शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
5
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
6
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
7
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
8
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
9
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
10
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
11
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
12
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
13
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
14
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
15
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
16
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
17
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
18
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
19
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
20
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान

शिवसेनेच्या टीकेमुळे कोंडी

By admin | Updated: October 5, 2014 02:13 IST

महाराष्ट्राच्या निवडणूक दौ:यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीबाबत काय घोषणा करतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे.

मोरेश्वर बडगे - नागपूर
महाराष्ट्राच्या निवडणूक दौ:यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या    मागणीबाबत काय घोषणा करतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. भाजप महाराष्ट्राचे तुकडे करायला निघाल्याचे सांगून, शिवसेनेने या निवडणुकीला नाजुक वळण दिल्याने हा विषय  कमालीचा संवेदनशील झाला आहे. पण विदर्भवाद्यांचा दबाव पाहता मोदी काय बोलतात, याबद्दल उत्सुकता आहे. 
शिवसेनेसोबतची 25 वर्षे जुनी युती तुटल्यानंतर विदर्भ राज्य मिळण्याच्या आशा उंचावल्या आहेत. भाजपा लहान राज्यांचा समर्थक आहे आणि विदर्भ राज्य निर्मितीबद्दलची आपली कटिबद्धता भाजपा नेत्यांनी वेळोवेळी जाहीरपणो बोलून दाखवली आहे. महाराष्ट्राचे तुकडे करून विदर्भ राज्य देण्याला शिवसेनेचा विरोध आहे. शिवसेनेचा विरोध असल्यामुळे विदर्भ राज्य देण्यात अडथळा असल्याचे भाजपाकडून सांगण्यात येत होते. 2क्क्क् साली अटलबिहारी वाजपेयी सरकारने छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड ही तीन नवी राज्ये दिली तेव्हाही  भाजपाने सेनेचीच अडचण पुढे केली होती. पण आता शिवसेनेचा अडथळा दूर झाल्याने भाजपा या विधानसभा निवडणुकीत  ‘विदर्भ राज्या’चे कार्ड खेळू शकते, असा राजकीय समीक्षकांचा अंदाज आहे.  
विदर्भात विधानसभेच्या तब्बल 62 जागा आहेत़ विदर्भ राज्य हा निवडणूक इश्यू करून विदर्भ लाटेवर स्वार होण्याचा आग्रह भाजपामधील विदर्भवाद्यांनी लावून धरला आहे. पण ही मागणी पश्चिम महाराष्ट्र व इतर भागात बूमरँगही होऊ शकते, असा भाजपामधूनच काहींचा सावधगिरीचा इशारा आहे. 1995 च्या निवडणुकीत भाजपावाल्यांनी विदर्भ राज्याच्या इश्यूवर मते मागितली होती आणि लोकांनी भाजपाला उचलूनही धरले होते. पण  नंतर भाजपाने हा विषय सोडून दिला. सेनेची सोबत सोडल्यानंतरही भाजपाचे नेते स्पष्टपणो विदर्भ राज्याविषयी बोलायला तयार नाहीत. भाजपचा एक ज्येष्ठ नेता आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर म्हणाला, भाजपा फार आधीपासून विदर्भ राज्याचा समर्थक आहे. 2क् वर्षापूर्वी भुवनेश्वर येथे झालेल्या  भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत विदर्भ राज्य निर्माण करण्याचा ठराव संमत झाला होता.  येत्या दोन दिवसात आमचा जाहीरनामा निघेल. तोर्पयत वाट पाहा. 
भाजपाचा प्रत्येक नेता हीच भाषा बोलतो. काँग्रेसनेही प्रथमच स्पष्ट भूमिका घेताना महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिकाही विदर्भ राज्याच्या विरोधात आहे. राज ठाकरे यांची मनसेही नव्या विदर्भ राज्याच्या बाजूने नाही. त्यामुळे विदर्भ राज्याला अनुकूल असा एकच प्रमुख पक्ष म्हणजे भाजप उरला आहे. तोही गप्प असल्याने निवडणुकीच्या रणधुमाळीत विदर्भ राज्य हा इश्यूच बेपत्ता असल्यासारखा आहे.  
 
विदर्भातील वेगवेगळ्या शहरातील स्वतंत्र जनसंघटनांनी मागे जनमत संग्रह घेतला होता.  अमरावती शहरात 85 टक्के, नागपूर शहरात 95  टक्के, चंद्रपूर आणि यवतमाळ शहरात प्रत्येकी 97 टक्के लोकांनी विदर्भ राज्य व्हावे या बाजूने मते टाकली. विदर्भात असलेल्या या तीव्र जनभावनेचा फायदा कुठला राजकीय पक्ष का उठवत नाही, हा संशोधनाचा विषय आहे.