शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

पावसाच्या वक्रदृष्टीमुळे धरणे आटली!

By admin | Updated: August 3, 2015 02:01 IST

जूनच्या मध्यानंतर महाराष्ट्रावर पावसाने वक्रदृष्टी केल्याने एकीकडे खरीप हंगाम वाया जाण्याची स्थिती असताना अपुऱ्या पावसामुळे राज्यातील

पुणे : जूनच्या मध्यानंतर महाराष्ट्रावर पावसाने वक्रदृष्टी केल्याने एकीकडे खरीप हंगाम वाया जाण्याची स्थिती असताना अपुऱ्या पावसामुळे राज्यातील धरणेही आटली आहेत. दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाड्यात सर्वाधिक भीषण परिस्थिती असून, ८१४ प्रकल्पांत केवळ ७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.मान्सूनच्या आगमनानंतर जून आणि जुलै महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद होते. मात्र दीड महिन्यापेक्षाही अधिक काळ पावसाने उघडीप दिल्याने राज्यातील २ हजार ५२६ धरणांमध्ये केवळ ३८ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेल्या तीन वर्षांतील हा नीचांक आहे. त्यातच आॅगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मंदावत जाणाऱ्या पावसामुळे ही टक्केवारी वाढेल की नाही, याबाबत शंका आहे.कोकणातील १५८ प्रकल्पांची स्थिती तुलनेने बरी असून, ६९ टक्के जलसाठा झाला आहे. विभागानुसार मराठवाड्यातील ८१४ प्रकल्पांत ७ टक्के, नागपूरच्या ३६६ प्रकल्पांत ३६ तर अमरावतीच्या ४५३ धरणांमध्ये ३२ टक्के पाणी आहे. नाशिकमधील ३५० प्रकल्प ३८ आणि पुणे विभागातील ३६९ धरणे ४५ टक्क्क्यांपर्यंतच भरली आहेत.राज्यातील मोठ्या, मध्यम व लघू अशा २ हजार ५२६ धरणांमध्ये ३७ हजार ५०७ दशलक्ष घनमीटर प्रकल्पीय साठा झाला असून, त्यापैकी केवळ १४ हजार ३१२ दशलक्ष घनमीटर साठा उपयुक्त, म्हणजे पिण्याचे पाणी व शेतीसाठी वापरण्याजोगा आहे. राज्यातील २,५२६ धरणांमध्ये गेल्या वर्षी २ आॅगस्टच्या सुमारास १८ हजार ४०२ द.ल.घ.मी. म्हणजे ४९ टक्के तर २०१३मध्ये ६७ टक्के म्हणजे २५ हजार ३४ द.ल.घ.मी. उपयुक्त साठा होता. गेल्या वर्षाशी तुलना करता यंदा ११ टक्के व २०१३च्या तुलनेत २९ टक्के कमी साठा आहे.कोकण, मराठवाडा, नागपूर, अमरावती, नाशिक व पुणे विभागातील मोठ्या धरणांची संख्या ८४ असून, त्यात ७,७७३ द.ल.घ.मी, २२२ मध्यम प्रकल्पांमध्ये १,५९१ द.ल.घ.मी तर २,२०४ लघू प्रकल्पांमध्ये १,१७२ द.ल.घ.मी. साठा आहे. (प्रतिनिधी)