शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दुष्काळाच्या झळा, पोटाची खळगी भरण्यासाठी सोडले गाव

By admin | Updated: January 6, 2015 00:05 IST

बुलडाणा जिल्ह्य़ातून शेतकरी, शेतमजुरांचे स्थलांतर.

गजानन सरकटे/देऊळगाव कुंडपाळ (जि. बुलडाणा) : बुलडाणा जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा प्रमाणात बसत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी लोणार तालुक्यातून अल्पभूधारक शेतकरी व शेतमजूर मोठय़ा शहरांसह कर्नाटक राज्यात मजुरीसाठी स्थलांतरीत होत आहे. पावसाच्या हुलकावणीमुळे शेतकर्‍यांना खरीप व रब्बी हंगामात फटका बसला; सर्वत्र दुष्काळाच्या झळा जाणवत असल्याने शेतमजुरांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी व संसाराचा गाडा पुढे ढकलण्यासाठी लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथील ३0 अल्पभुधारक शेतकरी आपल्या कुटुंबियांसह कामाच्या शोधात कर्नाटकला रवाना झाले आहेत. यावर्षी शेतकर्‍यांचे नियोजन कोलमडले आहे. सद्यस्थितीत शेतकरी व शेतमजुरांसमोर रोजगारासोबतच बँकाचे पीक कर्ज, सावकारी कर्ज, कुटूंबाचा उदरनिर्वाह असे अनेक प्रश्न उभे आहेत. देऊळगाव कुंडपाळ येथील हरिभाऊ राठोड, अशोक सरकटे, ज्ञानेश्‍वर तुळशिराम सरकटे, प्रकाश गावडे, महादेव खुमणे, रामचंद्र राठोड, विनोद राठोड, लक्ष्मण राठोड, दिनकर अंभोरे, विजय राठोड, शिवाजी नाईक, चव्हाण, मुंदळकर, पिटकर, पंडितराव सरकटे, रमेश सरकटे, नारायण सरकटे, सुधाकर सरकटे, संजय सरकटे यांच्यासह गावातील अल्पभुधारक शेतकरी व शेतमजुर रोजगाराच्या शोधात कर्नाटकमधील किरणवाडी येथे स्थलांतरीत झाले आहेत. रोजगारासाठी परिसरातील अनेक शेतमजूर शहराकडे स्थलांतरीत होण्याचे प्रमाण वाढत असून प्रशासनाने याकडे लक्ष देऊन मजुरांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. *शेकडो मजुरांचे स्थलांतरलोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळसह टिटवी, नांद्रा, गोत्रा, रायगाव, गंधारी, मढी, सावरगाव मुंढे, धाड, किन्ही या आदीवासी बहुल गावातून हजारो अल्पभुधारक शेतकरी व शेतमजूर मुंबई, नाशिक, सुरत, पुणे, कर्नाटक राज्यात काम शोधण्यासाठी स्थलांतरीत झाले. स्थलांतरीत मजुरांची संख्य जवळपास एक हजार दोनशे एवढी आहे. *रोहयोची कामे कागदावरच बुलडाणा जिल्हाभर रोजगार हमीची कामे मंजूर आहेत. परंतु, रोहयोच्या कामासाठी मजूर केवळ कागदावर दाखवून त्यांची मजुरी अधिकार्‍यांच्या खिशात गडप होत असल्याचे वास्तव आहे. परिणामी कोट्यवधीची कामे मंजूर असतानाही मजुरांच्या हाताला काम दिले जात नसल्याने मजुरांचे स्थलांतर होत आहे. रोजगार हमी योजनेच्या कमाबाबत जनजागृती नसल्याने या कामांकडे मजुरांचेही लक्ष नाही.