शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा आजही मला फोन येतात; शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्याचा मोठा दावा, महायुतीत खळबळ
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
20
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

आठवडाभरात दुष्काळग्रस्त परततील

By admin | Updated: June 12, 2016 04:44 IST

राज्यातील दुष्काळी भागातून विशेषत: नांदेडमधून मुंबईमध्ये आलेले स्थलांतरीत एका आठवड्यात त्यांच्या मूळ गावी परततील, अशी माहिती मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली.

मुंबई : राज्यातील दुष्काळी भागातून विशेषत: नांदेडमधून मुंबईमध्ये आलेले स्थलांतरीत एका आठवड्यात त्यांच्या मूळ गावी परततील, अशी माहिती मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली. दुष्काळी भागातून मुंबई, ठाण्यात स्थलांतरीत झालेल्यांना सुविधा मिळत नसल्याचे वृत्त वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर उच्च न्यायालयाने याची गांभीर्याने दखल घेत जनहित याचिका दाखल करून घेतली. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती. गेल्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने मुंबईत किती कुटुंबे स्थलांतरीत झाली आहेत, याची आकडेवारी मुंबई महापालिकेला देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शुक्रवारच्या सुनावणीत महापालिकेच्यावतीने ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी राज्यातील दुष्काळी भागातून मुंबईत ३९६ कुटुंबे आल्याची माहिती खंडपीठाला दिली. ‘मुंबईत एकुण ३९६ कुटुंबांतील एकूण १,०४४ दुष्काळग्रस्त नागरिक स्थलांतरीत झाले. मे महिन्याच्या अखेरीस अनेक कुटुंबे त्यांच्या मूळ गावी परतली. अद्याप २० कुटुंबे म्हणजे ९६ दुष्काळग्रस्त नागरिक मुंबईत आहेत. एका आठवड्यात ही कुटुंबेही परत जाण्याची शक्यता आहे,’ अशी माहिती अ‍ॅड. साखरे यांनी खंडपीठाला दिली. तसेच या कुटुंबांच्या अन्न व निवाऱ्याची सोय करण्यात आली होती. त्यांची वैद्यकीय चिकित्साही करण्यात आली. फिरते शौचालयही यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते,’ अशीही माहिती अ‍ॅड. साखरे यांनी खंडपीठाला दिली.मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी स्थलांतरीतांना त्यांच्या गावी परत जाण्यासाठी सुविधा उपलब्ध करणार असल्याचेही उच्च न्यायालयाला सांगितले. (प्रतिनिधी) पालिकेला दिले निर्देश एका आठवड्यानंतर स्थलांतरीतांची स्थिती काय आहे, याचा आढावा घेण्यासाठी उच्च न्यायालयाने राज्य सरकार व महापालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देत या याचिकेवरील सुनावणी तहकूब केली.