शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोडणी कामगारांच्या संपामुळे गाळपाचा मुहूर्त हुकला

By admin | Updated: October 24, 2015 03:15 IST

शासनपातळीवर सुरू असलेल्या गोंधळामुळे अद्यापही ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्नाचा तिढा कायम आहे. त्यामुळे राज्यात ६३ साखर कारखान्यांची धुराडी पेटूनही ऊस गाळपासाठी मोळी

पुणे : शासनपातळीवर सुरू असलेल्या गोंधळामुळे अद्यापही ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्नाचा तिढा कायम आहे. त्यामुळे राज्यात ६३ साखर कारखान्यांची धुराडी पेटूनही ऊस गाळपासाठी मोळी टाकण्याचा दसऱ्याचा मुहूर्त हुकला. दसऱ्याला राज्यात केवळ ९ साखर कारखान्यांनी मुळी टाकण्याचा कार्यक्रम केला. राज्यातील ऊसतोडणी वाहतूक कामगारांच्या वेतनवाढ प्रश्नावर लवादाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे कारखान्यांनी तोडणी वाहतूक कामगारांशी करार केला असला, तरी प्रत्यक्षात कामगार कामावर हजर झालेले नाहीत. काही कारखान्यांना कामगारांच्या टोळ्या मिळाल्याने त्यांची तोडणी सुरू झाली; परंतु मजुरांचा तिढा सुटल्याशिवाय हंगामाला गती मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात पश्चिम महाराष्ट्रात ६३ कारखान्यांचे बॉयलर पेटले आहेत. यामध्ये कोल्हापूर १०, सांगली १५, पुणे १०, सोलापूर १७, नगर ७ आणि नाशिक जिल्ह्यातील एका कारखान्याचा समावेश आहे. त्यात वसंतदादा, बारामती अ‍ॅग्रो, सहकारमहर्षी, चंद्रभागा, विठ्ठल सहकारी आणि पांडुरंग सहकारी विठ्ठलराव शिंदे, लो. बा. पाटील अ‍ॅग्रो, विठ्ठल कार्पोरेशन या नऊ कारखान्यांचे प्रत्यक्ष गाळप सुरू झाले आहे. त्याशिवाय पीयूष शुगर आणि अंबालिका या नगर जिल्ह्यातील दोन कारखान्यांनीही प्रत्यक्ष गाळप सुरू केले आहे. साखर आयुक्तालयात गाळप परवान्यासाठी ५० पेक्षा जास्त प्रस्ताव दाखल झाले आहेत.