शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

डम्पिंगचे आगसत्र सुरू

By admin | Updated: March 7, 2017 03:32 IST

उन्हाळ्याला प्रारंभ होताच येथील आधारवाडी डम्पिंगला आग लागण्यास सुरुवात झाली

कल्याण : उन्हाळ्याला प्रारंभ होताच येथील आधारवाडी डम्पिंगला आग लागण्यास सुरुवात झाली आहे. दुर्गाडी खाडीलगतच्या डम्पिंगच्या मागील बाजूस सोमवारी दुपारी लागलेल्या आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात धुरांचे लोट पसरले होते. अग्निशमन दलाच्या तीन बंबांनी आगीवर सायंकाळी उशिरा नियंत्रण मिळवले. दरम्यान, यासंदर्भात स्थानिक नगरसेवक व भाजपाचे गटनेते वरुण पाटील यांनी वारंवार लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नुकताच पत्रव्यवहार केला होता. परंतु, वास्तव पाहता त्यांच्याही पत्राला वाटाण्याच्या अक्षता केडीएमसी प्रशासनाने लावल्याचे पाहावयास मिळत आहे.पश्चिमेतील आधारवाडी डम्पिंगवर प्रतिदिन ६५० टन कचरा टाकला जातो. या डम्पिंगची क्षमता संपुष्टात आल्यानंतरही तेथे कचरा टाकणे सुरूच आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षेमुळे एकीकडे ओव्हरफ्लो होत असलेल्या या डम्पिंगच्या दुर्गंधीमुळे परिसरातील रहिवासी हैराण झाले असताना त्यातच उन्हाळ्यात कचरा पेटण्याचे सत्रही सुरूच असल्याचे पुन्हा सोमवारी समोर आले आहे. मागील वर्षी जानेवारीपासून आगी लागण्याचे सत्र सुरू झाले होते. ते मे महिन्यापर्यंत कायम होते. मोठ्या प्रमाणावर वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आगीचा धूर वाऱ्याच्या प्रवाहाबरोबरच सभोवतालच्या परिसरात पसरतो आणि तेथील रहिवाशांना श्वास गुदमरणे, खोकला येणे, मळमळणे आदी त्रासाला सामोरे जावे लागते. आगीचे प्रमाण अधिक असेल, तर धुराचे लोट आधारवाडी परिसराबरोबरच नजीकच्या वाडेघर, खडकपाडा, लालचौकी, शिवाजी चौक, गौरीपाडा, पौर्णिमा चौकीपर्यंत पसरत जातात.दरम्यान, उन्हाळ्यात कचऱ्याला आगी लागण्याच्या घटना वारंवार घडतात. उन्हात कचरा तापतो. त्यात कचऱ्यामुळे निर्माण होणारा मिथेन वायू पेट घेतो. यामुळे आगी लागण्याच्या घटना घडतात. यावर उपाय म्हणून पाण्याच्या पाइपलाइन डम्पिंगमध्ये टाक ल्या जाणार आहेत. याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून वारंवार सांगितले जाते. आजवर यासंदर्भात ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे उन्हाळ्यात आगी लागण्याचे सत्र सुरूच राहण्याची दाट शक्यता आहे. (प्रतिनिधी)>यापूर्वीच्या घटना मागील वर्षी २, ११, ३१ जानेवारी, २१ मार्च आणि २८ मार्चला डम्पिंगला ागी लागल्याच्या घटना घडल्या होत्या. यानंतर ३१ मे ला लागलेली आग सलग तीन दिवस धुमसत होती.यापूर्वी २०१० मध्ये डम्पिंगला मोठी आग लागली होती. ३१ मे च्या आगीच्या घटनेच्यावेळी वाढती आग आणि धूर पाहता डम्पिंगला लागून असलेल्या साठेनगर वसाहतीतील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते. यात तीन कचरावेचकही किरकोळ जखमी झाले होते.या वाढत्या घटना पाहता डम्पिंगवर मातीचा भराव टाकून आगीच्या घटनांवर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी महापौर राजेंद्र देवळेकर आणि आयुक्त ई. रवींद्रन यांनी डम्पिंगची पाहणी केली होती. साठेनगरमधील रहिवाशांचीही त्यांनी संवाद साधला होता. डम्पिंग बंद होण्यासाठी लागणारा दीड वर्षे लागणार असल्याने बायोगॅस प्रकल्पाद्वारे कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचा दावा देवळेकर यांनी केला होता. परंतु, त्याचीही ठोस कार्यवाही झालेली नाही.