शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

औषध विक्रीच्या व्यवसायाला ‘सहकाराचा सुरुंग’

By admin | Updated: October 21, 2015 03:06 IST

मूळ किमतीच्या हजार टक्के नफा कमावणाऱ्या औषध विक्रीच्या व्यवसायाची राज्यातील वार्षिक उलाढाल सुमारे २५ हजार कोटी रुपयांच्या घरात असल्याचे बोलले जाते. सर्वदूर पसरलेल्या

- आविष्कार देसाई,  अलिबागमूळ किमतीच्या हजार टक्के नफा कमावणाऱ्या औषध विक्रीच्या व्यवसायाची राज्यातील वार्षिक उलाढाल सुमारे २५ हजार कोटी रुपयांच्या घरात असल्याचे बोलले जाते. सर्वदूर पसरलेल्या या नफेखोरीच्या साखळीला सुरुंग लावण्याचा पहिला प्रयत्न रायगड जिल्ह्यात सहकारी संस्थेच्या माध्यमातून होत आहे. पाच सहकारी संस्थांच्या माध्यमातून जेनेरिक औषधांची विक्री सुरु होणार असून टप्प्याटप्प्याने त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे स्वस्त दरात औषधे उपलब्ध होणार असल्याने जिल्ह्यात आरोग्य क्रांतीच्या पर्वाला सुरुवात होणार आहे.अलिबागच्या आरसीएफ कन्झ्युमर्स सोसायटीने त्यांच्या मेडिकल स्टोअरमधून ७ सप्टेंबर २०१५ पासून जेनेरिक औषधांच्या विक्रीला सुरुवात केली आहे. देशातील सर्वात मोठी असणारी करंजा मच्छीमार संस्था, रायगड बाजार, पीक अ‍ॅण्ड पे यासह एक अन्य अशा सहकार तत्त्वावर काम करणाऱ्यांनी त्यांच्या स्टोअरमधून जेनेरिक औषधे विक्रीला हिरवा कंदील दिला असल्याचे सहकारी संस्थेचे सहायक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.जिल्ह्यात चार हजार सहकारी संस्था आहेत. त्यातील मोठ्या सहकारी संस्थांना यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. सहकारी संस्थांबरोबर पत्रव्यवहारही केला आहे. त्यांच्याकडून जेनेरिक औषधांची विक्री प्रभावीप्रमाणे व्हावी यासाठी उद्या (बुधवारी) रायगडच्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवण्यात आली असल्याचेही सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. रायगड जिल्ह्यामध्ये याची नुसती सुरुवात झाली तरी तसा संदेश राज्यभर गेल्यास तो सर्वांच्याच फायद्याचा आहे. विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात यशस्वी सहकार चळवळ रुजली आहे. तेथेही याचा परिणामकारक उपयोग होऊ शकतो. औषध विक्रीचे हे प्रचंड मोठे मार्केट तोडण्यासाठी सहकारी संस्थांना अपार मेहनत घ्यावी लागणार आहे. हजारो कोटी रुपयांच्या या मार्केटमध्ये औषध निर्माण कंपन्या, डिस्ट्रीब्युटर, डॉक्टर, रिटेलर अशी मोठी साखळी जोडली गेलेली आहे. त्याचे नुकसान होत असताना ते मोठ्या ताकदीने संघटित होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.नागरिकांचे पैसे वाचणाररायगड जिल्ह्यात औषध विक्रीची उलाढाल सुमारे एक हजार कोटी रुपये आहे. नागरिकांना सर्वसामान्यपणे लागणाऱ्या औषधांच्या किमती या मूळ किमतीच्या सुमारे १०० ते एक हजार २०० टक्के नफा ठेवून विक्री केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची परवड होते. जेनेरिक औषधांमुळे नागरिकांचे हजारो कोटी रुपये वाचणार आहेत.अडीच कोटी रुपयांच्या औषधांची उलाढालअलिबागच्या आरसीएफ कन्झ्युमर सोसायटीमध्यवर्षाला अडीच कोटी रुपयांच्या औषधांची उलाढाल आहे. तीच जेनेरिक औषधांमुळे सुमारे ५० लाखांवर येऊ शकते. त्यामुळे केंद्र सरकारचा पैसा वाचणार आहे.