शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या उदासीनतेमुळे बारा वाड्याची दळणवळण व्यवस्था ठप्प

By admin | Updated: November 8, 2016 15:47 IST

इगतपुरी तालुक्यात या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने तालुक्यातील रस्त्याची वाताहत झाली असून, अनेक ठिकाणचे रहदारीचे पूलही वाहून गेले आहेत.

ऑनलाइन लोकमत
 नाशिक, दि. 08 -  इगतपुरी तालुक्यात या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने तालुक्यातील रस्त्याची वाताहत झाली असून, अनेक ठिकाणचे रहदारीचे पूलही वाहून गेले आहेत. दरम्यान पावसाळा संपून दोन महिने उलटून गेले असतानाही या वाहून गेलेल्या रस्त्याची आणि पुलाची दुरुस्ती करण्याकडे शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभाग,पंचायत समितीचा बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची दळण-वळण व्यवस्था ठप्प झाली आहे. 
दरम्यान, या तुटलेल्या पुलावरून अनेक जणजीवघेणा प्रवास करीत असल्याने या पुलाची आणि रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी,  अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. इगतपुरी तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक रस्त्यावरील लहान मोठी पूल वाहून गेली होती.तर घोटी सिन्नर रस्त्यासह घोटी शहरातील जुन्या महामार्गाचीही प्रचंड दुरावस्था झाली होती.
इगतपुरी तालुक्यातील शेणवड बु या गावाच्या परिसरात बारा आदिवासी वाड्या असून या वाड्यातील नागरिकांना शहरात येण्यासाठी पेहरेवाडी जवळ मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी एकमेव रस्ता आहे.या रस्त्यावर बंधाऱ्याच्या पाण्यातून जाण्यासाठी पूल असून या पुलाचे काम करतानाच ते नित्कृष्ट झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे केली होती. पहिल्या मुसळधार पावसातच हा पूल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने या तुटलेल्या पुलाची आणि रस्त्याची दखल न घेतल्याने या भागातील हजारो नागरिकांची दळणवळण व्यवस्था  बंद पडली आहे.
या पुलाची आणि परिसरातील रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी आणि रस्ता वहिवाटी साठी सुरु करावा अशी मागणी परिसरातील नागरिकाकडून होत आहे.