शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

सामाजिक बांधिलकीमुळेच पत्रकारिता टिकून

By admin | Updated: January 17, 2017 05:59 IST

पत्रकारितेने समाजाला नेहमी दिशा देण्याचे काम केले आहे

बीड : पत्रकारितेने समाजाला नेहमी दिशा देण्याचे काम केले आहे. वृत्तपत्रांचे अर्थशास्त्र अवघड आहे. मात्र, केवळ सामाजिक बांधिलकीमुळे पत्रकारिता टिकून आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांना स. मा. गर्गे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. सन्मानचिन्ह व १ लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री पंकजा मुंडे होत्या. तसेच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. रजनी पाटील, आ. जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, आदींची या वेळी उपस्थिती होती.अग्रलेख हा वृत्तपत्राचा आत्मा आहे; मात्र काही दैनिकांत त्याचा अभाव अशी खंत व्यक्त करीत राजकीय प्रवासात वर्तमानपत्रे कशी दिशादर्शक ठरली, याचे अनेक दाखले पवार यांनी दिले. ‘वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना एका वृत्तपत्राने ‘हे राज्य पडावे, ही श्रींची इच्छा’ अशा मथळ्याखाली अग्रलेख लिहिला. त्यानंतर मी काही सहकाऱ्यांसोबत ‘उद्योग’ केला अन् राज्य बदलले. त्यानंतर ‘वेडात दौडले वीर मराठे आठ’ अशा मथळ्याखाली अग्रलेख छापून आला. वृत्तपत्रांचे अर्थशास्त्र मला अजून कळले नाही. मात्र, केवळ विचार देण्याची भूमिका व सामाजिक बांधिलकी यामुळेच ही वृत्तपत्रसृष्टी टिकून आहे,’ असेही पवार पुढे म्हणाले. ‘वृत्तपत्रांद्वारे ज्ञानात भर पडते. मी विरोधी पक्षात असताना माझ्या भावना वृत्तपत्रांतून जशाच्या तशा उमटत होत्या. आता मात्र लेखणी व कॅमेऱ्याचा धाक वाटतो. आपले प्रतिबिंब आपल्याला ओळखू येत नाही. मात्र, वृत्तपत्रांतून ते प्रकट होते. या क्षेत्रात प्रगल्भ मंडळींची गरज आहे,’ असे पंकजा मुंडे या वेळी म्हणाल्या. (प्रतिनिधी)