शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

ऊसतोडणी कामगारांच्या संपामुळे गाळपाचा मुहूर्त हुकला

By admin | Updated: October 24, 2015 03:15 IST

शासनपातळीवर सुरू असलेल्या गोंधळामुळे अद्यापही ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्नाचा तिढा कायम आहे. त्यामुळे राज्यात ६३ साखर कारखान्यांची धुराडी पेटूनही ऊस गाळपासाठी मोळी

पुणे : शासनपातळीवर सुरू असलेल्या गोंधळामुळे अद्यापही ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्नाचा तिढा कायम आहे. त्यामुळे राज्यात ६३ साखर कारखान्यांची धुराडी पेटूनही ऊस गाळपासाठी मोळी टाकण्याचा दसऱ्याचा मुहूर्त हुकला. दसऱ्याला राज्यात केवळ ९ साखर कारखान्यांनी मुळी टाकण्याचा कार्यक्रम केला. राज्यातील ऊसतोडणी वाहतूक कामगारांच्या वेतनवाढ प्रश्नावर लवादाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे कारखान्यांनी तोडणी वाहतूक कामगारांशी करार केला असला, तरी प्रत्यक्षात कामगार कामावर हजर झालेले नाहीत. काही कारखान्यांना कामगारांच्या टोळ्या मिळाल्याने त्यांची तोडणी सुरू झाली; परंतु मजुरांचा तिढा सुटल्याशिवाय हंगामाला गती मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात पश्चिम महाराष्ट्रात ६३ कारखान्यांचे बॉयलर पेटले आहेत. यामध्ये कोल्हापूर १०, सांगली १५, पुणे १०, सोलापूर १७, नगर ७ आणि नाशिक जिल्ह्यातील एका कारखान्याचा समावेश आहे. त्यात वसंतदादा, बारामती अ‍ॅग्रो, सहकारमहर्षी, चंद्रभागा, विठ्ठल सहकारी आणि पांडुरंग सहकारी विठ्ठलराव शिंदे, लो. बा. पाटील अ‍ॅग्रो, विठ्ठल कार्पोरेशन या नऊ कारखान्यांचे प्रत्यक्ष गाळप सुरू झाले आहे. त्याशिवाय पीयूष शुगर आणि अंबालिका या नगर जिल्ह्यातील दोन कारखान्यांनीही प्रत्यक्ष गाळप सुरू केले आहे. साखर आयुक्तालयात गाळप परवान्यासाठी ५० पेक्षा जास्त प्रस्ताव दाखल झाले आहेत.