शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

वर्ध्यात पाणी आटवून केली कोजागिरी

By admin | Updated: October 15, 2016 16:34 IST

शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाल्याचा आरोप करीत वर्ध्यात शेती उत्पादक आंदोलन समितीने पाणी आटवून कोजागिरी साजरी केली.

ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. १५ -  कोजागिरीला सायंकाळी दूध आटवून ते ग्रहण करण्याची प्रथा आहे. शेडनेट पॉलीहाऊस संदर्भात शासनाच्यावतीने राबविण्यात आलेल्या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाल्याचा आरोप करीत वर्धेत शेडनेट, पॉलीहाऊस शेती उत्पादक आंदोलन समितीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दूधाऐवजी पाणी आटवून कोजागिरी साजरी करीत शासनाचे लक्ष वेधले. 
शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे जिल्ह्यातीलच नाही तर विदर्भातील शेडनेट, पॉलीहाऊस शेती उत्पादक चांगलेच आर्थिक कोंडीत सापडले आहे. या प्रकल्पाकरिता घेतलेले कर्ज कसे फेडावे असा प्रश्न त्यांना पडला आहे. शासनाने भरघोस उत्पन्न घेण्याकरिता ही योजना कार्यान्वित केल्याचे म्हणत शेतकºयांना आकर्षित केले. यात शेतकरीही आकर्षित झाला. मात्र शेडनेट, पॉलीहाऊस प्रकल्प विदर्भातील वातवारणाला साथ देण्यात अपयशी ठरले. परिणामी या प्रकल्पातून मोठे उत्पादन घेण्याची आशा बाळगणारे शेतकरी कर्जबाजारी झाले. त्यांना शासनाच्यावतीने कोणतीही मदत देण्याचे नियोजन नसल्याने त्यांची अडचण झाली आहे. 
या संदर्भात जिल्ह्यातील अशा उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येत शेडनेट, पॉलीहाऊस शेती उत्पादक आंदोलन समिती तयार केली. या समितीच्या माध्यमातून त्यांनी मदतीची मागणी राज्याच्या कृषी विभागाकडे केली आहे. तसे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. मात्र त्यांना मदत मिळण्याचे कुठलेही संकेत नाही. परिणामी त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविण्याकरिता आज याच समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाणी आटवून कोजागिरी साजरी केली. यावेळी त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या सुपूर्द केले. 
यावेळी किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे, शेडनेट पॉलीहाऊस आंदोलन समितीचे सचिन शेंंडे, विठ्ठल बानोडे, त्र्यंबक माहुरे, गोपाळ वंघळ, राजेश थोरात यांच्याह शेतकरी व त्यांच्या परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती. 
सन २००९ पासून योजना कार्यान्वीत 
शासनाच्या आदेशानुसार सन २००९ पासून योजना राबविण्याचा निर्णय झाला. यात जिल्ह्याच्या कृषी विभागाच्यावतीने शेतकºयांना आमिष देत बँकांचे कर्ज उपलब्ध करून दिले.  विदर्भातील वातवारणात शेडनेट, पॉलीहाऊस योजना कुचकी ठरली. परिणामी शेतकरी कर्जबाजारी झाले. आता हे कर्ज कसे फेडावे अशी चिंता त्यांना पडली आहे. यामुळे त्यांच्याकडून मदतीची मागणी होत आहे. मात्र शासन त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.