शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळावरून लक्ष उडवण्यास वाद!

By admin | Updated: August 21, 2015 00:43 IST

महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. मात्र, पुरेशा व ठोस शासकीय उपाययोजना होत नसल्यामुळे भाजप-शिवसेनेच्या सरकारविरूद्ध जनतेत प्रचंड आक्रोश आहे

मुंबई : महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. मात्र, पुरेशा व ठोस शासकीय उपाययोजना होत नसल्यामुळे भाजप-शिवसेनेच्या सरकारविरूद्ध जनतेत प्रचंड आक्रोश आहे. यावरून लक्ष विचलित करण्यासाठी राज्य सरकारने हेतुपुरस्सर महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा वाद चिघळवला, अशी टीका वरिष्ठ काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, यंदा शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळालेली नाही, अनेक जिल्ह्णांमध्ये पावसाळ्यातच पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे, लोकांना प्यायला पाणी नाही, जनावरांसाठी चारा नाही. या परिस्थितीचा सामना करण्यात भाजपा-शिवसेनेचे सरकार अपयशी ठरल्याने सर्वत्र संतापाची लाट आहे. त्यामुळेच शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा वाद जाणीवपूर्वक पेटता ठेवून लोकांचे लक्ष इतरत्र वळविण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक लिखाण केल्याचा आक्षेप अनेक साहित्यिक, इतिहासकार व विविध क्षेत्रातील नामवंतांनी घेतला आहे. महाराष्ट्रातील सर्वोच्च शासकीय पुरस्काराबाबत असा वाद निर्माण होताच महाराष्ट्र सरकारने संबंधितांशी चर्चा करून तो शमवायला हवा होता. उलटपक्षी सरकारने ताठर भूमिका घेऊन वादात तेल ओतले. या वादाला हेतुपुरस्सर जातीय रंग देण्यात आला. हे सरकार जातीयवादी आहे, असा आरोप राणे यांनी केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक विधानांचा त्यांनी यावेळी समाचार घेतला. बाबासाहेब पुरंदरेंमुळे शिवाजी महाराज घराघरात पोहोचल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते. यावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, पुरंदरेंमुळे शिवाजी महाराज की शिवाजी महाराजांमुळे पुरंदरे, याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करायला हवा. मी कोणाला भीत नाही, असे मुख्यमंत्री म्हणतात. फडणवीसांना कोणाची भीती नसती तर त्यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा देखील वानखेडेवरच घेतला असता, असा टोलाही राणेंनी लगावला. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा शोध न लागल्याबद्दल राणे यांनी गृहमंत्रीपदही सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. (प्रतिनिधी)