शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या वक्रदृष्टीमुळे धरणे आटली!

By admin | Updated: August 3, 2015 02:01 IST

जूनच्या मध्यानंतर महाराष्ट्रावर पावसाने वक्रदृष्टी केल्याने एकीकडे खरीप हंगाम वाया जाण्याची स्थिती असताना अपुऱ्या पावसामुळे राज्यातील

पुणे : जूनच्या मध्यानंतर महाराष्ट्रावर पावसाने वक्रदृष्टी केल्याने एकीकडे खरीप हंगाम वाया जाण्याची स्थिती असताना अपुऱ्या पावसामुळे राज्यातील धरणेही आटली आहेत. दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाड्यात सर्वाधिक भीषण परिस्थिती असून, ८१४ प्रकल्पांत केवळ ७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.मान्सूनच्या आगमनानंतर जून आणि जुलै महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद होते. मात्र दीड महिन्यापेक्षाही अधिक काळ पावसाने उघडीप दिल्याने राज्यातील २ हजार ५२६ धरणांमध्ये केवळ ३८ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेल्या तीन वर्षांतील हा नीचांक आहे. त्यातच आॅगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मंदावत जाणाऱ्या पावसामुळे ही टक्केवारी वाढेल की नाही, याबाबत शंका आहे.कोकणातील १५८ प्रकल्पांची स्थिती तुलनेने बरी असून, ६९ टक्के जलसाठा झाला आहे. विभागानुसार मराठवाड्यातील ८१४ प्रकल्पांत ७ टक्के, नागपूरच्या ३६६ प्रकल्पांत ३६ तर अमरावतीच्या ४५३ धरणांमध्ये ३२ टक्के पाणी आहे. नाशिकमधील ३५० प्रकल्प ३८ आणि पुणे विभागातील ३६९ धरणे ४५ टक्क्क्यांपर्यंतच भरली आहेत.राज्यातील मोठ्या, मध्यम व लघू अशा २ हजार ५२६ धरणांमध्ये ३७ हजार ५०७ दशलक्ष घनमीटर प्रकल्पीय साठा झाला असून, त्यापैकी केवळ १४ हजार ३१२ दशलक्ष घनमीटर साठा उपयुक्त, म्हणजे पिण्याचे पाणी व शेतीसाठी वापरण्याजोगा आहे. राज्यातील २,५२६ धरणांमध्ये गेल्या वर्षी २ आॅगस्टच्या सुमारास १८ हजार ४०२ द.ल.घ.मी. म्हणजे ४९ टक्के तर २०१३मध्ये ६७ टक्के म्हणजे २५ हजार ३४ द.ल.घ.मी. उपयुक्त साठा होता. गेल्या वर्षाशी तुलना करता यंदा ११ टक्के व २०१३च्या तुलनेत २९ टक्के कमी साठा आहे.कोकण, मराठवाडा, नागपूर, अमरावती, नाशिक व पुणे विभागातील मोठ्या धरणांची संख्या ८४ असून, त्यात ७,७७३ द.ल.घ.मी, २२२ मध्यम प्रकल्पांमध्ये १,५९१ द.ल.घ.मी तर २,२०४ लघू प्रकल्पांमध्ये १,१७२ द.ल.घ.मी. साठा आहे. (प्रतिनिधी)