शहरं
Join us  
Trending Stories
1
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
2
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
4
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
5
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
7
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
8
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
9
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
10
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
11
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
12
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
13
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
14
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
15
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
16
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
17
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
18
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
19
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
20
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश

दुष्काळामुळे महाराष्ट्रातील वीज निर्मितीला मोठा फटका

By admin | Updated: July 29, 2016 01:39 IST

दुष्काळाचा मोठा फटका महाराष्ट्रातील वीज उत्पादनाला बसला असून राज्यातील पाच प्रमुख वीज निर्मिती केंद्रे बंद करण्यात आली आहेत. पाणी आणि कोळशाशिवायही इतर कारणांनी

- नितीन अग्रवाल,  नवी दिल्ली

दुष्काळाचा मोठा फटका महाराष्ट्रातील वीज उत्पादनाला बसला असून राज्यातील पाच प्रमुख वीज निर्मिती केंद्रे बंद करण्यात आली आहेत. पाणी आणि कोळशाशिवायही इतर कारणांनी ही केंद्रे बंद करावी लागली आहेत, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. परळी वीज निर्मिती केंद्रातील सर्व पाचही संच दुष्काळामुळे बंद करावे लागले आहेत. ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी एप्रिल ते जून दरम्यान २२८६ मेगावॅट क्षमतेच्या परळी (१३८०), मिहान (२४६), जीईपीएल (१२०), नाशिक टीपीएस (२७०) आणि बेला (२७०) केंद्रे बंद करावी लागली आहेत. परळी आणि मिहान केंद्र कमी पाणी असल्यामुळे बंद करावे लागले. दुष्काळामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते उपयोगात आणण्यावर विचार केला जात आहे. टॅरीफ धोरणानुसार २०१६ मध्ये ५० किलोमीटर क्षेत्रात येणाऱ्या स्थानिक संस्थांच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून निघणाऱ्या पाण्याचा वापर अपरिहार्य करण्यात आल्याची माहितीही गोयल यांनी दिली.