शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या उदासीनतेमुळे बारा वाड्याची दळणवळण व्यवस्था ठप्प

By admin | Updated: November 8, 2016 15:47 IST

इगतपुरी तालुक्यात या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने तालुक्यातील रस्त्याची वाताहत झाली असून, अनेक ठिकाणचे रहदारीचे पूलही वाहून गेले आहेत.

ऑनलाइन लोकमत
 नाशिक, दि. 08 -  इगतपुरी तालुक्यात या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने तालुक्यातील रस्त्याची वाताहत झाली असून, अनेक ठिकाणचे रहदारीचे पूलही वाहून गेले आहेत. दरम्यान पावसाळा संपून दोन महिने उलटून गेले असतानाही या वाहून गेलेल्या रस्त्याची आणि पुलाची दुरुस्ती करण्याकडे शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभाग,पंचायत समितीचा बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची दळण-वळण व्यवस्था ठप्प झाली आहे. 
दरम्यान, या तुटलेल्या पुलावरून अनेक जणजीवघेणा प्रवास करीत असल्याने या पुलाची आणि रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी,  अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. इगतपुरी तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक रस्त्यावरील लहान मोठी पूल वाहून गेली होती.तर घोटी सिन्नर रस्त्यासह घोटी शहरातील जुन्या महामार्गाचीही प्रचंड दुरावस्था झाली होती.
इगतपुरी तालुक्यातील शेणवड बु या गावाच्या परिसरात बारा आदिवासी वाड्या असून या वाड्यातील नागरिकांना शहरात येण्यासाठी पेहरेवाडी जवळ मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी एकमेव रस्ता आहे.या रस्त्यावर बंधाऱ्याच्या पाण्यातून जाण्यासाठी पूल असून या पुलाचे काम करतानाच ते नित्कृष्ट झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे केली होती. पहिल्या मुसळधार पावसातच हा पूल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने या तुटलेल्या पुलाची आणि रस्त्याची दखल न घेतल्याने या भागातील हजारो नागरिकांची दळणवळण व्यवस्था  बंद पडली आहे.
या पुलाची आणि परिसरातील रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी आणि रस्ता वहिवाटी साठी सुरु करावा अशी मागणी परिसरातील नागरिकाकडून होत आहे.