शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेची धुंदी चढल्यानेच दानवेंना दुष्काळ दिसला नाही- अशोक चव्हाण

By admin | Updated: January 23, 2017 18:55 IST

सत्तेची हवा डोक्यात गेल्याने रावसाहेब दानवेंच्या डोळ्यावर धुंदी आली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई दि. 23 - सत्तेची हवा डोक्यात गेल्याने रावसाहेब दानवेंच्या डोळ्यावर धुंदी आली आहे. त्यामुळे त्यांना राज्यातला शेतक-यांच्या आत्महत्या आणि दुष्काळ दिसला नाही, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.

गेल्या वर्षी अख्ख्या मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळ नव्हता, असे वक्तव्य करणा-या भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करून खा. चव्हाण म्हणाले की, राज्यात पाच हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांची कुटुंबे रस्त्यावर आली. काँग्रेस पक्षाने संसद, विधानसभा आणि रस्त्यावर उतरून संघर्ष केल्यानंतर सरकारने दुष्काळग्रस्तांना 4200 कोटींची तुटपुंजी मदत केली. काँग्रेस पक्षाला या मदतीचे श्रेय मिळू नये म्हणून असे वक्तव्य करणे दुर्दैवी असून, दानवे यांच्या वक्तव्यामुळे भाजपाचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे.(युती झाली तर ठीक अन्यथा स्वबळावर लढू, भाजपाचा सेनेला इशारा)(शिवसेनेने जाहीरनामा रिपिट करून दाखवला- राधाकृष्ण विखे पाटील)आठवड्याभरापूर्वी राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या बुलडाणा जिल्ह्यात एका शेतक-याने फुंडकरांच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. त्याच जिल्ह्यात जाहीर सभेत बोलताना दानवे यांनी केलेले हे वक्तव्य म्हणजे राज्यातील शेतक-यांची क्रूर थट्टा असून, शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे. या असंवेदनशील वक्तव्याबाबत दानवे यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी, असे अशोक चव्हाण म्हणाले. याच जाहीर सभेत बोलताना दानवे यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा मला द्या मी बदलून देतो, असे वक्तव्य केले आहे. लक्ष्मीदर्शनाच्या गप्पा मारणा-या रावसाहेब दानवे यांनी किती लोकांना जुन्या नोटा बदलून दिल्या?, याची चौकशी करण्याची आवश्यकता असून बिहार प्रदेश भाजपाप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश भाजपने जुन्या नोटांच्या माध्यमातून काही मालमत्ता खरेदी केल्या आहेत का? याचीही चौकशी होणे गरजेचे आहे, असे चव्हाण म्हणाले.