  ३ - ४ दिवस ताप राहिल्यास डॉक्टर रक्त तपासणी करायला सांगतात. अनेकजण साधारणतः १ ते २ दिवसातच औषध घेण बंद करतात व मग प्रकृती खालावल्यावरच पुन्हा डॉक्टरांकडे फिरकतात, त्यामुळे आजाराचे निदान होण्यास विलंब होतो असे सरकारी वकिलांनी हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. 
राज्य सरकारची बाजू ऐकून घेतल्यावर मुख्य न्यायाधीश मोहीत शहा आणि न्या. बी.पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठाने जनतेनेही परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे मत मांडले. हायकोर्टाने राज्य सरकारला आजार रोखण्यासाठी काय केले व जनजागृतीसाठी काय प्रयत्न केले जात आहेत याची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.