शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

पावसाच्या वक्रदृष्टीमुळे धरणे आटली!

By admin | Updated: August 3, 2015 02:01 IST

जूनच्या मध्यानंतर महाराष्ट्रावर पावसाने वक्रदृष्टी केल्याने एकीकडे खरीप हंगाम वाया जाण्याची स्थिती असताना अपुऱ्या पावसामुळे राज्यातील

पुणे : जूनच्या मध्यानंतर महाराष्ट्रावर पावसाने वक्रदृष्टी केल्याने एकीकडे खरीप हंगाम वाया जाण्याची स्थिती असताना अपुऱ्या पावसामुळे राज्यातील धरणेही आटली आहेत. दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाड्यात सर्वाधिक भीषण परिस्थिती असून, ८१४ प्रकल्पांत केवळ ७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.मान्सूनच्या आगमनानंतर जून आणि जुलै महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद होते. मात्र दीड महिन्यापेक्षाही अधिक काळ पावसाने उघडीप दिल्याने राज्यातील २ हजार ५२६ धरणांमध्ये केवळ ३८ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेल्या तीन वर्षांतील हा नीचांक आहे. त्यातच आॅगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मंदावत जाणाऱ्या पावसामुळे ही टक्केवारी वाढेल की नाही, याबाबत शंका आहे.कोकणातील १५८ प्रकल्पांची स्थिती तुलनेने बरी असून, ६९ टक्के जलसाठा झाला आहे. विभागानुसार मराठवाड्यातील ८१४ प्रकल्पांत ७ टक्के, नागपूरच्या ३६६ प्रकल्पांत ३६ तर अमरावतीच्या ४५३ धरणांमध्ये ३२ टक्के पाणी आहे. नाशिकमधील ३५० प्रकल्प ३८ आणि पुणे विभागातील ३६९ धरणे ४५ टक्क्क्यांपर्यंतच भरली आहेत.राज्यातील मोठ्या, मध्यम व लघू अशा २ हजार ५२६ धरणांमध्ये ३७ हजार ५०७ दशलक्ष घनमीटर प्रकल्पीय साठा झाला असून, त्यापैकी केवळ १४ हजार ३१२ दशलक्ष घनमीटर साठा उपयुक्त, म्हणजे पिण्याचे पाणी व शेतीसाठी वापरण्याजोगा आहे. राज्यातील २,५२६ धरणांमध्ये गेल्या वर्षी २ आॅगस्टच्या सुमारास १८ हजार ४०२ द.ल.घ.मी. म्हणजे ४९ टक्के तर २०१३मध्ये ६७ टक्के म्हणजे २५ हजार ३४ द.ल.घ.मी. उपयुक्त साठा होता. गेल्या वर्षाशी तुलना करता यंदा ११ टक्के व २०१३च्या तुलनेत २९ टक्के कमी साठा आहे.कोकण, मराठवाडा, नागपूर, अमरावती, नाशिक व पुणे विभागातील मोठ्या धरणांची संख्या ८४ असून, त्यात ७,७७३ द.ल.घ.मी, २२२ मध्यम प्रकल्पांमध्ये १,५९१ द.ल.घ.मी तर २,२०४ लघू प्रकल्पांमध्ये १,१७२ द.ल.घ.मी. साठा आहे. (प्रतिनिधी)