शहरं
Join us  
Trending Stories
1
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
2
तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
3
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
4
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
5
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
6
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
7
शिंदेसेना ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', त्यांचा नैसर्गिक जन्म नाही; राऊतांची बोचरी टीका
8
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जिवाची बाजी
9
विमा क्षेत्रात आता १००% परकीय गुंतवणुकीला मंजुरी; सर्वसामान्यांना स्वस्त पॉलिसी आणि चांगले पर्याय मिळणार?
10
'इस्लामिक दहशतवादाविरोधात उभे राहण्याची गरज', व्हाइट हाऊसमधून ट्रम्प यांचं आवाहन; केली मोठी घोषणा
11
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
12
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
13
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
14
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
15
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
16
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
17
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
18
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
19
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
20
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक तापमानवाढीमुळे वर्षभरात दीड हजार बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 06:05 IST

२०१८ ठरले सहावे उष्ण वर्ष : केंद्रीय पृथ्वी, विज्ञान मंत्रालयाची माहिती

- सचिन लुंगसे 

मुंबई : कार्बन उत्सर्जनाचा परिणाम म्हणून जागतिक तापमानवाढीचा धोका वाढत आहे. जागतिक तापमानात वाढ झाल्याने आपत्कालीन घटना वेगाने घडत आहेत. महत्त्वाचे म्हणजे उष्णतेत वाढ होत असून, २०१८ या वर्षाची सहावे उष्ण वर्ष म्हणून नोंद झाली आहे. तसेच या वर्षी देशभरात घडलेल्या आपत्कालीन घटनांमुळे तब्बल १ हजार ४२८ जणांचे बळी गेले आहेत.

मोठ्या प्रमाणावर होणारी जंगलतोड, वाहनांची वाढती संख्या, वाढते कार्बन उत्सर्जन आदी कारणांमुळे पृथ्वीवरील हवामानात येत्या काही वर्षांत अत्यंत घातक बदल होणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या तापमानवाढीचे परिणाम बदलत्या हवामानाच्या रूपाने जाणवू लागले आहेत. गेल्या काही वर्षांत सर्व ऋतू बदलत चाललेले आहेत. पावसाळा अनियमित झाला असून चक्रिवादळे होण्याचे प्रमाणही सगळ्यांच देशात वाढलेले पाहायला मिळत आहे. याचा परिणाम सर्व देशांप्रमाणेच भारत व महाराष्टÑातही प्रकर्षाने जाणवू लागला आहे.केंद्राच्या पृथ्वी, विज्ञान मंत्रालयाच्या माहितीनुसार, ५ जानेवारी रोजी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या हिमवृष्टीत ११ जणांचा मृत्यू झाला. एप्रिल, मे महिन्यात राजस्थानातील धूळीच्या वादळाने ६८ जणांचा तर, जून ते सप्टेंबरमध्ये गुजरातमध्ये झालेल्या मुसळधार पावसासह आलेल्या पुराने ५२ जणांचा बळी घेतला. जून ते सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात झालेला मुसळधार पावसामुळे आणि पुरात १३९ जणांना, तर ८ ते २३ आॅगस्टदरम्यान केरळमध्ये झालेला मुसळधार पाऊस आणि पुरामुळे २२३ जणांचा मृत्यू झाला. १० ते १७ नोव्हेंबरदरम्यान ‘गाजा’ चक्रिवादळामुळे तामिळनाडूत ४५ जणांचा मृत्यू झाला.

याचप्रमाणे जून ते सप्टेंबर महिन्यात उत्तर प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसासह पुरात १५८ जण मृत्युमुखी पडले. एप्रिल, मे महिन्यांत देशात आलेल्या वादळांनी १६८ जणांचे बळी घेतले. जून महिन्यात वीज पडून ३९ जण मरण पावले. २ ते ६ मेदरम्यान धूळीच्या वादळाने देशात ९२ जणांचे बळी घेतले. तर, ३ ते १३ जानेवारीदरम्यान थंडीच्या लाटेत १३५ जणांचा मृत्यू झाला. १४ ते २९ जूनदरम्यान आसाममधील मुसळधार पाऊस आणि पुरात ३२ जणांचे बळी गेले. तर, जून ते सप्टेंबर महिन्यात पश्चिम बंगालमधील पाऊस आणि पुराने ११६ जणांचा जीव घेतला. जून ते जुलैदरम्यान झारखंडमध्ये आलेल्या वादळांमुळे ७५ जणांना तर १२ ते १४ आॅक्टोबरदरम्यान ओडिशामधील ‘तितली’ वादळामुळे ७७ जणांना जीवास मुकावे लागले आहे....म्हणूनच होतेय तापमानात वाढजागतिक तापमान वाढीसाठी कर्ब वायूंपैकी ७० टक्के कारणीभूत असणारा वायू म्हणजे कार्बन डायआॅक्साईड. दुसरा मिथेन आणि तिसरा नायट्रस आॅक्साइड.कार्बन डायआॅक्साइड हा प्रामुख्याने नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन पद्धतीने उत्सर्जित होतो. पृथ्वीच्या पृष्ठभागावर होणाऱ्या ज्वालामुखींच्या उद्रेकामुळे मोठ्या प्रमाणात हाच वायू बाहेर टाकला जातो.जंगलांना आग लागते तेव्हाही हाच वायू बाहेर टाकला जातो. शिवाय कोळसा, लाकूड, पेट्रोल आणि डिझेल यांच्या ज्वलनामुळेदेखील तो बाहेर पडतो. पेट्रोल, डिझेल हे कारखाने तसेच सर्व प्रकारच्या वाहनांना मोठ्या प्रमाणात लागते. त्यातच दरवर्षी वाहनांची संख्या वाढतच चालल्याने पेट्रोल-डिझेलचा वापरही वाढत आहे. साहजिकच कार्बन डायआॅक्साइडचे दैनंदिन वातावरणातील प्रमाणही वाढत आहे.