शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या झळा, पोटाची खळगी भरण्यासाठी सोडले गाव

By admin | Updated: January 6, 2015 00:05 IST

बुलडाणा जिल्ह्य़ातून शेतकरी, शेतमजुरांचे स्थलांतर.

गजानन सरकटे/देऊळगाव कुंडपाळ (जि. बुलडाणा) : बुलडाणा जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा प्रमाणात बसत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी लोणार तालुक्यातून अल्पभूधारक शेतकरी व शेतमजूर मोठय़ा शहरांसह कर्नाटक राज्यात मजुरीसाठी स्थलांतरीत होत आहे. पावसाच्या हुलकावणीमुळे शेतकर्‍यांना खरीप व रब्बी हंगामात फटका बसला; सर्वत्र दुष्काळाच्या झळा जाणवत असल्याने शेतमजुरांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी व संसाराचा गाडा पुढे ढकलण्यासाठी लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथील ३0 अल्पभुधारक शेतकरी आपल्या कुटुंबियांसह कामाच्या शोधात कर्नाटकला रवाना झाले आहेत. यावर्षी शेतकर्‍यांचे नियोजन कोलमडले आहे. सद्यस्थितीत शेतकरी व शेतमजुरांसमोर रोजगारासोबतच बँकाचे पीक कर्ज, सावकारी कर्ज, कुटूंबाचा उदरनिर्वाह असे अनेक प्रश्न उभे आहेत. देऊळगाव कुंडपाळ येथील हरिभाऊ राठोड, अशोक सरकटे, ज्ञानेश्‍वर तुळशिराम सरकटे, प्रकाश गावडे, महादेव खुमणे, रामचंद्र राठोड, विनोद राठोड, लक्ष्मण राठोड, दिनकर अंभोरे, विजय राठोड, शिवाजी नाईक, चव्हाण, मुंदळकर, पिटकर, पंडितराव सरकटे, रमेश सरकटे, नारायण सरकटे, सुधाकर सरकटे, संजय सरकटे यांच्यासह गावातील अल्पभुधारक शेतकरी व शेतमजुर रोजगाराच्या शोधात कर्नाटकमधील किरणवाडी येथे स्थलांतरीत झाले आहेत. रोजगारासाठी परिसरातील अनेक शेतमजूर शहराकडे स्थलांतरीत होण्याचे प्रमाण वाढत असून प्रशासनाने याकडे लक्ष देऊन मजुरांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. *शेकडो मजुरांचे स्थलांतरलोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळसह टिटवी, नांद्रा, गोत्रा, रायगाव, गंधारी, मढी, सावरगाव मुंढे, धाड, किन्ही या आदीवासी बहुल गावातून हजारो अल्पभुधारक शेतकरी व शेतमजूर मुंबई, नाशिक, सुरत, पुणे, कर्नाटक राज्यात काम शोधण्यासाठी स्थलांतरीत झाले. स्थलांतरीत मजुरांची संख्य जवळपास एक हजार दोनशे एवढी आहे. *रोहयोची कामे कागदावरच बुलडाणा जिल्हाभर रोजगार हमीची कामे मंजूर आहेत. परंतु, रोहयोच्या कामासाठी मजूर केवळ कागदावर दाखवून त्यांची मजुरी अधिकार्‍यांच्या खिशात गडप होत असल्याचे वास्तव आहे. परिणामी कोट्यवधीची कामे मंजूर असतानाही मजुरांच्या हाताला काम दिले जात नसल्याने मजुरांचे स्थलांतर होत आहे. रोजगार हमी योजनेच्या कमाबाबत जनजागृती नसल्याने या कामांकडे मजुरांचेही लक्ष नाही.