शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वामित्व’ संपल्याने दुर्मीळ ग्रंथांची लयलूट!

By admin | Updated: January 18, 2015 01:09 IST

मरणोपरांत साठी ओलांडलेल्या लेखकांची पुस्तके ‘स्वामित्व हक्क’ कायद्यातून सुटल्याने आता कमी किमतीत उपलब्ध होऊ लागली आहेत.

नरेंद्र रानडे ल्ल सांगली मरणोपरांत साठी ओलांडलेल्या लेखकांची पुस्तके ‘स्वामित्व हक्क’ कायद्यातून सुटल्याने आता कमी किमतीत उपलब्ध होऊ लागली आहेत. मागील काही महिन्यांपासून मराठी पुस्तक विश्वात सुरू असलेल्या ‘किंमत युद्धा’मागे हेच कारण आहे. मात्र हे युद्ध वाचकांसाठी पर्वणीच ठरत आहे.ज्या लेखकांच्या निधनाला साठ वर्षे होऊन गेली आहेत, त्यांची पुस्तके ‘स्वामित्व हक्का’च्या (कॉपीराईट) कायद्याच्या कक्षेत येत नसल्याने ती छापण्याची मुभा कोणत्याही प्रकाशकास मिळाली आहे. त्यामुळेच नामवंत लेखकांच्या साहित्यकृतींच्या किमतीवरून चढाओढ सुरू झाली असून, सध्या साने गुरुजी, ना.सी. फडके, लक्ष्मीबाई टिळक, ह.ना. आपटे, लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर आदी लेखकांच्या पुस्तक विक्रीमध्ये हे युद्ध पाहायला मिळते.‘किंमत युद्ध’ नसतानाही साहित्य संमेलनांतील ग्रंथ प्रदर्शनात पुस्तक विक्रीने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत. त्यात सामान्यांना न परवडणाऱ्या ‘बेस्ट सेलर्स’चा वाटा मोठा होता. हल्ली साहित्य संमेलनांशिवायही भरणाऱ्या विविध ग्रंथ प्रदर्शनांतून पुस्तके सहजपणे वाचकांच्या हाती जाऊ लागली आहेत. ‘किंमत युद्धा’मुळे साहित्य संमेलनांतील प्रदर्शनात आणि अशा ग्रंथ प्रदर्शनांत कमी किमतीत मिळणाऱ्या पुस्तकांची विक्री मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येत आहे.एकाच लेखकाचे पुस्तक सध्या विविध प्रकाशकांमार्फत विक्रीस उपलब्ध आहे.एका लेखकाचे एखादे पुस्तक जर ५० रुपयांत विक्रीस उपलब्ध असेल, तर तेच पुस्तक दुसऱ्या प्रकाशकातर्फे २०० ते २५० रुपये या किमतीतही उपलब्ध आहे. साने गुरुजी, ना.सी. फडके, लक्ष्मीबाई टिळक, ह.ना. आपटे, लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर या नामवंतांची पुस्तके कमी किमतीत उपलब्ध झाली आहेत. ‘किंमत युद्धा’मुळे अडीचशे ते चारशे पानांची पुस्तकेही ३० ते ५० रुपयांत उपलब्ध आहेत.पुस्तक विश्वात स्पर्धा नकोपुस्तक विश्वात सुरू असलेले ‘किंमत युद्ध’ योग्य नाही. थोर लेखकांच्या पुस्तकांच्या छपाईचा दर्जा चांगलाच असला पाहिजे. अक्षराचा आकार, कागदाचा प्रकार, पुस्तक बांधणी यावर प्रकाशकाने लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. जेणेकरून ती काही वर्षांनी खराब न होता वर्षानुवर्षे वाचकांच्या घरात राहतील. टिकाऊपणाच्या मुद्द्यावर कोणती पुस्तके किती किंमत देऊन विकत घ्यायची, याचा निर्णय वाचकांनीच घ्यावा.- सुनील मेहता, पुस्तक प्रकाशक, पुणे ‘किंमत युद्ध’ आवश्यकपुस्तक विश्वात सुरू असलेले ‘किंमत युद्ध’ गरजेचे आहे. या प्रकारामुळे वाचकांना एकाच लेखकाचे अनेक प्रकाशकांनी छापलेले कोणते पुस्तक निवडायचे याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्याच्या खिशाला परवडेल त्या किमतीत उपलब्ध असणारे पुस्तक विकत घेण्याचा पर्याय ‘किंमत युद्धा’मुळे मिळाला आहे आणि तो महत्त्वाचा आहे.- त्रिलोकनाथ जोशी, पुस्तक विक्रेते, सांगली