शहरं
Join us  
Trending Stories
1
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
2
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
3
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
4
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
6
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
7
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
8
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
9
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
10
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
12
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
13
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
14
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
15
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
16
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
17
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
18
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
19
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
20
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ

पाणी नसल्याने ‘जलपरी’ला लागला ब्रेक

By admin | Updated: May 22, 2016 03:47 IST

कृष्णा नदीपात्रात पाणी नसल्याने म्हैसाळ योजना गुरुवारपासून बंद पडली आहे, त्यामुळे मिरजेतून लातूरला ‘जलपरी’ रेल्वेने होणारा पाणीपुरवठा शनिवारपासून खंडित झाला आहे

मिरज (सांगली) : कृष्णा नदीपात्रात पाणी नसल्याने म्हैसाळ योजना गुरुवारपासून बंद पडली आहे, त्यामुळे मिरजेतून लातूरला ‘जलपरी’ रेल्वेने होणारा पाणीपुरवठा शनिवारपासून खंडित झाला आहे. मालगावसह अन्य गावांतील नळपाणी पुरवठा बंद पडण्याची शक्यता आहे. वारणा धरणातून पाणी सोडण्यात येत असून, रविवारपर्यंत नदीपात्रात पुरेसा पाणीसाठा झाल्यास म्हैसाळ योजनेचे पंप पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कर्नाटकात पाणीटंचाईमुळे कोयना धरणातून दोन टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. कर्नाटकात पाणी पोहोचण्यासाठी कृष्णा नदीपात्रात ठिकठिकाणी असलेल्या बंधाऱ्यांचे दरवाजे उघडण्यात आल्याने गेला आठवडाभर नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. म्हैसाळ योजनेचे पंप सुरू ठेवण्यासाठी आठ फूट पाणीसाठा आवश्यक असताना पाणीपातळी खालावल्याने गुरुवारपासून म्हैसाळ योजनेचे ६५ पंप बंद झाले आहेत.म्हैसाळच्या पहिल्या टप्प्यातील पंपगृहाच्या १५ पंपांद्वारे पाणी उपसा करण्यात येत असल्याने म्हैसाळ बंधाऱ्यात आठ फूट पाणीसाठ्याची आवश्यकता आहे. म्हैसाळचे पंप बंद पडल्याने कालव्यातून जतपर्यंत जाणारे पाणी थांबले आहे.मिरजेत कृष्णा घाटावर रेल्वेच्या पाणीपुरवठा योजनेचा जॅकवेल उघडा पडल्याने रेल्वेसाठी होणारा पाणी उपसा बंद झाला आहे. रेल्वेचा पाणीपुरवठा सुरू राहावा, यासाठी नदीपात्रात पोकलॅनद्वारे जॅकवेलजवळील गाळ काढून पाणीसाठा करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. नदीतून पाणी उपसा थांबल्याने शनिवारी लातूरला पाठविण्यासाठी पाणी टँकर भरले नाहीत. (प्रतिनिधी) वारणाचे पाणी आल्यानंतरच टँकर शुक्रवारी रात्री रेल्वे टँकर भरले नसल्याने शनिवारी सकाळी टँकर भरण्यासाठी कशीबशी पाण्याची व्यवस्था करून ५० रेल्वे टँकर लातूरला रवाना करण्यात आले. मात्र त्यानंतर पाणीपुरवठा थांबविण्यात आला. वारणा धरणाचे पाणी उपलब्ध झाल्यानंतरच लातूरसाठी टँकर भरण्याचे काम सुरू होणार आहे. ११ एप्रिलपासून सुमारे ८ कोटी २० लाख लीटर पाणी मिरजेतून लातूरला पाठविण्यात आले आहे. समन्वयाचा अभाव - देशपांडेपाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने आणखी १५ दिवस लातूरला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. नदीत पुरेसा पाणीसाठा राहावा, यासाठी प्रशासन व पाटबंधारे अधिकाऱ्यांत समन्वय नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप भाजपाचे नेते मकरंद देशपांडे यांनी केला.